शहरं
Join us  
Trending Stories
1
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
2
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
3
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
5
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
6
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
7
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
8
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
9
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
10
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
11
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
12
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
13
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
14
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
15
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
16
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
17
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
18
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
19
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
20
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ

ह्रदयद्रावक... दोन वर्षांपूर्वीच वडील गेले, रेल्वे प्रवासात आईचाही भूकबळी, कशी जगणार २ चिमुकली

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2020 22:49 IST

आम आदमी पक्षाच्या संजय सिंह यांनी माय-लेकाराचा एक भावुक व्हिडिओ शेअर केला आहे. गेल्या ५ ते ७ दिवसांपासून खायला अन्न न मिळाल्याने आईचा मृत्यू झाला.

नवी दिल्ली - कोरोना महामारीच्या काळात कित्येक संवेदनशील घटना घडल्या आहेत. कित्येक घटनांनी डोळ्यात पाणी आणलंय, तर अनेक घटनांनी काळजाचं पाणी-पाणी झालंय. बिहारमधील मुजफ्फपूर रेल्वे स्थानकावरील एका दृश्याने सोशल मीडिया भावुक झाला असून अनेकांचे डोळे पाणावले आहेत. तहान-भुकेमुळे मृत्युमुखी पडलेल्या आईला तिचा चिमुरडा उठवण्याचा प्रयत्न करतोय, तिच्या मृतदेहासोबत खेळताना दिसतोय. बिहारमधील या चिमुकल्यांच्या मदतीसाठी विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव पुढे आले आहेत. मृत महिलेच्या मुलांच्या नावे ५-५ लाख रुपयांची एफडी करणार असल्याचे यादव यांनी म्हटले. 

आम आदमी पक्षाच्या संजय सिंह यांनी माय-लेकाराचा एक भावुक व्हिडिओ शेअर केला आहे. गेल्या ५ ते ७ दिवसांपासून खायला अन्न न मिळाल्याने आईचा मृत्यू झाला. या आईचा मृतदेह बिहारमधील मुजफ्फपूर रेल्वे स्थानकावर उतरविण्यात आला. त्यावेळी, तिचा चिमुकला आईला उठविण्याचा प्रयत्न करतोय. आईचा पदर आपल्या हातात घेऊन तो खेळतोय. कारण, आपली आई देवाघरी गेलीय, एवढं समजण्याइतकाही तो मोठा नाही. अतिशय ह्रदद्रावक हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यावरुन संजय सिंह यांनी रेल्वे मंत्री आणि सरकारवर सडकून टीका केलीय. आता, या व्हिडिओतील चिमुकल्यांची जबाबदारी बिहारमधील राजदचे नेते तेजस्वी यादव यांनी घेतली आहे. यादव यांनी ट्विट करुन याबाबत माहिती दिली. 

रेल्वे स्थानकावरील मृत महिलेच नाव अरबिना खातून असून दोन वर्षांपूर्वीच त्यांचे पती त्यांना सोडून गेले आहेत. त्यामुळे, या महिलेच्या दोन्ही मुलांसाठी ५ लाख रुपयांची मदत तेजस्वी यादव यांनी देऊ केली आहे. सज्ञान होईपर्यंत एफडी स्वरुपात ही रक्कम या मुलांच्या नावे असणार आहे. तसेच, या मुलांच्या शिक्षणाचा खर्च आणि देखभाल करणाऱ्या नातेवाईकास किंवा कुटुंबातील सदस्यास कटिहार जिल्ह्यात नोकरी देण्यात येई, असेही तेजस्वी यादव यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन सांगितले आहे. 

दरम्यान, कोरोना संकटाच्या काळात सर्वात जास्त त्रास सहन करावा लागला तो गरिब आणि मजूर वर्गाला. अनियोजित लॉकडाऊनच्या तडाख्यात सापडला कामगार वर्ग, श्रमिक वर्ग आणि हातावरील पोट असलेला गरिब. केंद्र सरकारने अचानक लॉकडाऊन केल्यामुळे हातचं कामही गेलं अन् कोरोनाच्या संकटामुळे गाव गाठण्याला सर्वांनीच प्राधान्य दिलं. श्रमिक मजूरांच्या हालअपेष्टा मीडियाच्या माध्यमातून सरकारपुढे आल्या. त्यानंतर, सरकारने श्रमिक ट्रेन सुरु करुन मजूरांना घरी पाठविण्याचं काम हाती घेतलं. मात्र, अद्यापही मजूर व कामगार वर्गाला त्रास सहन करावा लागत आहे. मजुरांना अन्न न मिळाल्यामुळे त्यांचा जीव जात 

टॅग्स :Biharबिहारcorona virusकोरोना वायरस बातम्याrailwayरेल्वेTejashwi Yadavतेजस्वी यादव