शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
2
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
3
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
4
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
5
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
6
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
7
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
8
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
9
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
10
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
11
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
12
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
13
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
14
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
15
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
16
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
17
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
18
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
19
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
20
"संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’, काँग्रेसने दिला सल्ला  

दाऊद दोन वर्षांपूर्वी परतू इच्छित होता

By admin | Updated: August 12, 2015 01:29 IST

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीम याने दोन वर्षांपूर्वी भारतात परतण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्याने खटल्यासाठी घातलेल्या अटी पाहता तो वादाचा विषय बनला असता.

नवी दिल्ली : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीम याने दोन वर्षांपूर्वी भारतात परतण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्याने खटल्यासाठी घातलेल्या अटी पाहता तो वादाचा विषय बनला असता. वकील असलेल्या एका काँग्रेस नेत्याने हा प्रस्ताव पक्षाच्या दोन ज्येष्ठ नेत्यांकडे ठेवल्यानंतर काँग्रेसच्या नेतृत्वाने त्यावर चर्चाही केली होती. मोस्ट वाँटेड दाऊदला त्याच्या अटींवर भारतात आणणे जोखमीचे ठरेल, असे तत्कालीन संपुआ सरकारलावाटले.फरार असलेला दाऊद भारतात परतण्यास तयार असल्याचा प्रस्ताव दिल्लीतील वकील आणि काँग्रेसच्या नेत्याने २०१३ मध्ये काँग्रेसच्या नेतृत्वाला कळविला होता. त्यानंतर काँग्रेस आणि सरकारने उच्च स्तरावर त्याबाबत चर्चा केली होती. १९९३ मध्ये मुंबई बॉम्बस्फोट मालिका घडवून आणल्यानंतर दोन दशकांनी प्रथमच दाऊदने भारतात परतण्याची तयारी दर्शविली होती. तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार शिवशंकर मेनन यांनी त्याबाबत चर्चा केल्याचेसमजते. यावर मेनन यांची प्रतिक्रिया कळू शकली नसली तरी मनमोहनसिंग यांनी दाऊदबाबत कोणत्याही व्यक्तीशी चर्चा केल्याचे स्मरत नसल्याचा खुलासा केला आहे.काय होता दाऊदचा युक्तिवाद?दाऊदला निरपराधित्व सिद्ध करायचे आहे, हा मुंबई पोलिसांनी केलेला दावा त्याने खोडून काढला होता. स्वारस्य जोपासणाऱ्या काही पक्षांनी मला मुंबई बॉम्बस्फोटात गोवण्याचा प्रयत्न चालविल्याने मला धक्का बसला आहे, असे त्याने प्रस्तावित याचिकेत म्हटले होते. मुंबईतील जातीयवादी वातावरण पाहता खटला दिल्लीला हलविल्यास न्यायदानाचा शेवट चांगल्या पद्धतीने होईल आणि नि:पक्षपाती वातावरणात खटला पार पडणे शक्य होईल, असा त्याचा युक्तिवाद होता. (लोकमत न्यूज नेटवर्क)सर्वप्रथम काँग्रेस नेतृत्वाकडे प्रस्ताव ..- दाऊदचा प्रस्ताव सर्वप्रथम काँग्रेस नेतृत्वाला कळविण्यात आल्यानंतर त्यावर पंतप्रधान कार्यालयाने चर्चा केल्याचा दावा माजी अधिकाऱ्यांनी केला आहे. वकील असलेल्या काँग्रेस नेत्याने डी-कंपनीचे अनेक खटले चालविले होते. ते दाऊद आणि त्यांच्या निकटस्थ कुटुंबियांच्या संपर्कात होते. - दाऊदला किडनीचा गंभीर आजार असल्यामुळे तो कुटुंबियांसह भारतात परतण्यास अधीर झाला होता. त्यामुळे २०१३ मध्ये त्याने हा प्रस्ताव ठेवला होता. १९९३ मध्ये तो दुबईत वास्तव्याला असताना त्याच्या कायदेशीर चमूने १ नोव्हेंबर १९९३ रोजी त्याची वकालतनाम्यावर स्वाक्षरी घेऊन बॉम्बस्फोट मालिकेचा खटला मुंबईऐवजी दिल्लीला चालविण्याची विनंती करणारी याचिकाही तयार केली होती. त्यानंतर दीर्घ सल्लामसलत केल्यानंतर त्याने कधीही याचिका दाखल केली नाही.