शहरं
Join us  
Trending Stories
1
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
2
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
3
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
4
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
5
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
6
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
7
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  
8
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
9
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
10
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
11
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
12
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
13
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
14
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
15
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
16
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
17
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
18
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
19
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
20
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?

एनडीएमध्ये काहीतरी गडबड नक्कीच आहे; संजय राऊतांची अकाली दलवरून टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2020 21:57 IST

आम्ही स्वत:हून एनडीए सोडले नाही, ते खोटे राजकारण करत होते. यामुळे आम्हाला एनडीए सोडावे लागले, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.

मुंबई : कृषी विधेयकावरून आज संसदेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये गदारोळ उडाला. या विधेयकावरून विरोधी पक्षांसह मोदी सरकारच्या मित्रांनीही विरोध करण्यास सुरुवात केली आहे. एवढेच नाही तर शिरोमणी अकाली दलाच्या खासदार आणि मंत्री हरसिमरत कौर बादल यांनी गुरुवारी राजीनामा दिला. यावर शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे. 

संजय राऊत यांनी म्हटले की, कृषी विधेयकावरून पंतप्रधान जे सांगत आहेत, तरीही जर एनडीएमधील मित्र पक्षाचा मंत्री राजीनामा देत असेल तर नक्कीच काहीतरी गडबड असल्याची शंका उपस्थित केली आहे. एका वृत्तवाहिनीसोबत बोलताना राऊत यांनी हे वक्तव्य केले आहे. आम्ही स्वत:हून एनडीए सोडले नाही, ते खोटे राजकारण करत होते. यामुळे आम्हाला एनडीए सोडावे लागले. आम्ही एनडीएचे सर्वात जुने सहकारी होतो. इतर पेईंग गेस्ट होते, अशी टीका राऊत यांनी केली आहे. 

कृषी विधेयकावरून राऊत यांनी सांगितले की, एनडीएने कृषी विधेयकावर चर्चा करायला हवी होती. सरकारने सहकारी पक्षांसोबत रणनीतीक चर्चा करायला हवी होती. मात्र, यावर कोणतीही चर्चा झाली नाही. सर्वजण सांगत आहेत की, या विधेयकामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे. पंतप्रधान देशाला सांगत आहेत, की हे विधेयक शेतकऱ्यांविरोधात नाहीय, तरीही जर मंत्री राजीनामा देत असेल तर काहीतरी गडबड आहे, असा संशय राऊत यांनी व्यक्त केला आहे. आधी शिवसेनेने एनडीए सोडले होते, आता अकाली दलाने सोडले आहे, असेही राऊत म्हणाले.  

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाPM Kisan Schemeप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनाShiromani Akali Dalशिरोमणी अकाली दल