शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
2
नेपाळचे नवे सत्ताधीश कोण? जेन झी ठरविणार, सुशीला कार्की, बालेंद्र शाह, कुलमान घिसिंग चर्चेत
3
मुंबई, पुणे, कोल्हापूर, लातूरचे १०० जण अडकले नेपाळमध्ये; प्रवास टाळा, राज्यातील पर्यटकांना सरकारच्या सूचना 
4
पेट्रोल-डिझेल जीएसटी अंतर्गत येऊ शकतात का? सीबीआयसी अध्यक्षांनी सांगितली आतली बातमी
5
नेपाळचं नेतृत्व करण्यास सज्ज झालेल्या सुशीला कार्की यांनी नरेंद्र मोदी आणि भारताबाबत केलं मोठं विधान, म्हणाल्या... 
6
सर्वसामान्यांमध्ये मोठी क्रेझ असणाऱ्या 'Hero Passion+' दुचाकीची GST कपातीनंतर नवीन किंमत काय?
7
Pune Accident : पुण्यात डीजेच्या गाडीने सहा जणांना चिरडले, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू; सह जण जखमी
8
भयंकर! ज्या प्रियकराच्या मदतीनं पतीच्या हत्येचा रचला कट; त्याचाच मृतेदह झाडाला लटकलेला आढळला
9
"त्यांचं रिलेशनशिप टॉक्झिक होतं", कुमार सानू आणि कुनिकाच्या अफेअरबद्दल लेक अयान म्हणाला- "आई आजही..."
10
"धोनीने मला 'सरडा' बनायला भाग पाडलं..."; दिनेश कार्तिकने सांगितलं टीम इंडियाचं मोठं गुपित
11
Stock Markets Today: सुस्त सुरुवातीनंतर शेअर बाजारात पुन्हा खरेदी, Nifty २५,००० च्या जवळ; Adani Ports, TCS, NTPC टॉप गेनर्स
12
'ठाकरे गटाच्या पाच आणि शरद पवार यांच्या पक्षाच्या काही खासदारांनी क्रॉस व्होटिंग केले'; नव्या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
13
लोन घेणाऱ्यांसाठी दिलासा! 'या' सरकारी बँकेनं कर्जाचे दर केले स्वस्त, EMI चा भार होणार कमी
14
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
16
आरजेडीच्या नेत्याची हॉटेलमध्ये घुसून हत्या, विधानसभा निवडणूक लढवण्याची करत होता तयारी
17
केवळ ₹५ लाखांपासून ते ₹२.६४ कोटींचा प्रवास! आपल्या मुलांना द्या हे फायनान्शिअल फ्रीडमचं गिफ्ट; कम्पाऊंडींगची जादू पाहा
18
समीकरणे बदलली अन् अशी वाढत गेली ठाकरे बंधूंची जवळीक; युती होण्याच्या चर्चेने कार्यकर्त्यांत उत्सुकता
19
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
20
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार

इथे ओशाळली माणुसकी! अंत्यसंस्काराला कोणीच न आल्याने मुलीने एकटीने केलं सगळं पण श्राद्धाचं जेवायला 150 जण हजर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2021 22:02 IST

CoronaVirus Marathi News and Live Updates : आपलेही परके झाल्याचं चित्र अनेक ठिकाणी पाहायला मिळालं. याच दरम्यान माणुसकीला काळीमा फासणारी एक घटना समोर आली आहे. 

नवी दिल्ली - देशात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. रुग्णांच्या संख्येने तब्बल दोन कोटींचा टप्पा पार केला असून तीन लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी विविध उपाय केले जात आहेत. वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याच दरम्यान अनेक धक्कादायक घटना समोर येत आहेत. कोरोनाच्या या महाभयंकर संकटात अनेकांनी आपल्या जवळची माणसं गमावली आहेत. तसेच आपलेही परके झाल्याचं चित्र अनेक ठिकाणी पाहायला मिळालं. याच दरम्यान माणुसकीला काळीमा फासणारी एक घटना समोर आली आहे. 

एका महिलेला कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला. त्यावेळी गावकऱ्यांनी मदतीचा हात दिला नाही. महिलेच्या अंत्यसंस्कारासाठी गावातलं कोणीही पुढे आलं नाही. त्यामुळे शेवटी एकट्या मुलीनेच पीपीई किट घालून आपल्या आईचे अंत्यविधी पूर्ण केले. मात्र धक्कादायक बाब म्हणजे श्राद्ध किंवा जेवणाच्या कार्यक्रमावेळी मात्र तब्बल दीडशेहून अधिक लोकांनी हजेरी लावल्याची माहिती आता समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी एकटी मुलगी आपल्या आईचे अंत्यविधी करत असल्याचा फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला होता. त्यावेळी तिला कोणीच मदत केली नाही. 

मुलीने एकटीनेच सर्व काही केलं. मात्र त्यानंतर असलेल्या जेवणासाठी 150 लोकांनी हजेरी लावली. मृत्यूनंतर प्रथेप्रमाणे केलेल्या एका जेवणाच्या कार्यक्रमासाठी घेतलेलं कर्ज फेडण्यासाठी आता या मुलीला बरेच कष्ट करावं लागत आहे. पडेल ते काम करावे लागत आहे. बिहारमधील एका गावात ही घटना घडली आहे. या गावातील वीरेन मेहता यांच्या कुटुंबाला कोरोनामुळं बरंच काही गमवावं लागलं. ते स्वतः डॉक्टर म्हणून गावात काम करायचे. रुग्णांची सेवा करता करता त्यांनाही कोरोनाची लागण झाली. त्यांच्यानंतर त्यांच्या पत्नीलादेखील कोरोनाची लागण झाली. चार दिवसांच्या अंतरात दुर्दैवानं या दोघांचाही मृत्यू झाला. 

गावचे सरपंच सरोज कुमार मेहता यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या पंधरा दिवसांत गावातील दोन डॉक्टरांसह चार लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यांनी सांगितलं की, या दोघांच्या मृत्यूनंतर जेवणाच्या कार्यक्रमावेळी दीडशेहून अधिक लोक आले होते. त्यांची मोठी मुलगी सोनी लहान भाऊ बहीण नितीश आणि चांदणीची काळजी घेत असते. गावात कोरोनामुळे सध्या खूपच बिकट स्थिती आहे. गावात 200 लोकांनी कोरोनाची लस घेतली आहे. कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या जास्त आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतDeathमृत्यू