शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

ह्रदयद्रावक... दोन वर्षांपूर्वीच वडील गेले, रेल्वे प्रवासात आईचाही भूकबळी, कशी जगणार २ चिमुकली

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2020 22:49 IST

आम आदमी पक्षाच्या संजय सिंह यांनी माय-लेकाराचा एक भावुक व्हिडिओ शेअर केला आहे. गेल्या ५ ते ७ दिवसांपासून खायला अन्न न मिळाल्याने आईचा मृत्यू झाला.

नवी दिल्ली - कोरोना महामारीच्या काळात कित्येक संवेदनशील घटना घडल्या आहेत. कित्येक घटनांनी डोळ्यात पाणी आणलंय, तर अनेक घटनांनी काळजाचं पाणी-पाणी झालंय. बिहारमधील मुजफ्फपूर रेल्वे स्थानकावरील एका दृश्याने सोशल मीडिया भावुक झाला असून अनेकांचे डोळे पाणावले आहेत. तहान-भुकेमुळे मृत्युमुखी पडलेल्या आईला तिचा चिमुरडा उठवण्याचा प्रयत्न करतोय, तिच्या मृतदेहासोबत खेळताना दिसतोय. बिहारमधील या चिमुकल्यांच्या मदतीसाठी विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव पुढे आले आहेत. मृत महिलेच्या मुलांच्या नावे ५-५ लाख रुपयांची एफडी करणार असल्याचे यादव यांनी म्हटले. 

आम आदमी पक्षाच्या संजय सिंह यांनी माय-लेकाराचा एक भावुक व्हिडिओ शेअर केला आहे. गेल्या ५ ते ७ दिवसांपासून खायला अन्न न मिळाल्याने आईचा मृत्यू झाला. या आईचा मृतदेह बिहारमधील मुजफ्फपूर रेल्वे स्थानकावर उतरविण्यात आला. त्यावेळी, तिचा चिमुकला आईला उठविण्याचा प्रयत्न करतोय. आईचा पदर आपल्या हातात घेऊन तो खेळतोय. कारण, आपली आई देवाघरी गेलीय, एवढं समजण्याइतकाही तो मोठा नाही. अतिशय ह्रदद्रावक हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यावरुन संजय सिंह यांनी रेल्वे मंत्री आणि सरकारवर सडकून टीका केलीय. आता, या व्हिडिओतील चिमुकल्यांची जबाबदारी बिहारमधील राजदचे नेते तेजस्वी यादव यांनी घेतली आहे. यादव यांनी ट्विट करुन याबाबत माहिती दिली. 

रेल्वे स्थानकावरील मृत महिलेच नाव अरबिना खातून असून दोन वर्षांपूर्वीच त्यांचे पती त्यांना सोडून गेले आहेत. त्यामुळे, या महिलेच्या दोन्ही मुलांसाठी ५ लाख रुपयांची मदत तेजस्वी यादव यांनी देऊ केली आहे. सज्ञान होईपर्यंत एफडी स्वरुपात ही रक्कम या मुलांच्या नावे असणार आहे. तसेच, या मुलांच्या शिक्षणाचा खर्च आणि देखभाल करणाऱ्या नातेवाईकास किंवा कुटुंबातील सदस्यास कटिहार जिल्ह्यात नोकरी देण्यात येई, असेही तेजस्वी यादव यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन सांगितले आहे. 

दरम्यान, कोरोना संकटाच्या काळात सर्वात जास्त त्रास सहन करावा लागला तो गरिब आणि मजूर वर्गाला. अनियोजित लॉकडाऊनच्या तडाख्यात सापडला कामगार वर्ग, श्रमिक वर्ग आणि हातावरील पोट असलेला गरिब. केंद्र सरकारने अचानक लॉकडाऊन केल्यामुळे हातचं कामही गेलं अन् कोरोनाच्या संकटामुळे गाव गाठण्याला सर्वांनीच प्राधान्य दिलं. श्रमिक मजूरांच्या हालअपेष्टा मीडियाच्या माध्यमातून सरकारपुढे आल्या. त्यानंतर, सरकारने श्रमिक ट्रेन सुरु करुन मजूरांना घरी पाठविण्याचं काम हाती घेतलं. मात्र, अद्यापही मजूर व कामगार वर्गाला त्रास सहन करावा लागत आहे. मजुरांना अन्न न मिळाल्यामुळे त्यांचा जीव जात 

टॅग्स :Biharबिहारcorona virusकोरोना वायरस बातम्याrailwayरेल्वेTejashwi Yadavतेजस्वी यादव