शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

"प्रत्येक भ्रष्टाचाऱ्याचा पर्दाफाश करायची वेळ आलीय"; भाजपा नेत्याचा AAP वर जोरदार हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2024 15:58 IST

Virendra Sachdeva And Arvind Kejriwal : अरविंद केजरीवाल यांना अटक झाल्यानंतर भाजपाकडून आम आदमी पार्टीवर सातत्याने जोरदार हल्लाबोल करण्यात येत आहे.

दिल्ली मनी लाँड्रिंग प्रकरणात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक झाल्यानंतर भाजपाकडून आम आदमी पार्टीवर सातत्याने जोरदार हल्लाबोल करण्यात येत आहे. एकीकडे दिल्ली भाजपा मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहे, तर दुसरीकडे सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप करत निषेधही करत आहे. दिल्ली भाजपाने राजधानीच्या सर्व 256 वॉर्डमध्ये होळी करून मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पुतळ्याचे दहन केले. 

दिल्ली भाजपाचे अध्यक्ष वीरेंद्र सचदेवा यांच्या नेतृत्वाखाली कॅनॉट प्लेसमध्ये भ्रष्टाचाराची होळी आणि मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. विधानसभेत एलओपी रामवीर सिंह बिधुरी यांनी महिपालपूरमध्ये तर खासदार मनोज तिवारी यांनी नथुपूरमध्ये निषेध केला. यावेळी वीरेंद्र सचदेवा म्हणाले की, आता वेळ आली आहे की आम आदमी पक्षातील प्रत्येक भ्रष्टाचाऱ्याचा पर्दाफाश करायची.

दिल्ली भाजपाचे प्रदेशाध्यक्ष वीरेंद्र सचदेवा यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले. वीरेंद्र सचदेवा म्हणाले, "होळीचा संदेश म्हणजे वाईटाचं दहन आणि चांगल्याचा विजय आणि दिल्लीतील सर्वात मोठे वाईट म्हणजे भ्रष्टाचार आहे. मुख्यमंत्र्यांचं काम शहराचा विकास करणे आहे, मात्र अरविंद केजरीवाल हे पहिले मुख्यमंत्री आहेत, ज्यांनी लुटण्याचं काम केलं." 

"दिल्लीतील मंदिर असो, शाळा असो, गुरुद्वारा असो किंवा मुख्य बाजार असो, अशी एकही जागा नाही जिथे अरविंद केजरीवाल यांनी दारूची दुकाने उघडली नाहीत. केजरीवाल यांच्यामध्ये थोडी जरी नैतिकता असेल तर त्यांनी आधीच राजीनामा दिला असता. आपच्या प्रत्येक भ्रष्टाचाऱ्याचा पर्दाफाश केला पाहिजे जेणेकरून त्यांचा खरा चेहरा दिल्लीच्या जनतेसमोर येईल" असं देखील वीरेंद्र सचदेवा यांनी म्हटलं आहे.  

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालBJPभाजपाlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४AAPआप