शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
2
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
3
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
4
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
5
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
6
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
7
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
8
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
9
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
10
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
11
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
12
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
13
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
14
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
15
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
16
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
17
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
18
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
19
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
20
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
Daily Top 2Weekly Top 5

ह्रदयद्रावक... दोन वर्षांपूर्वीच वडील गेले, रेल्वे प्रवासात आईचाही भूकबळी, कशी जगणार २ चिमुकली

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2020 22:49 IST

आम आदमी पक्षाच्या संजय सिंह यांनी माय-लेकाराचा एक भावुक व्हिडिओ शेअर केला आहे. गेल्या ५ ते ७ दिवसांपासून खायला अन्न न मिळाल्याने आईचा मृत्यू झाला.

नवी दिल्ली - कोरोना महामारीच्या काळात कित्येक संवेदनशील घटना घडल्या आहेत. कित्येक घटनांनी डोळ्यात पाणी आणलंय, तर अनेक घटनांनी काळजाचं पाणी-पाणी झालंय. बिहारमधील मुजफ्फपूर रेल्वे स्थानकावरील एका दृश्याने सोशल मीडिया भावुक झाला असून अनेकांचे डोळे पाणावले आहेत. तहान-भुकेमुळे मृत्युमुखी पडलेल्या आईला तिचा चिमुरडा उठवण्याचा प्रयत्न करतोय, तिच्या मृतदेहासोबत खेळताना दिसतोय. बिहारमधील या चिमुकल्यांच्या मदतीसाठी विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव पुढे आले आहेत. मृत महिलेच्या मुलांच्या नावे ५-५ लाख रुपयांची एफडी करणार असल्याचे यादव यांनी म्हटले. 

आम आदमी पक्षाच्या संजय सिंह यांनी माय-लेकाराचा एक भावुक व्हिडिओ शेअर केला आहे. गेल्या ५ ते ७ दिवसांपासून खायला अन्न न मिळाल्याने आईचा मृत्यू झाला. या आईचा मृतदेह बिहारमधील मुजफ्फपूर रेल्वे स्थानकावर उतरविण्यात आला. त्यावेळी, तिचा चिमुकला आईला उठविण्याचा प्रयत्न करतोय. आईचा पदर आपल्या हातात घेऊन तो खेळतोय. कारण, आपली आई देवाघरी गेलीय, एवढं समजण्याइतकाही तो मोठा नाही. अतिशय ह्रदद्रावक हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यावरुन संजय सिंह यांनी रेल्वे मंत्री आणि सरकारवर सडकून टीका केलीय. आता, या व्हिडिओतील चिमुकल्यांची जबाबदारी बिहारमधील राजदचे नेते तेजस्वी यादव यांनी घेतली आहे. यादव यांनी ट्विट करुन याबाबत माहिती दिली. 

रेल्वे स्थानकावरील मृत महिलेच नाव अरबिना खातून असून दोन वर्षांपूर्वीच त्यांचे पती त्यांना सोडून गेले आहेत. त्यामुळे, या महिलेच्या दोन्ही मुलांसाठी ५ लाख रुपयांची मदत तेजस्वी यादव यांनी देऊ केली आहे. सज्ञान होईपर्यंत एफडी स्वरुपात ही रक्कम या मुलांच्या नावे असणार आहे. तसेच, या मुलांच्या शिक्षणाचा खर्च आणि देखभाल करणाऱ्या नातेवाईकास किंवा कुटुंबातील सदस्यास कटिहार जिल्ह्यात नोकरी देण्यात येई, असेही तेजस्वी यादव यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन सांगितले आहे. 

दरम्यान, कोरोना संकटाच्या काळात सर्वात जास्त त्रास सहन करावा लागला तो गरिब आणि मजूर वर्गाला. अनियोजित लॉकडाऊनच्या तडाख्यात सापडला कामगार वर्ग, श्रमिक वर्ग आणि हातावरील पोट असलेला गरिब. केंद्र सरकारने अचानक लॉकडाऊन केल्यामुळे हातचं कामही गेलं अन् कोरोनाच्या संकटामुळे गाव गाठण्याला सर्वांनीच प्राधान्य दिलं. श्रमिक मजूरांच्या हालअपेष्टा मीडियाच्या माध्यमातून सरकारपुढे आल्या. त्यानंतर, सरकारने श्रमिक ट्रेन सुरु करुन मजूरांना घरी पाठविण्याचं काम हाती घेतलं. मात्र, अद्यापही मजूर व कामगार वर्गाला त्रास सहन करावा लागत आहे. मजुरांना अन्न न मिळाल्यामुळे त्यांचा जीव जात 

टॅग्स :Biharबिहारcorona virusकोरोना वायरस बातम्याrailwayरेल्वेTejashwi Yadavतेजस्वी यादव