शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

Cyclone Amphan : कोरोनानंतर 'अम्फान' घालणार 'थैमान'? जम्मू-काश्मीर ते तामिळनाडू, 'या' राज्यांना 'अलर्ट' जारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2020 13:47 IST

21 वर्षांपूर्वी म्हणजे 1999 मध्ये ओडिशातील पारादीप किनाऱ्यावर चक्रीवादळ धडकले होते. त्या वादळाने प्रचंड हाहाकार घातला होता. आता पुन्हा हा धोका निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देतब्बल 21 वर्षांनंतर पुन्हा एकदा चक्रिवादळामुळे मोठा विनाश होण्याची भीती.किनाऱ्यावरील 14 लाखहून अधिक लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.ओडिशा आणि बंगालला या वादळाचा सर्वप्रथम सामना करावा लागणार आहे.

नवी दिल्ली : तब्बल 21 वर्षांनंतर पुन्हा एकदा चक्रिवादळामुळे मोठा विनाश होण्याची भीती आहे. अम्फानचा पहिला प्रहार पारादीपवर होईल. तेथे सध्या वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू आहे. बंगालच्या खाडीतून सुरू झालेले हे वादळ वेगाने ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या किनाऱ्यांकडे सरकत आहे. ते दुपारपर्यंत किनाऱ्यांवर धडकण्याची भीती आहे. 100 किलोमीटर दूर असलेल्या वादाळाच्या केंद्रात जवळपास 200 किलोमीटर वेगाने हवा सुरू आहे.

14 लाख जणांना सुरक्षित स्थळी हलवले -ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या किनाऱ्यांवर सध्या शांतता पसरली आहे. कोरोना महामारीचे संकट घोंगावत असतानाच या वादळाच्या शक्यतेमुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या लोकांना सातत्याने सावध राहण्याच्या सूचना दिल्या जात आहेत. त्यांना घरातच राहण्याचे आवाहन केले जात आहे. तर 14 लाखहून अधिक लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. एनडीआरएफचे चमूही कामाला लागले आहेत.

जगातील 10 सर्वात भयंकर चक्रीवादळं; यांच्या विनाशाचे तांडव आठवले, की आजही उडतो लोकांचा थरकाप

ओडिशात 11 लाख लोकांचे स्थलांतर -ओडिशा आणि बंगालला या वादळाचा सर्वप्रथम सामना करावा लागणार आहे. या पार्श्वभूमीवर ओडिशातील जवळपास 11 लाख लोकांना किनाऱ्यावरून हलवण्यात आले आहे. एमएमएसच्या माध्यमाने लोकांना वादळाची माहिती दिली जात आहे. कोस्टगार्डचे चमू आणि नौका सातत्याने समुद्रात गस्त घालत आहेत.

CoronaVirus News : आनंदाची बातमी! : कोरोनावरील औषध सापडलं; 'ही' अँटीबॉडी 100 टक्के गुणकारी, अमेरिकन कंपनीचा दावा

या वादळाच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालमधील जवळपास 3 लाखहून अधिक लोकांना किनारपट्टी भागांतून सुरक्षित स्थळी नेण्यात आले आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, अम्फान चक्रीवादळ 185 किलो मीटर वेगाने पश्चिम बंगालच्या दीघा किनाऱ्यावर धडकू शकते. 

'या' राज्यांना 'हाय' तर 'या' राज्यांना 'ऑरेंज' अलर्ट -अम्फानचे संकट पाहता, हवामान खात्याने ओडिशा आणि आसामसाठी हाय अलर्ट जारी केला आहे. तर पश्चिम बंगाल, तामिलनाडू, आंध्र प्रदेश, पुदुच्चेरी, त्रिपुरा, मिजोरम, मणिपुर आणि जम्मू काश्मीरसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

आनंदाची बातमी : 'उवा' मारण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या 'या' औषधाने काही तासांतच केला कोरोनाचा 'खात्मा'!; क्लिनिकल ट्रायल सुरू

200 किलो मीटरपेक्षाही अधिक असू शकते तीव्रता -21 वर्षांपूर्वी म्हणजे 1999 मध्ये ओडिशातील पारादीप किनाऱ्यावर चक्रीवादळ धडकले होते. त्या वादळाने प्रचंड हाहाकार घातला होता. आता पुन्हा हा धोका निर्माण झाला आहे. अम्फान जसजसे जळव येऊ लागले आहे. तसतशी त्याची थैमान घालण्याची क्षमता अधिक तीव्र होत आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार, हे वादळ जेव्हा पारादीप किनाऱ्याला धडकेल, तेव्हा त्याची तीव्रता 200 किलो मीटरहूनही अधिक असू शकते.

चीनची भीती! 'या'मुळे आता संपूर्ण जग देतंय भारताच्या पावलावर पाऊल, 'अशी' आखतंय रणनीती

 

टॅग्स :Cyclone Amphanअम्फान चक्रीवादळcycloneचक्रीवादळOdishaओदिशाwest bengalपश्चिम बंगालbhubaneswar-pcभुवनेश्वरIndiaभारत