शहरं
Join us  
Trending Stories
1
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
2
Pakistan Water : पाकिस्तानमध्ये पाण्याचं संकट वाढलं! भारतासोबतचा संघर्ष महागात पडला
3
"ऑपरेशन महादेव कालच का झालं?"; अखिलेश यादवांनी सरकारला घेरलं, पुलवामा हल्ल्यातील 'त्या' गाडीबद्दल काय बोलले?
4
BCCI च्या मुंबईतील कार्यालयात चोरी; सुरक्षा रक्षकाने लाखोंच्या मालालवर मारला डल्ला
5
"कलंकित मंत्र्यांचा राजीनामा न घेणाऱ्या सरकारने गोमूत्र शिंपडून त्यांना पवित्र करून घ्यावे", विजय वडेट्टीवार यांची टीका
6
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
7
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
8
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
9
Asia Cup 2025 : रिषभ पंतच्या जागी अकोल्याच्या पठ्ठ्याची होऊ शकते टीम इंडियात एन्ट्री
10
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
11
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
12
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
13
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
14
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
15
गर्लफ्रेंडने ठेवला विश्वास, प्रोत्साहन दिल्याने 'तो' झाला मोठा अधिकारी, कोचिंगशिवाय पास केली JPSC
16
ब्रेक पॅडलखाली अडकली पाण्याची बाटली, भरधाव कार ट्रॉलीमध्ये घुसून दोन व्यावसायिकांचा मृत्यू
17
UPI पेमेंटमध्ये पिनची कटकट संपणार? आता चेहरा दाखवा किंवा बोट लावा, पेमेंट होईल झटक्यात!
18
समसप्तक नवमपंचम गजलक्ष्मी राजयोग: ९ राशींना शुभ वरदान काळ, हाती पैसा राहील; अपार लाभच लाभ!
19
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
20
Video: गाढवाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू

आप की भाजप, दिल्लीत कुणाचं सरकार? मतदानापूर्वीच्या सर्व्हेनं कुणाचं टेन्शन वाढवलं? बघा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2025 14:04 IST

'या' परिस्थिती भाजपचा विजय...!

दिल्ली विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर झाली आहे. यानंतर आता देशाच्या राजधानीत राजकारण चांगलेच तापताना दिसत आहे. सर्वांच्या मनात एकच प्रश्न आहे, तो म्हणजे, यावेळी दिल्लीत कुणाचे सरकार येणार? यातच, विधानसभा निवडणुकीवरील पहिल्या सर्वेक्षणाने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. टाईम्स नाऊ जेव्हीसी पोलमध्ये आप आणि भाजपमध्ये अगदी अटीतटीची लढत होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तीन फॅक्टर्सवर करण्यात आलेल्या या सर्वेक्षणात भाजप सत्तेच्या अगदी जवळ असल्याचे अथवा बहुमताच्याही पुढे जात असल्याचे दिसत आहे. 

जर 'आप'ने केवळ मोफतची आश्वासनं दिली तर काय होईल? - भाजपने अद्याप महिलांसाठी आर्थिक मदतीचे अधिकृत आश्वासन दिलेले नाही. तर दुसरीकडे, आम आदमी पक्षाने दरमहा २१०० रुपये देण्याची घोषणा केली आहे. टाईम्स नाऊ जेव्हीसी सर्व्हेनुसार, या परिस्थितीत आम आदमी पक्षाला थेट फायदा होऊ शकतो. त्यांना ५५ टक्के महिला मते मिळू शकतात. भाजपला ३९%, काँग्रेसला ५% आणि इतरांना १% महिला मते मिळू शकतात.

याच बरोबर, आम आदमी पक्षाला पुरुष आणि महिला मतदारांकडून सुमारे ५१.३० लाख (५१.२०%) मते मिळू शकतात. तर, दुसरीकडे भाजपला ४०.६३ टक्के मतांसह ४०.७० लाख मते मिळू शकतात. तसेच, काँग्रेसला ६.२ टक्के आणि इतरांना १.५४ टक्के मते मिळू शकतात. याशिवाय, जागांसंदर्भात बोलायचे झाल्यास, आम आदमी पक्षाला ५६-६० जागा मिळू शकतात आणि भाजपला १०-१४ जागा मिळू शकतात. अशा परिस्थितीत काँग्रेसचे तर खातेही उघडणार नाही.

काय होऊ शकतो भाजपच्या आश्वासनांचा परिणाम? - या सर्वेक्षणात असेही म्हणण्यात आले आहे की, जर भाजपने महिलांसाठी लाडकी बहीण सारखी योजना आणली, तर त्यांना त्याचा फायदा होऊ शकतो. यानंतर, त्यांना ४५ टक्के महिला मते मिळू शकतात. मात्र ५० टक्के लोक आम आदमी पक्षाच्याच बाजूने असतील. तर काँग्रेसला ४ टक्के आणि इतरांना १ टक्के मते मिळू शकतात. अशा परिस्थितीत आम आदमी पक्षाला ४७.३७ लाख (४७.२९ टक्के) मते मिळू शकतात. तर भाजपला ४५.०५ लाख (४४.९९ टक्के) मते मिळू शकतात. याशिवाय, काँग्रेसला ६.१६ टक्के आणि इतरांना १.५४ टक्के मते मिळू शकतात.

अशा परिस्थितीत, भाजप आणि आम आदमी पक्ष यांच्यात अटीतटीची लढत होऊ शकते. 'आप'ला ३३-३७ जागा मिळू शकतात, तर भाजपला ३३ ते ३६ जागा मिळण्याचा अंदाज आहे. तसेच काँग्रेसलाही एक जागा मिळू शकते.

या परिस्थिती भाजपचा विजय - जर काँग्रेसने २५०० रुपयांच्या 'प्यारी दीदी योजना' आणि इतर मोफत आश्वासनावर चांगला प्रचार केला, तर याचा फटका आम आदमी पक्षाला बसू शकतो. सर्वेक्षणानुसार, काँग्रेसने त्यांच्या आश्वासनांचा चांगला प्रचार केला तर त्यांना ७.५ टक्के मते मिळू शकतात. अशा परिस्थितीत, 'आप'ला ४४.७४ टक्के आणि भाजपला ४६.१६ टक्के मते मिळण्याची अपेक्षा आहे. या परिस्थितीत आम आदमी पक्ष बहुमतापासून दूर राहू शकतो. त्यांना २७ ते ३३ जागा मिळू शकतात. तर, भाजप ३७-४१ जागांपर्यंत मजल मारू शकतो. तर काँग्रेसला ०-२ जागां मिळू शकतात.

टॅग्स :Delhi Assembly Election 2025दिल्ली निवडणूक 2025Narendra Modiनरेंद्र मोदीAam Admi partyआम आदमी पार्टीBJPभाजपाcongressकाँग्रेसArvind Kejriwalअरविंद केजरीवालRahul Gandhiराहुल गांधीdelhi electionदिल्ली निवडणूक