शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
8
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

नाशिकमध्ये अग्निवीरांचा मृत्यू; राहुल गांधींचे पंतप्रधान मोदी-राजनाथ सिंहांना तीन सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2024 18:10 IST

Rahul Gandhi Agniveer News: नाशिकमधील देवळाली कॅम्पमध्ये दोन अग्निवीरांचा प्रशिक्षण सुरू असताना झालेल्या स्फोटात मृत्यू झाला. या घटनेवरून राहुल गांधी भाजपा काही सवाल केले आहेत.

Rahul Gandhi Agniveer Tweet: प्रशिक्षण सुरू असताना तोफेचा बॉम्बगोळा फुटला आणि या स्फोटात दोन अग्निवीरांचा मृत्यू झाला. नाशिकमधील देवळाली कॅम्पमध्ये ही घटना घडली. या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला असून, आता विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी भाजपा सरकार पुन्हा एकदा अग्निवीर योजनेवरून घेरले आहे.  

गोहिल विश्वराज सिंग (वय २०) आणि सैफत शीत (वय २१) अशी दोन्ही अग्निवीरांची नावे आहेत. त्याच्या मृत्युबद्दल राहुल गांधींनी शोक व्यक्त केला. 'नाशिकमध्ये प्रशिक्षणादरम्यान दोन अग्निवीर गोहिल विश्वराज सिंग आणि सैफत शीत यांचं निधन वेदनादायी आहे. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी आहे", असे राहुल गांधी  म्हणाले. 

"या घटनेने पुन्हा एकदा अग्निवीर योजनेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत, ज्यांची उत्तर देण्यात भाजपा सरकार अपयशी ठरले आहे. गोहिल आणि सैफतच्या कुटुंबीयांना वेळेवर भरपाई मिळेल का, जी कोणत्याही शहीद जवानाला दिली जाते इतकी असेल?", असा सवाल राहुल गांधींनी उपस्थित केला आहे. 

"जवान शहीद झाल्यावर भेदभाव का?"

राहुल गांधी पुढे म्हणाले की, "अग्निवीरांच्या कुटुंबीयांना पेन्शन आणि अन्य सरकारी सुविधांचा लाभ का मिळणार नाही? जर दोन्ही सैनिकांच्या जबाबदाऱ्या आणि बलिदान समान आहे, तर ते शहीद झाल्यानंतर हा भेदभाव का", असा प्रश्न राहुल गांधींनी भाजपा सरकारला केला आहे.

पंतप्रधान आणि संरक्षण मंत्र्यांनी उत्तर द्यायला पाहिजे -राहुल गांधी 

"अग्निपथ योजना लष्करासोबत अन्याय आणि आपल्या वीर जवानांच्या बलिदानाचा अपमान आहे. एका जवानाचे आयुष्य दुसऱ्या जवानापेक्षा अधिक मूल्यवान आहे का, याचं पंतप्रधान आणि संरक्षण मंत्र्यांनी उत्तर द्यायला पाहिजे", असे म्हणत राहुल गांधींनी पंतप्रधान मोदी आणि राजनाथ सिंह यांना घेरले.

"या, मिळून या अन्यायाविरोधात उभे राहूयात. भाजपा सरकारची अग्रिवीर योजना हटवण्यासाठी, देशातील तरुणांचं आणि लष्कराचं भविष्य सुरक्षित करण्यासाठी आमच्या जय जवान आंदोलनात आजच सहभागी व्हा", असे आवाहनही राहुल गांधींनी केलं आहे.  

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीAgneepath Schemeअग्निपथ योजनाcongressकाँग्रेसBJPभाजपा