शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
2
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
3
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
4
शेतकरी संकटात असताना केंद्राकडून सत्तेचा गैरवापर सुरू ; शरद पवार यांची टीका
5
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
6
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
7
भाजपने १२ केंद्रीय मंत्र्यांना तिकीट नाकारले; निकालावर ११ केंद्रीय मंत्र्यांचे भवितव्य ठरणार
8
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
9
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
10
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती
11
या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी
12
नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज
13
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
14
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
15
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
16
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
17
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
18
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
19
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
20
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 

बदलापुरातील तरुणाचा उत्तराखंडमध्ये मृत्यू, महाराष्ट्रातील सर्व गिर्यारोहकांची सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2018 6:31 AM

गिर्यारोहणासाठी गेलेल्या व हिमाचल प्रदेश व उत्तराखंडच्या डोंगराळ भागात रस्ता चुकलेल्या सर्व गिर्यारोहकांची इंडो-तिबेटियन पोलिसानी सुटका केली आहे.

उत्तरकाशी/मुंबई : गिर्यारोहणासाठी गेलेल्या व हिमाचल प्रदेश व उत्तराखंडच्या डोंगराळ भागात रस्ता चुकलेल्या सर्व गिर्यारोहकांची इंडो-तिबेटियन पोलिसानी सुटका केली आहे. त्यात सहभागी झालेल्या हर्षद आपटे यांचा मृत्यू झाला आहे. एकूण २३ जण तिथे अडकले होते. हर्षद आपटे (वय ३३ वर्षे) हे बदलापूर येथे राहत होते.या गिर्यारोहकांत महाराष्ट्रातील ९ जण होते. त्यापैकी चार बदलापूरचेच होते. शिवाय फरिदाबादचा एक व एक मेक्सिकन दाम्पत्य होते. या सर्र्वासोबत एक मार्गदर्शक, एक ट्रेक लीडर व ८ हमालही होते. गिर्यारोहकांमध्ये चार महिला होत्या. रस्ता चुकल्याचे कळताच, त्यांच्यातील दोन हमालांनी कसेबसे खाली उतरून इंडो-तिबेटियन पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर, त्यांचा शोध सुरू झाला. मात्र, रस्ता चुकण्याआधीच हर्षद आपटे यांना श्वसनाचा त्रास होऊ लागला. त्यामुळे ते वरपर्यंत गेले नव्हते. त्यांचे आधीच निधन झाले. ट्रेकर्सची सुटका करताना, त्यांनाही बाहेर आणण्यात आले आहे.उत्तरकाशी व हिमाचल प्रदेशातील डोंगराळ भागातून त्यांची सुटका करण्यात आली. उत्तराखंडच्या संकारी भागात हे गिर्यारोहक गेले होते. तेथून हिमाचल प्रदेशातील सांगला येथे निघाले असताना, ते हर की डून या ठिकाणीही पोहोचले. तिथून राणीकंदमार्गे चित्कुलला जाताना ते रस्ता चुकल्याने दोन दिवस त्यांचा कोणाशीही संपर्क झाला नव्हता. त्यांच्या बचावासाठी इंडो-तिबेटियन पोलिसांनी मोहीम हाती घेतली होती. तिथे जोरदार बर्फवृष्टी होत असल्याने गिर्यारोहकांचा शोध घेण्यात खूप अडचणी येत होत्या. हर्षदसोबत बदलापूरचे जयेश लिमये, प्रशांत कापडे, प्रसाद नरसाळ आणि मयुरेश जोशी हे चार ट्रेकर्स होते. त्यांचे ११ जणांचे पथक बेस कॅम्पकडे येत असताना, हर्षदला श्वसनाचा त्रास झाला.>कुटुंबीय झाले रवानाआपला ट्रेक पूर्ण करून हे सारे जण बेस कॅम्पकडे निघाले असताना, हर्षद आपटे यांना श्वास घेण्यास त्रास व्हायला लागला. त्यांना खाली आणण्याचा प्रयत्न सुरू असतानाच, त्यांचे वाटेत निधन झाले. त्यांचे कुटुंबीय उत्तराखंडला रवाना झाले आहेत. हर्षद आपटे विवाहित असून, त्यांना पाच वर्षांची एक मुलगीही आहे. त्यांनी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी गिर्यारोहण केले आहे, पण या भागात ते पहिल्यांदाच गेले होते, असे सांगण्यात आले. बदलापूर (पूर्व) येथील गांधी चौक भागात त्यांचे घर आहे.