शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
3
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
4
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
5
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
6
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
7
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
8
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
9
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
10
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
11
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
12
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
13
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
14
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
15
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
16
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
17
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
18
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
19
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
20
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?

मागे-पुढे न बघता सुसाट निघालेल्यांना दुप्पट वेगाने गाठतोय मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2023 09:51 IST

१७ वर्षांत रस्ते अपघातांत २३ लाख जणांचा बळी; गंभीर जखमींची संख्या ८२ लाखांवर

चंद्रकांत दडस

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: रस्ते गुळगुळीत असोत, ऐसपैस असोत की सहापदरी असोत. वाहतूक नियमांचे पालन न केल्यास अपघात ठरलेला आहे, हे गेल्या १७ वर्षांतील आकडेवारीतून समोर येते. २००५ ते २०२१ या १७ वर्षांमध्ये देशात रस्ते अपघातात तब्बल २३ लाखजणांचा बळी गेला असून, ८१ लाख ७० हजारांपेक्षा अधिक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.

वाढत्या लोकसंख्येनुसार अपघातांची संख्या दरवर्षी काही प्रमाणात कमी-अधिक होत असली तरी हे प्रमाण २१.६ टक्क्यांवरून वाढून ३७.३ टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. रस्ते अधिक चांगले झाल्यामुळे वाहनांचा वेग वाढला. मात्र, हाच वेग अपघाताचे मोठे कारण ठरत असल्याचे केंद्र सरकारच्या एनसीआरबी अहवालातून समोर येते.

वाहनांची संख्या झाली प्रचंड

१९७० मध्ये प्रति किमी वाहनांची संख्या केवळ १.२ होती. त्यामध्ये दरवर्षी मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळते. २००० मध्ये हे प्रति १ किमीवर १४.७ वाहने रस्त्यावर होती. २०१० मध्ये हेच प्रमाण २७.९ वर पोहोचले होते. २०१० नंतरही वाहन संख्येत मोठी वाढ झाली आहे.

रस्ते सुधारले, मृत्यू वाढले...

१९७० ते २०१० पर्यंत प्रत्येक वर्षी रस्ते अपघातांमध्ये वाढ होत होती. २०१० मध्ये ही वाढ सर्वाधिक होती. मात्र, रस्ते वाहतुकीचे जाळे मोठ्या प्रमाणात विस्तारले गेल्याने २०१० नंतर रस्ते अपघातांचे प्रमाण कमी कमी होत गेले आहे. मात्र, त्याचवेळी २०१० पासून रस्ते अपघातातील मृत्यूंचे प्रमाण मात्र वाढले आहे.

असे वाढत गेले मृत्यू

वर्ष    अपघात    मृत्यू    जखमी१९७०    ११४    १५    ७० १९८०    १५३    २४    १०९ १९९०    २८३    ५४    २४४ २०००    ३९१    ७९    ३९९ २०१०    ५००    १३५    ५२८ २०२०    ३६६    १३१    ३४८(एक किलोमीटर अंतरात झालेले अपघात)

काय सांगते आकडेवारी

एकूण अपघात -- जखमी -- मृत्यू

  • २००५ -- ४,३९,२५५ -- ४,६५,२८२ -- ९४,९६८
  • २००८ -- ४,८४,७०४ -- ५,२३,१९३ -- १,१९,८६०
  • २०१० -- ४,९९,६२८ -- ५,२७,५१२ -- १,३४,५१३
  • २०१४ -- ४,८९,४०० -- ४,९३,४७४ -- १,३९,६७१
  • २०१८ -- ४,६७,०४४ -- ४,६९,४१८ -- १,५१,४१७
टॅग्स :AccidentअपघातIndiaभारत