शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
3
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
4
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
5
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
6
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
7
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
8
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
9
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
10
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
11
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
12
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
13
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
14
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
15
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
16
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
17
IPL लिलावात अनसोल्डचा टॅग; त्याच पठ्ठ्यानं विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत विक्रमी द्विशतकासह रचला इतिहास
18
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
19
शिंदेसेनेच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर; गोविंदासह 'या' ४० नेत्यांकडे प्रचाराची धुरा!
20
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
Daily Top 2Weekly Top 5

प्लास्टिक कचऱ्याची योग्य विल्हेवाट न लावल्यास 50 हजारापर्यंत दंड

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2019 10:12 IST

सिंगल यूज प्लास्टिक आणि प्लास्टिकची योग्य विल्हेवाट न लावल्यास नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

ठळक मुद्देसिंगल यूज प्लास्टिक आणि प्लास्टिकची योग्य विल्हेवाट न लावल्यास नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.एक हजारापासून 50 हजारांपर्यंत दंडात्मक कारवाई करण्याचा आराखडा तयार केला आहे. दंडात्मक कारवाईमध्ये नागरिकांबरोबरच व्यावसायिक संस्थांवर ही कारवाईची तरतूदही केली आहे.

नवी दिल्ली - पर्यावरणासाठी प्लास्टिक हानीकारक असल्याने अनेक ठिकाणी त्याच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे. सिंगल यूज प्लास्टिक आणि प्लास्टिकची योग्य विल्हेवाट न लावल्यास नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यासाठी एक हजारापासून 50 हजारांपर्यंत दंडात्मक कारवाई करण्याचा आराखडा तयार केला आहे. 

दंडात्मक कारवाईमध्ये नागरिकांबरोबरच व्यावसायिक संस्थांवर ही कारवाईची तरतूदही केली आहे. शहर विकास विभाग व पर्यावरण विभागाने आराखडा तयार केला आहे. नियमानुसार सर्व सामान्य नागरिकांनी प्लास्टिकच्या कचऱ्यांची योग्य विल्हेवाट लावली नाही तर त्यांच्यावर एक हजार रुपयांची कारवाई होईल. चहाच कप, प्लेट, चमचे यासारख्या सिंगल यूज वस्तूंचा वापर दैनंदिन जीवनात केला जातो. अनेकदा नागरिक याचा वापर करून रस्त्यावर फेकून देतात. त्यामुळे प्रदूषण वाढत असल्याचं मतही पर्यावरण विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे. एका इंग्रजी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

690 टन प्लास्टिकचा कचरा

शहरात जवळपास 690 टन प्लास्टिकचा कचरा तयार होतो. अनेकदा नागरिक कचरा रस्त्यावर टाकतात. नागरिकांच्या या प्रवृत्तीला आळा बसावा. प्लास्टिक न जाळता त्याची योग्य विल्हेवाट लावण्यात यावी असे मत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे. प्लास्टिक वेस्ट मॅनेजमेंट नियम-2016 ला अनुसरून दंडाची रक्कम ठरवण्यात आली आहे. शहरातील सांस्कृतिक, सामाजिक कार्यक्रम, भंडारा, लग्न अशा सोहळ्यामध्ये वापरण्यात येणाऱ्या प्लास्टिकच्या विल्हेवाटावर लक्ष ठेवण्यात येणार आहे. 

दिल्लीमध्ये सोमवारपासून (4 नोव्हेंबर) दुचाकी वगळता सर्व वाहनांसाठी सम-विषम नियम लागू झाला आहे. दिल्ली सरकारने 4 ते 15 नोव्हेंबर या कालावधीत हा वाहतूक नियम लागू केला आहे. दिल्लीतील प्रदूषणात वाहनांच्या धुराचा सहभाग असल्याने राज्याला ही समस्या भेडसावत आहे. अशातच शेजारच्या राज्यात शेतकरी पराली जाळत असल्याने प्रदूषणात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे वाहनांसाठी सम-विषम नियम लागू करून सरकारने काही प्रमाणात प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला आहे. गाडीच्या क्रमांकाचा शेवटचा आकडा सम असेल तर सम दिवसांना रस्त्यावर फिरण्याची अनुमती असेल. तसेच विषम आकड्यांसाठी लागू असेल. रविवार वगळता दररोज सकाळी 8 ते रात्री 8 या कालावधीत वाहतुकीसाठी हा नियम लागू असणार आहे. यातून दुचाकींना सवलत देण्यात आली आहे. तसेच रुग्णवाहिका, स्कूल बस, महिला यांना यातून सूट देण्यात आली आहे. याशिवाय व्हीआयपींनाही या नियमातून वगळण्यात आले आहे.  

टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदीdelhiदिल्लीdelhi pollutionदिल्ली प्रदूषणenvironmentपर्यावरण