शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

एलिव्हेटेड रेल्वेबाबत निर्णय मार्चमध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2017 06:17 IST

मुंबईत होणा-या देशातील पहिल्या एलिवेटेड (उंचीवरुन) रेल्वे लाइनचे रंग रुप कसे असेल? याचा निर्णय नव्या वर्षात होणार आहे. रेल्वेच्या म्हणण्यानुसार, मार्चपर्यंत यावर निर्णय घेण्यात येणार आहे.

संतोष ठाकूर नवी दिल्ली : मुंबईत होणा-या देशातील पहिल्या एलिवेटेड (उंचीवरुन) रेल्वे लाइनचे रंग रुप कसे असेल? याचा निर्णय नव्या वर्षात होणार आहे. रेल्वेच्या म्हणण्यानुसार, मार्चपर्यंत यावर निर्णय घेण्यात येणार आहे. मुंबईत चर्चगेट - विरार आणि सीएसटी - पनवेल दरम्यान एलिवेटेड रेल्वे लाइन करण्याची घोषणा रेल्वे बजेटमध्ये करण्यात आली होती. मुंबईची लाइफ लाइन समजल्या जाणाºया रेल्वे लाइनवरील प्रवाशांचा वाढता ताण कमी करणे आणि प्रवाशांचा प्रवास अधिक सुविधाजनक करणे, हा यामागचा उद्देश आहे. रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष अश्वनी लोहानी यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले की, आगामी तीन महिन्यात आम्ही या प्रकरणी निर्णयाप्रत येऊ. या विषयावर सुरु असलेला अभ्यास फेब्रुवारीच्या अखेरपर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. याच्या आधारावर पुढील निर्णय घेण्यात येणार आहे.रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष अश्वनी लोहानी यांनी सांगितले की, मुंबईतील लाइन्सवर निश्चितपणे ताण वाढत आहे. त्यामुळे अशा प्रकारचा प्रस्ताव दिलासा देणारा आहे. पण, आमचा निर्णय याबाबतच्या अहवालावरुनच ठरणार आहे. जर अहवालात या लाइन्स बनविण्याबाबत सकारात्मक मत आले तर, सद्याच्या लाइन्सच्या अगदी वर न करता त्या लाइनसोबत बनविण्यात येतील. अर्थात, यासाठी प्रवेश आणि बाहेर जाण्याचा मार्ग सद्याच्या रेल्वे स्टेशनमधूनच असेल. यासाठी शिड्या आणि लिफ्ट असेल. मुंबईतील लाइफ लाइन दुरुस्तीसाठी रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी निर्देश दिले आहेत आणि नियमित समीक्षा बैठक घेत आहेत.एका अधिकाºयाने सांगितले की, गत रेल्वे बजेटमध्ये या लाइन्सचा उल्लेख होता. या लाइन मेट्रो नेटवर्कशी लिंक करण्यासोबतच मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट आणि प्रस्तावित नवी मुंबई एअरपोर्टशी जोडण्याचाही प्रस्ताव आहे. हा रेल्वेमार्ग जमीनीपासून किती उंचीवर असेल किंवा काही ठिकाणी जमीनीच्या खालीही असेल याबाबतची माहिती अभ्यास अहवालातून समोर येईल. त्याआधारे रेल्वे पुढचे पाऊल टाकणार आहे.>एका अधिकाºयाने सांगितले की, एक विचार असाही आहे की, दिल्ली एअरपोर्ट लाइनप्रमाणेच एलिवेटेड रोडवर विशेष रेल्वे एअरपोर्ट कनेक्टिव्हिटीसाठी चालविली जावी. यामुळे उत्पन्न काही प्रमाणात वाढविता येईल. पश्चिम आणि सेंट्रल रेल्वेचा असाही सल्ला आहे की, या प्रस्तावित एलिवेटेड लाइनवर एसी रेल्वेही चालविली जावी. याबाबत प्रारंभिक स्तरावर रेल्वे मंत्रालय सहमत आहे.

टॅग्स :Mumbaiमुंबई