शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

इथे ओशाळली माणुसकी! अंत्यसंस्काराला कोणीच न आल्याने मुलीने एकटीने केलं सगळं पण श्राद्धाचं जेवायला 150 जण हजर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2021 22:02 IST

CoronaVirus Marathi News and Live Updates : आपलेही परके झाल्याचं चित्र अनेक ठिकाणी पाहायला मिळालं. याच दरम्यान माणुसकीला काळीमा फासणारी एक घटना समोर आली आहे. 

नवी दिल्ली - देशात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. रुग्णांच्या संख्येने तब्बल दोन कोटींचा टप्पा पार केला असून तीन लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी विविध उपाय केले जात आहेत. वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याच दरम्यान अनेक धक्कादायक घटना समोर येत आहेत. कोरोनाच्या या महाभयंकर संकटात अनेकांनी आपल्या जवळची माणसं गमावली आहेत. तसेच आपलेही परके झाल्याचं चित्र अनेक ठिकाणी पाहायला मिळालं. याच दरम्यान माणुसकीला काळीमा फासणारी एक घटना समोर आली आहे. 

एका महिलेला कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला. त्यावेळी गावकऱ्यांनी मदतीचा हात दिला नाही. महिलेच्या अंत्यसंस्कारासाठी गावातलं कोणीही पुढे आलं नाही. त्यामुळे शेवटी एकट्या मुलीनेच पीपीई किट घालून आपल्या आईचे अंत्यविधी पूर्ण केले. मात्र धक्कादायक बाब म्हणजे श्राद्ध किंवा जेवणाच्या कार्यक्रमावेळी मात्र तब्बल दीडशेहून अधिक लोकांनी हजेरी लावल्याची माहिती आता समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी एकटी मुलगी आपल्या आईचे अंत्यविधी करत असल्याचा फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला होता. त्यावेळी तिला कोणीच मदत केली नाही. 

मुलीने एकटीनेच सर्व काही केलं. मात्र त्यानंतर असलेल्या जेवणासाठी 150 लोकांनी हजेरी लावली. मृत्यूनंतर प्रथेप्रमाणे केलेल्या एका जेवणाच्या कार्यक्रमासाठी घेतलेलं कर्ज फेडण्यासाठी आता या मुलीला बरेच कष्ट करावं लागत आहे. पडेल ते काम करावे लागत आहे. बिहारमधील एका गावात ही घटना घडली आहे. या गावातील वीरेन मेहता यांच्या कुटुंबाला कोरोनामुळं बरंच काही गमवावं लागलं. ते स्वतः डॉक्टर म्हणून गावात काम करायचे. रुग्णांची सेवा करता करता त्यांनाही कोरोनाची लागण झाली. त्यांच्यानंतर त्यांच्या पत्नीलादेखील कोरोनाची लागण झाली. चार दिवसांच्या अंतरात दुर्दैवानं या दोघांचाही मृत्यू झाला. 

गावचे सरपंच सरोज कुमार मेहता यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या पंधरा दिवसांत गावातील दोन डॉक्टरांसह चार लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यांनी सांगितलं की, या दोघांच्या मृत्यूनंतर जेवणाच्या कार्यक्रमावेळी दीडशेहून अधिक लोक आले होते. त्यांची मोठी मुलगी सोनी लहान भाऊ बहीण नितीश आणि चांदणीची काळजी घेत असते. गावात कोरोनामुळे सध्या खूपच बिकट स्थिती आहे. गावात 200 लोकांनी कोरोनाची लस घेतली आहे. कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या जास्त आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतDeathमृत्यू