शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात पाऊल ठेवताच पुतिन यांना मिळाले मोठे सरप्राइज; PM मोदींच्या निर्णयाने झाले आश्चर्यचकित
2
बीएलओंची समस्या आता दूर होणार; SIR प्रक्रियेबाबत सुप्रीम कोर्टाने दिले महत्त्वाचे निर्देश
3
'माझ्या मित्राचे स्वागत करुन आनंद झाला', पीएम मोदी अन् पुतिन यांचा पुन्हा एकाच कारने प्रवास
4
 "SIR ची काही आवश्यकताच नाही, सरकारनं फक्त...!"; प्रवीण तोगडिया यांचं मोठं विधान
5
अभिमानास्पद! PM मोदींनी पुतिन यांना दिली अत्यंत खास भेट; जगात लाखो लोकांना आजही प्रेरणादायी
6
Aurus Senat सोडून फॉर्च्यूनरमध्ये सोबत बसले मोदी-पुतिन, काय आहे या प्रसंगाचं 'चीन कनेक्शन'?
7
पुतिन भारतात दाखल, पंतप्रधान मोदींकडून स्वागत; शिखर परिषदेकडे संपूर्ण जगाचे बारकाईने लक्ष  
8
“राहुल गांधींची विधाने बेजबाबदारपणाची”; भाजपाचा पलटवार, पुतिन भेटीवरून केली होती टीका
9
IPL 2026 : कोट्यवधीचं पॅकेज हवं; पण पूर्णवेळ काम नको! ५ क्रिकेटरपैकी एकाने काढलाय लग्नाचा मुहूर्त
10
पुतिन भारतात पोहोचण्यापूर्वीच मोठी बातमी येऊन धडकली, 2 अब्ज डॉलरच्या डीलवर शिक्कामोर्तब; पाक-चीनची झोप उडणार!
11
रेल्वेत 1.20 लाखांहून अधिक पदांची भरती; रेल्वेमंत्र्यांनी लोकसभेत दिली महत्वाची माहिती...
12
विराट कोहली, रोहित शर्मा दोघेही 'दादा' क्रिकेटर, त्यांच्या नादाला लागाल तर...- रवी शास्त्री
13
प्रेयसीला घरी भेटायला गेला अन् रंगेहाथ पकडला!अर्ध्यातच सोडून मित्रांनी पळ काढला; मग जे घडलं त्याची कुणी कल्पनाही केली नसेल!
14
पुतिन यांचे विमान भारतीय हवाई हद्दीत; रशियाची लढाऊ विमाने माघारी फिरली...
15
AUS vs ENG Ashes Test : एकाच वेळी दोघे कॅचसाठी झेपावले; धडक झाली, पण कॅरीनं चेंडू पकडला अन्...
16
170 अब्ज डॉलर्सचे व्हॅल्युएशन, 38000 कोटी उभारण्याची तयारी; कधी येणार Jio IPO?
17
डॉ. गौरी पालवे-गर्जे मृत्यू प्रकरण: आई-वडील CM फडणवीसांना भेटले; उच्चस्तरीय चौकशीची मागणी
18
आता घ्यायची तर १०० टक्के इथेनॉलवर चालणारीच कार घ्या...; गडकरी बसले, म्हणाले '२५ रुपये लीटर...'
19
मुंबई-गोवा महामार्गाचा मुद्दा पुन्हा संसदेत, मविआ खासदारांचे प्रश्न; नितीन गडकरी म्हणाले...
20
“१७५ जागा आल्या, तर भाजपाने बेईमानी करून निवडणुका जिंकल्या हे सिद्ध होईल”; कुणी केला दावा?
Daily Top 2Weekly Top 5

प्लास्टिक कचऱ्याची योग्य विल्हेवाट न लावल्यास 50 हजारापर्यंत दंड

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2019 10:12 IST

सिंगल यूज प्लास्टिक आणि प्लास्टिकची योग्य विल्हेवाट न लावल्यास नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

ठळक मुद्देसिंगल यूज प्लास्टिक आणि प्लास्टिकची योग्य विल्हेवाट न लावल्यास नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.एक हजारापासून 50 हजारांपर्यंत दंडात्मक कारवाई करण्याचा आराखडा तयार केला आहे. दंडात्मक कारवाईमध्ये नागरिकांबरोबरच व्यावसायिक संस्थांवर ही कारवाईची तरतूदही केली आहे.

नवी दिल्ली - पर्यावरणासाठी प्लास्टिक हानीकारक असल्याने अनेक ठिकाणी त्याच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे. सिंगल यूज प्लास्टिक आणि प्लास्टिकची योग्य विल्हेवाट न लावल्यास नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यासाठी एक हजारापासून 50 हजारांपर्यंत दंडात्मक कारवाई करण्याचा आराखडा तयार केला आहे. 

दंडात्मक कारवाईमध्ये नागरिकांबरोबरच व्यावसायिक संस्थांवर ही कारवाईची तरतूदही केली आहे. शहर विकास विभाग व पर्यावरण विभागाने आराखडा तयार केला आहे. नियमानुसार सर्व सामान्य नागरिकांनी प्लास्टिकच्या कचऱ्यांची योग्य विल्हेवाट लावली नाही तर त्यांच्यावर एक हजार रुपयांची कारवाई होईल. चहाच कप, प्लेट, चमचे यासारख्या सिंगल यूज वस्तूंचा वापर दैनंदिन जीवनात केला जातो. अनेकदा नागरिक याचा वापर करून रस्त्यावर फेकून देतात. त्यामुळे प्रदूषण वाढत असल्याचं मतही पर्यावरण विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे. एका इंग्रजी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

690 टन प्लास्टिकचा कचरा

शहरात जवळपास 690 टन प्लास्टिकचा कचरा तयार होतो. अनेकदा नागरिक कचरा रस्त्यावर टाकतात. नागरिकांच्या या प्रवृत्तीला आळा बसावा. प्लास्टिक न जाळता त्याची योग्य विल्हेवाट लावण्यात यावी असे मत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे. प्लास्टिक वेस्ट मॅनेजमेंट नियम-2016 ला अनुसरून दंडाची रक्कम ठरवण्यात आली आहे. शहरातील सांस्कृतिक, सामाजिक कार्यक्रम, भंडारा, लग्न अशा सोहळ्यामध्ये वापरण्यात येणाऱ्या प्लास्टिकच्या विल्हेवाटावर लक्ष ठेवण्यात येणार आहे. 

दिल्लीमध्ये सोमवारपासून (4 नोव्हेंबर) दुचाकी वगळता सर्व वाहनांसाठी सम-विषम नियम लागू झाला आहे. दिल्ली सरकारने 4 ते 15 नोव्हेंबर या कालावधीत हा वाहतूक नियम लागू केला आहे. दिल्लीतील प्रदूषणात वाहनांच्या धुराचा सहभाग असल्याने राज्याला ही समस्या भेडसावत आहे. अशातच शेजारच्या राज्यात शेतकरी पराली जाळत असल्याने प्रदूषणात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे वाहनांसाठी सम-विषम नियम लागू करून सरकारने काही प्रमाणात प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला आहे. गाडीच्या क्रमांकाचा शेवटचा आकडा सम असेल तर सम दिवसांना रस्त्यावर फिरण्याची अनुमती असेल. तसेच विषम आकड्यांसाठी लागू असेल. रविवार वगळता दररोज सकाळी 8 ते रात्री 8 या कालावधीत वाहतुकीसाठी हा नियम लागू असणार आहे. यातून दुचाकींना सवलत देण्यात आली आहे. तसेच रुग्णवाहिका, स्कूल बस, महिला यांना यातून सूट देण्यात आली आहे. याशिवाय व्हीआयपींनाही या नियमातून वगळण्यात आले आहे.  

टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदीdelhiदिल्लीdelhi pollutionदिल्ली प्रदूषणenvironmentपर्यावरण