शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
4
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
5
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
6
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
7
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
8
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
9
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
10
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
11
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
12
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
13
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
14
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
15
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
16
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
17
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
18
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
19
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
20
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली

एनडीएमध्ये काहीतरी गडबड नक्कीच आहे; संजय राऊतांची अकाली दलवरून टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2020 21:57 IST

आम्ही स्वत:हून एनडीए सोडले नाही, ते खोटे राजकारण करत होते. यामुळे आम्हाला एनडीए सोडावे लागले, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.

मुंबई : कृषी विधेयकावरून आज संसदेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये गदारोळ उडाला. या विधेयकावरून विरोधी पक्षांसह मोदी सरकारच्या मित्रांनीही विरोध करण्यास सुरुवात केली आहे. एवढेच नाही तर शिरोमणी अकाली दलाच्या खासदार आणि मंत्री हरसिमरत कौर बादल यांनी गुरुवारी राजीनामा दिला. यावर शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे. 

संजय राऊत यांनी म्हटले की, कृषी विधेयकावरून पंतप्रधान जे सांगत आहेत, तरीही जर एनडीएमधील मित्र पक्षाचा मंत्री राजीनामा देत असेल तर नक्कीच काहीतरी गडबड असल्याची शंका उपस्थित केली आहे. एका वृत्तवाहिनीसोबत बोलताना राऊत यांनी हे वक्तव्य केले आहे. आम्ही स्वत:हून एनडीए सोडले नाही, ते खोटे राजकारण करत होते. यामुळे आम्हाला एनडीए सोडावे लागले. आम्ही एनडीएचे सर्वात जुने सहकारी होतो. इतर पेईंग गेस्ट होते, अशी टीका राऊत यांनी केली आहे. 

कृषी विधेयकावरून राऊत यांनी सांगितले की, एनडीएने कृषी विधेयकावर चर्चा करायला हवी होती. सरकारने सहकारी पक्षांसोबत रणनीतीक चर्चा करायला हवी होती. मात्र, यावर कोणतीही चर्चा झाली नाही. सर्वजण सांगत आहेत की, या विधेयकामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे. पंतप्रधान देशाला सांगत आहेत, की हे विधेयक शेतकऱ्यांविरोधात नाहीय, तरीही जर मंत्री राजीनामा देत असेल तर काहीतरी गडबड आहे, असा संशय राऊत यांनी व्यक्त केला आहे. आधी शिवसेनेने एनडीए सोडले होते, आता अकाली दलाने सोडले आहे, असेही राऊत म्हणाले.  

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाPM Kisan Schemeप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनाShiromani Akali Dalशिरोमणी अकाली दल