शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! मद्यप्रेमींना घसा ओला करणे आव्हान 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

... त्यामुळे उत्तराखंडमध्ये EVM ऐवजी बॅलेट पेपरने होणार मतदान

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2018 10:50 AM

आगामी निवडणुकांसाठी ईव्हीएमसोबत व्हीव्हीपॅट मशिन जोडण्यात येणार आहे. त्यामुळे कमी कालावधीत अधिकतम सुरक्षा आणि बंदोबस्ताची जबाबदारी निवडणूक आयोगावर आहे.

डेहरादून - उत्तराखंडमध्ये स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका बॅलेट पेपरच्या सहाय्याने घेण्यात येणार आहेत. राज्य निवडणूक आयोगाकडे ईव्हीएम मशिनची संख्या 1790 एवढी आहे. त्यामुळे नवीन मशिनची खरेदी करण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने राज्य सरकारकडे 7 कोटी रुपयांची मागणी केली आहे. मात्र, अद्यापही हे बजेट मंजूर झाले नाही. त्यातच, स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकांची घाई असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

आगामी निवडणुकांसाठी ईव्हीएमसोबत व्हीव्हीपॅट मशिन जोडण्यात येणार आहे. त्यामुळे कमी कालावधीत अधिकतम सुरक्षा आणि बंदोबस्ताची जबाबदारी निवडणूक आयोगावर आहे. तसेच राज्यातील अनेक जिल्ह्यात विस्तारीकरण झाले आहे. त्यामुळे तेथील पालिका क्षेत्रातही बदल झाला आहे. हेही कारण निवडणूक आयोगाकडून पुढे करण्यात येत आहे. डेहरादून, हरिद्वार, हल्द्वानीसह अनेक पालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणात सीमा विस्तार झाला आहे. देहरादून नगर पालिका क्षेत्रात 2013 मध्ये 60 वार्ड होते, तेथे आता 100 वार्ड बनले आहेत. त्यामुळे कमी प्रमाणातच ईव्हीएम मशिनद्वारे निवडणुका होतील. तर निवडणुकांसाठी बॅलेट पेपरचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात येईल.

आमच्याकडे कमी प्रमाणात ईव्हीएम मशिन उपलब्ध आहेत. तर बहुतांश ईव्हीएम मिशनमध्ये बिघाडही आहे. आम्ही हरयाणातून ईव्हीएम मशिन घेण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, ते शक्य झाले नाही. त्यामुळेच एवढ्या कमी कालावधीत ईव्हीएम मशिनच्या सहाय्याने निवडणुका घेणे, त्रासदायक असल्याने आम्ही सर्वच ठिकाणी बॅलेट पेपरच्या सहाय्याने मतदान घेण्याचे ठरवले आहे, असे राज्य निवडणूक आयुक्त चंद्रशेखर भट्ट यांनी सांगितले.  

टॅग्स :Electionनिवडणूक