शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
3
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
4
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
5
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
6
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
7
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
8
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
9
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
10
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
11
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
12
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
13
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
14
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
15
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
16
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
17
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
18
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
19
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
20
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  

आप की भाजप, दिल्लीत कुणाचं सरकार? मतदानापूर्वीच्या सर्व्हेनं कुणाचं टेन्शन वाढवलं? बघा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2025 14:04 IST

'या' परिस्थिती भाजपचा विजय...!

दिल्ली विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर झाली आहे. यानंतर आता देशाच्या राजधानीत राजकारण चांगलेच तापताना दिसत आहे. सर्वांच्या मनात एकच प्रश्न आहे, तो म्हणजे, यावेळी दिल्लीत कुणाचे सरकार येणार? यातच, विधानसभा निवडणुकीवरील पहिल्या सर्वेक्षणाने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. टाईम्स नाऊ जेव्हीसी पोलमध्ये आप आणि भाजपमध्ये अगदी अटीतटीची लढत होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तीन फॅक्टर्सवर करण्यात आलेल्या या सर्वेक्षणात भाजप सत्तेच्या अगदी जवळ असल्याचे अथवा बहुमताच्याही पुढे जात असल्याचे दिसत आहे. 

जर 'आप'ने केवळ मोफतची आश्वासनं दिली तर काय होईल? - भाजपने अद्याप महिलांसाठी आर्थिक मदतीचे अधिकृत आश्वासन दिलेले नाही. तर दुसरीकडे, आम आदमी पक्षाने दरमहा २१०० रुपये देण्याची घोषणा केली आहे. टाईम्स नाऊ जेव्हीसी सर्व्हेनुसार, या परिस्थितीत आम आदमी पक्षाला थेट फायदा होऊ शकतो. त्यांना ५५ टक्के महिला मते मिळू शकतात. भाजपला ३९%, काँग्रेसला ५% आणि इतरांना १% महिला मते मिळू शकतात.

याच बरोबर, आम आदमी पक्षाला पुरुष आणि महिला मतदारांकडून सुमारे ५१.३० लाख (५१.२०%) मते मिळू शकतात. तर, दुसरीकडे भाजपला ४०.६३ टक्के मतांसह ४०.७० लाख मते मिळू शकतात. तसेच, काँग्रेसला ६.२ टक्के आणि इतरांना १.५४ टक्के मते मिळू शकतात. याशिवाय, जागांसंदर्भात बोलायचे झाल्यास, आम आदमी पक्षाला ५६-६० जागा मिळू शकतात आणि भाजपला १०-१४ जागा मिळू शकतात. अशा परिस्थितीत काँग्रेसचे तर खातेही उघडणार नाही.

काय होऊ शकतो भाजपच्या आश्वासनांचा परिणाम? - या सर्वेक्षणात असेही म्हणण्यात आले आहे की, जर भाजपने महिलांसाठी लाडकी बहीण सारखी योजना आणली, तर त्यांना त्याचा फायदा होऊ शकतो. यानंतर, त्यांना ४५ टक्के महिला मते मिळू शकतात. मात्र ५० टक्के लोक आम आदमी पक्षाच्याच बाजूने असतील. तर काँग्रेसला ४ टक्के आणि इतरांना १ टक्के मते मिळू शकतात. अशा परिस्थितीत आम आदमी पक्षाला ४७.३७ लाख (४७.२९ टक्के) मते मिळू शकतात. तर भाजपला ४५.०५ लाख (४४.९९ टक्के) मते मिळू शकतात. याशिवाय, काँग्रेसला ६.१६ टक्के आणि इतरांना १.५४ टक्के मते मिळू शकतात.

अशा परिस्थितीत, भाजप आणि आम आदमी पक्ष यांच्यात अटीतटीची लढत होऊ शकते. 'आप'ला ३३-३७ जागा मिळू शकतात, तर भाजपला ३३ ते ३६ जागा मिळण्याचा अंदाज आहे. तसेच काँग्रेसलाही एक जागा मिळू शकते.

या परिस्थिती भाजपचा विजय - जर काँग्रेसने २५०० रुपयांच्या 'प्यारी दीदी योजना' आणि इतर मोफत आश्वासनावर चांगला प्रचार केला, तर याचा फटका आम आदमी पक्षाला बसू शकतो. सर्वेक्षणानुसार, काँग्रेसने त्यांच्या आश्वासनांचा चांगला प्रचार केला तर त्यांना ७.५ टक्के मते मिळू शकतात. अशा परिस्थितीत, 'आप'ला ४४.७४ टक्के आणि भाजपला ४६.१६ टक्के मते मिळण्याची अपेक्षा आहे. या परिस्थितीत आम आदमी पक्ष बहुमतापासून दूर राहू शकतो. त्यांना २७ ते ३३ जागा मिळू शकतात. तर, भाजप ३७-४१ जागांपर्यंत मजल मारू शकतो. तर काँग्रेसला ०-२ जागां मिळू शकतात.

टॅग्स :Delhi Assembly Election 2025दिल्ली निवडणूक 2025Narendra Modiनरेंद्र मोदीAam Admi partyआम आदमी पार्टीBJPभाजपाcongressकाँग्रेसArvind Kejriwalअरविंद केजरीवालRahul Gandhiराहुल गांधीdelhi electionदिल्ली निवडणूक