शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
3
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
4
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार
5
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
6
दुसऱ्यांचा विनाश करणे हा धर्म नाही अधर्म आहे, शिक्षा झालीच पाहिजे - प्रेमानंद महाराज
7
‘पत्नीचे अनेक तरुणांशी अनैतिक संबंध, नशेच्या धुंदीत घालतात धिंगाणा, करतात अश्लील चाळे ’, पतीचे गंभीर आरोप, पुरावेही दिले   
8
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
9
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
10
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
11
जिद्द असावी तर अशी! अंगणवाडी ते IAS अधिकारी; ३ वेळा अपयश, मानली नाही हार, रचला इतिहास
12
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
13
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
14
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
15
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
16
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
17
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
18
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
19
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
20
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'

एनडीएतून शिवसेना बाहेर पडण्यावर राजनाथ सिंह म्हणाले,"काही पक्ष जातात, तर काही..."

By जयदीप दाभोळकर | Updated: January 17, 2021 08:32 IST

शिवसेना आणि अकाली शिरोमणी दलानं एनडीएतून बाहेर पडण्याचा घेतला होता निर्णय

ठळक मुद्देयोगी आदित्यनाथ उत्तम मुख्यमंत्री, राजनाथ सिंह यांचं वक्तव्यदेशातील जनतेला शास्त्रज्ञ, डॉक्टरांवर विश्वास, लसीकरणाबाबत म्हणाले राजनाथ सिंह

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी एका कार्यक्रमादरम्यान उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचं कौतुक केलं. एका कार्यक्रमादरम्यान विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी आपलं मत व्यक्त केलं. याव्यतिरिक्त राजनाथ सिंह यांनी शेतकरी आंदोलन, सीमांचं संरक्षण, कोरोना लसीकरणासह  अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. यावेळी त्यांनी शिवसेना आणि शिरोमणी अकाली दलाच्या एनडीएतून बाहेर पडण्यावरही आपलं मत व्यक्त केलं. योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांची कामगिरी ए वन असल्याचं राजनाथ सिंह म्हणाले. आतापर्यंतच्या सर्व मुख्यमंत्र्यांपेक्षा योगी आदित्यनाथ यांची कामगिरी उत्तम वाटते का? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. "मी कोणाचीही तुलना करू इच्छीत नाही. परंतु मी योगी आदित्यनाथ यांना माझ्यापेक्षा उत्तम मुख्यमंत्री मानतो," असं सिंह म्हणाले. आजतक या वाहिनीच्या 'सीधी बात' या कार्यक्रमात ते सहभागी झाली होते. या कार्यक्रमात त्यांनी अनेक प्रश्नांची दिलखुलासपणे उत्तरं दिली."योगी आदित्यनाथ हे प्रत्येकाच्या विकासासाठी काम करत आहेत. त्यांनी आपलं जीवन जनतेसाठी समर्पित केलंय. त्यांची उत्तर प्रदेशातील कामगिरी उत्तमच आहे," असंही ते म्हणाले. यावेळी त्यांना पश्चिम बंगालच्या निवडणुकांबद्दलही प्रश्न विचारण्यात आला. यावर त्यांनी भाजपाला निवडणुकीत विजय मिळे, असा विश्वास व्यक्त केला.  यावेळी त्यांना शिवसेना आणि शिरोमणी अकाली दलासारख्या जुन्या सहकारी पक्षांच्या एनडीएतून बाहेर पडण्यावरही प्रश्न विचारण्यात आला. "काही नवे पक्ष येतात काही जातात. जर कोणत्या पक्षाला आपल्या युती धर्माचं पालन करता येतं तर तो भाजपा आहे," असा दावाही त्यांनी प्रश्नाचं उत्तर देताना केला.देशातील जनतेला विश्वासयावेळी जनतेच्या मनात विश्वास वाढवण्यासाठी इतर देशातील नेत्यांप्रमाणेच आपल्या देशातही नेत्यांनी लस घेतली पाहिजे होती का, अशा प्रश्न राजनाथ सिंह यांना विचारण्यात आला. "इतर देशातील लोकांप्रमाणे आपल्या देशातील जनता विचार करेल असं मला वाटत नाही. कारण कोरोनावरील लसीची अंतिम चाचणी झाली आहे. देशातील शास्त्रज्ञ आणि डॉक्टरांनी ही चाचणी घेतली आहे. मला वाटते की देशातील जनतेचा या लोकांवर विश्वास आहे. तसेच आम्हीही जनतेला विश्वास देत आहोत. दरम्यान, कोविड-१९ च्या आव्हानाचा देशातील जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ज्या प्रकारे केला, त्याचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे," असं राजनाथ सिंह यांनी सांगितलं.

टॅग्स :BJPभाजपाShiv SenaशिवसेनाShiromani Akali Dalशिरोमणी अकाली दलFarmer strikeशेतकरी संपCorona vaccineकोरोनाची लसUddhav Thackerayउद्धव ठाकरेNarendra Modiनरेंद्र मोदीUttar Pradeshउत्तर प्रदेशyogi adityanathयोगी आदित्यनाथ