शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
2
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
3
ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
4
...जेव्हा गुंडच पोलिसांच्या कॉलरला हात घालतात; कांदिवलीत ५ अटकेत
5
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
6
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
7
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
8
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
9
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
10
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
11
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
12
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
13
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
14
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
15
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
16
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
17
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
18
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
19
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
20
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
Daily Top 2Weekly Top 5

इथे ओशाळली माणुसकी! अंत्यसंस्काराला कोणीच न आल्याने मुलीने एकटीने केलं सगळं पण श्राद्धाचं जेवायला 150 जण हजर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2021 22:02 IST

CoronaVirus Marathi News and Live Updates : आपलेही परके झाल्याचं चित्र अनेक ठिकाणी पाहायला मिळालं. याच दरम्यान माणुसकीला काळीमा फासणारी एक घटना समोर आली आहे. 

नवी दिल्ली - देशात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. रुग्णांच्या संख्येने तब्बल दोन कोटींचा टप्पा पार केला असून तीन लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी विविध उपाय केले जात आहेत. वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याच दरम्यान अनेक धक्कादायक घटना समोर येत आहेत. कोरोनाच्या या महाभयंकर संकटात अनेकांनी आपल्या जवळची माणसं गमावली आहेत. तसेच आपलेही परके झाल्याचं चित्र अनेक ठिकाणी पाहायला मिळालं. याच दरम्यान माणुसकीला काळीमा फासणारी एक घटना समोर आली आहे. 

एका महिलेला कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला. त्यावेळी गावकऱ्यांनी मदतीचा हात दिला नाही. महिलेच्या अंत्यसंस्कारासाठी गावातलं कोणीही पुढे आलं नाही. त्यामुळे शेवटी एकट्या मुलीनेच पीपीई किट घालून आपल्या आईचे अंत्यविधी पूर्ण केले. मात्र धक्कादायक बाब म्हणजे श्राद्ध किंवा जेवणाच्या कार्यक्रमावेळी मात्र तब्बल दीडशेहून अधिक लोकांनी हजेरी लावल्याची माहिती आता समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी एकटी मुलगी आपल्या आईचे अंत्यविधी करत असल्याचा फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला होता. त्यावेळी तिला कोणीच मदत केली नाही. 

मुलीने एकटीनेच सर्व काही केलं. मात्र त्यानंतर असलेल्या जेवणासाठी 150 लोकांनी हजेरी लावली. मृत्यूनंतर प्रथेप्रमाणे केलेल्या एका जेवणाच्या कार्यक्रमासाठी घेतलेलं कर्ज फेडण्यासाठी आता या मुलीला बरेच कष्ट करावं लागत आहे. पडेल ते काम करावे लागत आहे. बिहारमधील एका गावात ही घटना घडली आहे. या गावातील वीरेन मेहता यांच्या कुटुंबाला कोरोनामुळं बरंच काही गमवावं लागलं. ते स्वतः डॉक्टर म्हणून गावात काम करायचे. रुग्णांची सेवा करता करता त्यांनाही कोरोनाची लागण झाली. त्यांच्यानंतर त्यांच्या पत्नीलादेखील कोरोनाची लागण झाली. चार दिवसांच्या अंतरात दुर्दैवानं या दोघांचाही मृत्यू झाला. 

गावचे सरपंच सरोज कुमार मेहता यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या पंधरा दिवसांत गावातील दोन डॉक्टरांसह चार लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यांनी सांगितलं की, या दोघांच्या मृत्यूनंतर जेवणाच्या कार्यक्रमावेळी दीडशेहून अधिक लोक आले होते. त्यांची मोठी मुलगी सोनी लहान भाऊ बहीण नितीश आणि चांदणीची काळजी घेत असते. गावात कोरोनामुळे सध्या खूपच बिकट स्थिती आहे. गावात 200 लोकांनी कोरोनाची लस घेतली आहे. कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या जास्त आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतDeathमृत्यू