शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅक टू बॅक! उद्धव ठाकरे कणकवलीत सभा घेणार, दुसऱ्याच दिवशी राज यांचीही तोफ धडाडणार
2
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
3
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
4
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू
5
“शिवसेना-मनसेचा डीएनए एकच, विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून केवळ टीका सुरु”: श्रीकांत शिंदे
6
शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आम्ही केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल
7
Sunita Kejriwal : "...तर काय 10 वर्षे जेलमध्ये ठेवणार का?, ही हुकूमशाही"; सुनीता केजरीवाल यांचा संतप्त सवाल
8
जोरदार शक्तिप्रदर्शन, श्रीकांत शिंदेंचा उमेदवारी अर्ज दाखल; महायुतीच्या विकास रथावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री
9
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
10
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
11
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा
12
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 
13
SPARC shares: १४ दिवसांपासून घसरत होता शेअर, ४९% नी आपटला; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
14
उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका; रोजच्या आहारात करा आवश्यक बदल!
15
"अनंत गीतेंचे आयुष्य धर्माच्या नावाखाली निवडणूक लढण्यात गेले, ही निवडणूक भवितव्य घडवणारी"
16
'उर्दू भाषेसोबत अन्याय का?' संजय लीला भन्साळींची 'हीरामंडी'सीरिज पाहून भडकला शीजान खान
17
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!
18
तुम्हाला ‘श्री स्वामी समर्थ’ नामाचा अर्थ माहिती आहे का? प्रभावी मंत्र अन् सुखी जीवनाची वचने
19
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : उद्धव ठाकरेंकडूनच कोल्हापूरच्या गादीचा अपमान, उदय सामंत यांचा आरोप
20
सर्पदंशाने तरुणाचा मृत्यू; जिवंत करण्यासाठी मृतदेह दोन दिवस गंगेच्या पाण्यात लटकवला...

...तर बलात्‍कार्‍यास फाशी!, अल्पवयीन मुलींवरील अत्याचार रोखण्यासाठी विधेयक

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2018 12:46 PM

महिलांवर होणारे अत्याचार सातत्याने वाढत आहेत. बलात्कार, विनयभंग यांसारख्या घटना रोखण्यासाठी सरकार, पोलिसांकडून प्रयत्न केले जात आहेत. तसेच महिलांना यांसारख्या घटनांपासून बचाव करण्यासाठी आवश्यक प्रशिक्षणही दिले जात आहे.

नवी दिल्ली - महिलांवर होणारे अत्याचार सातत्याने वाढत आहेत. बलात्कार, विनयभंग यांसारख्या घटना रोखण्यासाठी सरकार, पोलिसांकडून प्रयत्न केले जात आहेत. तसेच महिलांना यांसारख्या घटनांपासून बचाव करण्यासाठी आवश्यक प्रशिक्षणही दिले जात आहे. पण हरयाणा सरकारने बलात्काराच्या घटना रोखण्यासाठी कठोर पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला आहे. मध्यप्रदेशपाठोपाठ आता हरयाणातही बारा वर्षापर्यंतच्या मुलींवर बलात्कार करणाऱ्यास फाशीची शिक्षा ठोठावण्यात येणार आहे. या शिक्षेची तरतूद असणारं विधेयक लवकरच विधानसभेत आणणार असल्याची माहिती मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी दिली आहे. याशिवाय बलात्काराच्या घटना रोखण्यासाठी आणि पीडितांना लवकरात लवकर न्याय देण्यासाठी फास्ट ट्रॅक कोर्टची स्थापना करण्याचा विचार सुरू असल्याचंही त्यांनी सांगितलं. 

साधारणपणे बलात्काराच्या 75 टक्के घटनांमध्ये जवळचे नातेवाईकच असतात, असं मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी सांगितलं. राज्यातील बलात्काराच्या घटनांचा तपास करण्यासाठी पोलीस दिवस रात्र मेहनत घेत असून लवकरच आरोपींना अटक करण्यात येणार असल्याचं आश्वासनही त्यांनी दिलं. या आधी मध्यप्रदेश सरकारने बलात्काराच्या घटना रोखण्यासाठी बारा वर्षाखालील मुलींवर बलात्कार करणाऱ्यास फाशीची शिक्षा ठोठावण्याचं विधेयक मंजूर केलं होतं.  

असा आहे मध्यप्रधेशमधील नवा कायदा - 

नॅशनल रेकॉर्ड ब्युरोच्या ताज्या आकडेवारीवरुन टीकेचा भडीमार सहन करणार्‍या मध्यप्रदेश सरकारने सोमवारी एक मजबूत पाऊल टाकले आहे. येथील विधानसभेने दंड विधी सुधारीत विधेयकास एकमताने मंजुरी दिली असून यावर राष्ट्रपतींच्या मान्यतेची मोहोर उमटताच याला कायद्याचे स्वरुप प्राप्‍त होणार आहे. या विधेयकात 12 वर्षांच्या आतील मुलीवर बलात्कार केल्यास फाशीच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. नॅशनल रेकॉर्ड ब्युरोच्या आकडेवारीनुसार, मध्यप्रदेशात देशातील सर्वात जास्त बलात्काराच्या घटना घडल्या आहेत. विशेष म्हणजे शिवराजसिंग चौहान यांनी मुख्यमंत्री म्हणून आपल्या कारकिर्दीची 12 वर्षे पूर्ण केल्यानंतर ही आकडेवारी जाहीर झाली आहे.  या पार्श्‍वभूमीवर ‘12 साल बेमिसाल’ या भाजपच्या नार्‍याला ‘12 साल प्रदेश बेहाल’ असे विरोधकांनी उत्तर दिले आहे. 

जे लोक 12 वर्षांपर्यंतच्या निरागस मुलींवर बलात्कार करतात ते माणूस नसून पिशाच आहेत. त्यांना जगण्याचा कोणताही अधिकार नाही. इतकेच नव्हे तर महिलेचा सातत्याने पाठलाग करणे हाही आता अजामीनपात्र गुन्हा ठरणार आहे. महिलांसंदर्भातील गुन्हेगारी रोखण्यासाठी जनजागृतीचाही आधार घेतला जाणार असल्याचे विधेयकास मंजुरी मिळाल्यानंतर मुख्यमंत्री चौहान यांनी विधानसभेत बोलताना सांगितले.

टॅग्स :Rapeबलात्कारCrimeगुन्हाHaryanaहरयाणा