शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
2
Top Marathi News LIVE Updates: युद्धविरामावरूनच वाक्-युद्ध! अमेरिकेच्या अटी इराणला अमान्य
3
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
4
"हजारोंसे भारी... एक नारी!" रोहित पवारांकडून 'त्या' रणरागिणीचं कौतुक; पोलिसांच्या कारवाईवरून सरकारला ठणकावलं
5
हर हर महादेव... केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, मंत्रोच्चाराने दुमदुमला परिसर, भक्तांची रीघ
6
BEST: ‘बेस्ट’कडून ५०० मिडी बसची खरेदी, समितीची मंजुरी; सरकारकडे प्रस्ताव
7
"त्या जागेने माझं सर्वस्व हिरावलं, योगींची भेट..."; दहशतवादी हल्ल्यात पती गमावलेल्या ऐशान्याची व्यथा
8
महिनाभरातच नेपाळमधील बालेन शाह सरकारविरोधात जनआक्रोष, ‘या’ दोन मुद्द्यांवरून नाराजी
9
कार्ड बदललं तरी ऑटोमॅटिक पेमेंट थांबणार नाही; ₹१५,००० पर्यंत OTP-पासवर्डची गरजही भासणार नाही
10
Leopard Attack: कसारा-कळभोंडेत बिबट्याच्या हल्ल्यात ८ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
11
मन रानात गेलं गं! अश्विनी भावे यांचा शेतात मनसोक्त फेरफटका; सोशल मीडियावर दाखवली झलक
12
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
13
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार विक्री; सेन्सेक्स ५०० अंकांनी तर निफ्टी २४,४५० च्या खाली, IT इंडेक्समध्ये मोठी घसरण
14
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
15
Mumbai Local: दुहेरी ब्लॉकने मुंबईकर त्रस्त; नोकरदारांना सलग दुसऱ्या दिवशी ‘लेटमार्क’चा फटका 
16
गुरुपुष्यामृत योग २०२६: नशीब पालटणारा सुवर्ण मुहूर्त! २३ एप्रिल, गुरुपुष्यामृत योग 'या' राशींसाठी ठरणार खास!
17
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
18
CSMT: सीएसएमटीवर मोठा अनर्थ टळला! चुकीच्या सिग्नलमुळे दोन लोकल एकाच ट्रॅकवर; नेमकं काय घडलं?
19
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
20
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

बिहारात राजकीय पक्षांचे ‘डीनर डिप्लोमसी’

By admin | Updated: February 19, 2015 01:43 IST

बिहारातील सत्तेसाठीचा राजकीय संघर्ष निर्णायकी अवस्थेत पोहोचला असतानाच ‘लंच अँड डीनर डिप्लोमसी’लाही वेग आला आहे़

पाटणा : बिहारातील सत्तेसाठीचा राजकीय संघर्ष निर्णायकी अवस्थेत पोहोचला असतानाच ‘लंच अँड डीनर डिप्लोमसी’लाही वेग आला आहे़ राज्याचे मुख्यमंत्री जीतनराम मांझी यांना येत्या शुक्रवारी (२० फेबु्रवारी) बहुमत सिद्ध करायचे आहे, त्या पार्श्वभूमीवर आपले आमदार ‘कळपा’बाहेर जाऊ नयेत यासाठी, जनता दल (युनायटेड), भाजप आणि राष्ट्रीय जनता दल (राजद) अशा सर्वच पक्षांत ‘डीनर डिप्लोमसी’च्या निमित्ताने रणनीती आखली जात आहे़मंगळवारी रात्री माजी मंत्री गौतम सिंह यांच्या निवासस्थानी जदयुचे आमदार विनोद सिंह यांनी रात्रीच्या मेजवानीचे आयोजन केले होते़ गौतम सिंह आणि विनोद सिंह हे दोघेही राज्याचे माजी मुख्यमंत्री नितीशकुमार यांचे निकटचे म्हणून ओळखले जातात़ जदयु आमदारांसह जदयुचे मित्रपक्ष असलेल्या राजद, काँग्रेस आणि भाकपा आदी पक्षांचे वरिष्ठ नेते, आमदार अशा सर्वांनी गौतम सिंह यांच्या घरच्या या मेजवानीला हजेरी लावत नितीशकुमारांना आपला पाठिंबा दर्शवला़बुधवारी दुसऱ्या दिवशीही या राजकीय जेवणावळी सुरू होत्या़ राजदच्या विधिमंडळ पक्षाचे नेते अब्दुल बारी सिद्दीकी यांनी आपल्या निवासस्थानी दुपारी भोजनासाठी जदयु, काँग्रेस, भाकपच्या आमदार, खासदार व नेत्यांना निमंत्रित केले़ संध्याकाळी जदयु नेते आणि माजी मंत्री विजय कुमार चौधरी यांच्या निवासस्थानी ‘डीनर डिप्लोमसी’ झाली़ चौधरी यांची अलीकडेच जदयु विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड झाली आहे़ गुरुवारी माजी साखर उद्योगमंत्री रंजू गीता यांच्या घरी ‘लंच डिप्लोमसी’ होणार आहे़भाजप गोटातही आजपासून सुरू झालेल्या आपल्या विधिमंडळ पक्षनेत्यांच्या बैठकीच्या निमित्ताने ‘लंच अँड डीनर डिप्लोमसी’ रंगणार आहे़ राजदचे २४, काँग्रेसचे ५, भाकपचा १ आणि अपक्ष १ अशा १३० आमदारांच्या पाठिंब्याचा दावा नितीशकुमार यांनी केला आहे़ २४३ सदस्यीय बिहार विधानसभेत दहा जागा रिक्त आहेत व बहुमतासाठी ११७ आमदारांचा पाठिंबा आवश्यक आहे़ च्बिहारचे मुख्यमंत्री जितनराम मांझी यांना बहुमत सिद्ध करण्यापूर्वी धोरणात्मक निर्णय घेण्यापासून रोखणाऱ्या पाटणा उच्च न्यायालयाने बुधवारी आपला पूर्वीचा आदेश पलटवत मांझी सरकारला धोरणात्मक निर्णय घेण्याची मुभा दिली़ मात्र सोबतच या निर्णयाची अंमलबजावणी २१ फेबु्रवारीपर्यंत स्थगित ठेवण्याचा आदेश दिला़च्गत १६ फेबु्रवारीला उच्च न्यायालयाचे न्या़ इक्बाल अहमद अन्सारी व न्या़ समरेन्द्र प्रताप सिंह यांच्या खंडपीठाने सरकारला मोठा दणका देत, बहुमत सिद्ध करण्यापूर्वी कुठलाही धोरणात्मक निर्णय घेण्यापासून रोखले होते़ मात्र न्या़एल़ नरसिम्हा रेड्डी आणि न्या़ विकास जैन यांनी मात्र हा निर्णय बदलत, मांझी सरकारला धोरणात्मक निर्णय घेण्याची परवानगी दिली़च्येत्या २० फेबु्रवारीपासून सुरू होणाऱ्या बिहार विधानसभा अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी बोलावण्यात आलेल्या सर्वपक्षीय बैठकीवर भाजपने बहिष्कार टाकला़ बैठकीत सहभागी अन्य पक्षांनी सभागृहातील आसनव्यवस्थेबाबतचे सर्वाधिकार विधानसभाध्यक्ष उदय नारायण चौधरी यांच्या सुपूर्द केले़