शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
4
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
5
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
6
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
7
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
8
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
11
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
12
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
13
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
14
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
15
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
16
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
17
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
18
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
19
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
20
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...

Arvind Kejriwal : "तुम्ही जितके समन्स पाठवाल, मी तितक्या शाळा बांधेन"; केजरीवाल यांचा केंद्रावर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2024 16:25 IST

Arvind Kejriwal : अरविंद केजरीवाल यांनी ईडीने जारी केलेल्या समन्सवरून केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ईडीने जारी केलेल्या समन्सवरून केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. अरविंद केजरीवाल यांनी तुम्ही आम्हाला जितके समन्स पाठवाल तितक्या आम्ही शाळा उघडू असं म्हटलं आहे. तुम्ही तुमच्या धर्माचं पालन करा, मी माझा धर्माचं पालन करेन, असंही म्हटलं आहे. सोशल मीडिया अकाउंट ट्विटरवर अरविंद केजरीवाल यांनी ट्विट केलं आहे. 

"मी विधानसभेत जाहीर केलं आहे की, मला ईडीकडून आतापर्यंत 8 समन्स पाठवण्यात आले आहेत आणि मी दिल्लीत आणखी आठ नवीन शाळा बांधण्याचा निर्णय घेतला आहे" असं ट्विट केलं आहे. विधानसभेत अर्थसंकल्पावरील चर्चेदरम्यान अरविंद केजरीवाल यांनी मनीष सिसोदिया यांचीही आठवण काढली. सिसोदिया पुढील वर्षी अर्थसंकल्प सादर करतील, अशी आशा व्यक्त केली आहे. ईडीने अनेक समन्स बजावल्यानंतरही अरविंद केजरीवाल हजर झालेले नाहीत.

अरविंद केजरीवाल यांनी ट्विटरवर लिहिलं की, "तुम्ही जितके समन्स पाठवाल, मी तितक्या शाळा बांधेन. तुम्ही तुमच्या धर्माचं पालन करा, मी माझ्या धर्माचं पालन करेन. मी विधानसभेत जाहीर केलं आहे की, आतापर्यंत मला ईडीकडून आठ समन्स आले आहेत. दिल्लीत आणखी आठ नवीन शाळा बांधण्यात येणार आहेत."

अरविंद केजरीवाल यांना समन्स पाठवण्यात आले आहे. न्यायालयाने अरविंद केजरीवाल यांना 16 मार्चला हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. दिल्लीतील कथित दारू घोटाळ्याप्रकरणी ईडीने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना आतापर्यंत 8 समन्स बजावले आहेत. ईडीचे समन्स बेकायदेशीर असल्याचे सांगत दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी प्रत्येक वेळी हजर राहण्यास नकार दिला आहे. 

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयSchoolशाळा