शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे निधन, ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 
3
"भाजपा 400 चा आकडा पार करू शकणार नाही...", निवडणूक निकालांबाबत ममता बॅनर्जीं केली मोठी भविष्यवाणी
4
"पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी समोरची व्यक्ती त्या बरोबरीची असायला हवी"
5
Ghatkopar Hoarding Collapse Update: ८ जणांचा मृत्यू, ६६ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा
6
WhatsApp चा मोठा प्लॅन, स्क्रीनशॉट फीचर ब्लॉक होणार!
7
भारताचा इराणसोबत मोठा करार; चीन आणि पाकिस्तानला बसणार मोठा झटका
8
मिलॉर्ड... या दोन मुद्द्यांवर चूक झाली...; EVM-VVPAT प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयात
9
KKR vs GT सामन्याचा फैसला झाला! प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद होणारा तिसरा संघ मिळाला
10
सुप्रिया सुळे पक्षाला फार पुढे नेऊ शकत नसल्याची जाणीव झाल्यानेच शरद पवारांनी...; अमित शाह स्पष्टच बोलले
11
बारामतीत EVM मशिन्स ठेवलेल्या स्ट्राँगरुमशी छेडछाड? आरोपानंतर अधिकाऱ्यांकडून आले स्पष्टीकरण
12
मुंबईतील भीषण दुर्घटनेनंतर सीएम-डीसीएम 'ॲक्शन मोड'वर; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश!
13
बापरे! मुंबईत पेट्रोल पंपावर कोसळलेल्या महाकाय होर्डिंगखाली अडकली ८० वाहने; ३५ जण जखमी
14
नेहरूंच्या चुकांसाठी काँग्रेस मोदींना जबाबदार धरतेय, चीनच्या मुद्द्यावरून जयशंकर यांचा टोला
15
'आप'कडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर, तुरुंगात असलेल्या मनीष सिसोदियासह ४० जणांची नावे
16
मुंबईतील 'तो' महाकाय लोखंडी सांगाडा बेकायदेशीर; २ दिवसांपूर्वीच दिली होती होर्डिंग हटवण्याची नोटीस
17
CSK चा सामना करण्यापूर्वी RCB ची ताकद कमी झाली! दोन तगड्या खेळाडूंनी माघार घेतली 
18
तेजप्रताप यादवांचा संयम सुटला, आरजेडी कार्यकर्त्याला मंचावरून ढकलले
19
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील प्रचार सभेबद्दल सुनील तटकरे म्हणाले- "आता ती जबाबदारी..."
20
25 वर्षांचा रेकॉर्ड मोडला; कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच श्रीनगरमध्ये सर्वाधिक मतदान...

'ते' पाच मृतदेह आले कुठून?; हत्या, तंत्र मंत्र की आणखी काही?... गूढ वाढलं

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2020 12:47 PM

देशाची राजधानी असलेल्या दिल्लीतल्या भजनपुरा भागात एकाच कुटुंबातील पाच जणांचे मृतदेह सापडल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्देएकाच कुटुंबातील पाच जणांचे मृतदेह सापडल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. प्राथमिक चौकशीत ही आत्महत्या असल्याचं बोललं जात होतं. परंतु शवविच्छेदन अहवालातून धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.त्यांची आत्महत्या नव्हे, तर धारदार शस्त्रानं हत्या करण्यात आल्याचं शवविच्छेदन अहवालातून समोर आलं आहे.

नवी दिल्लीः देशाची राजधानी असलेल्या दिल्लीतल्या भजनपुरा भागात एकाच कुटुंबातील पाच जणांचे मृतदेह सापडल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. प्राथमिक चौकशीत ही आत्महत्या असल्याचं बोललं जात होतं. परंतु शवविच्छेदन अहवालातून धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. त्यांची आत्महत्या नव्हे, तर धारदार शस्त्रानं हत्या करण्यात आल्याचं शवविच्छेदन अहवालातून समोर आलं आहे. सर्वच मृतदेहांच्या मानेवर आणि शरीराच्या इतर भागांवर जखमेच्या खुणा सापडल्या आहेत. दिल्ली पोलिसांनी आता हत्येचा गुन्हा दाखल केला असून, चौकशी सुरू केली आहे. त्यांची हत्या कोणत्या कारणास्तव करण्यात आली, याचा पोलीस शोध घेत आहेत. भजनपुरा परिसरातील राहत्या घरात पाच जणांचे मृतदेह आढळले होते. या मृतदेहांमध्ये तीन मुलांसह एक महिला आणि पुरुषाचा समावेश आहे. या मृतदेहांची ओळख पटली असून ते एकाच कुटुंबातील आहेत. यातील पुरुष हा रिक्षा चालक होता, असे सांगण्यात येत आहे. तसेच ते या घरात भाड्यानं राहत असल्याचीही माहिती मिळत आहे. पती-पत्नीशिवाय तीन मुलंसुद्धा इथे राहत होती.

शंभूनाथ (43) आपली पत्नी सुनीता (38)आणि मुलगी कोमल (16)सह मुलगा सचिन (14) आणि छोटा मुलगा शिवमबरोबर इथे राहत होते. त्यांच्या घराला बाहेरून टाळं लावण्यात आलं होतं. घरातून दुर्गंधी येत असल्यानं शेजारच्यांनी याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी टाळं तोडून घरात प्रवेश केल्यानंतर ही धक्कादायक घटना उघडकीस आली.