शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
9
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
10
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
11
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
12
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
13
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
14
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
15
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
16
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
17
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
18
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
19
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
20
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर

Cyclone Amphan : कोरोनानंतर 'अम्फान' घालणार 'थैमान'? जम्मू-काश्मीर ते तामिळनाडू, 'या' राज्यांना 'अलर्ट' जारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2020 13:47 IST

21 वर्षांपूर्वी म्हणजे 1999 मध्ये ओडिशातील पारादीप किनाऱ्यावर चक्रीवादळ धडकले होते. त्या वादळाने प्रचंड हाहाकार घातला होता. आता पुन्हा हा धोका निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देतब्बल 21 वर्षांनंतर पुन्हा एकदा चक्रिवादळामुळे मोठा विनाश होण्याची भीती.किनाऱ्यावरील 14 लाखहून अधिक लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.ओडिशा आणि बंगालला या वादळाचा सर्वप्रथम सामना करावा लागणार आहे.

नवी दिल्ली : तब्बल 21 वर्षांनंतर पुन्हा एकदा चक्रिवादळामुळे मोठा विनाश होण्याची भीती आहे. अम्फानचा पहिला प्रहार पारादीपवर होईल. तेथे सध्या वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू आहे. बंगालच्या खाडीतून सुरू झालेले हे वादळ वेगाने ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या किनाऱ्यांकडे सरकत आहे. ते दुपारपर्यंत किनाऱ्यांवर धडकण्याची भीती आहे. 100 किलोमीटर दूर असलेल्या वादाळाच्या केंद्रात जवळपास 200 किलोमीटर वेगाने हवा सुरू आहे.

14 लाख जणांना सुरक्षित स्थळी हलवले -ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या किनाऱ्यांवर सध्या शांतता पसरली आहे. कोरोना महामारीचे संकट घोंगावत असतानाच या वादळाच्या शक्यतेमुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या लोकांना सातत्याने सावध राहण्याच्या सूचना दिल्या जात आहेत. त्यांना घरातच राहण्याचे आवाहन केले जात आहे. तर 14 लाखहून अधिक लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. एनडीआरएफचे चमूही कामाला लागले आहेत.

जगातील 10 सर्वात भयंकर चक्रीवादळं; यांच्या विनाशाचे तांडव आठवले, की आजही उडतो लोकांचा थरकाप

ओडिशात 11 लाख लोकांचे स्थलांतर -ओडिशा आणि बंगालला या वादळाचा सर्वप्रथम सामना करावा लागणार आहे. या पार्श्वभूमीवर ओडिशातील जवळपास 11 लाख लोकांना किनाऱ्यावरून हलवण्यात आले आहे. एमएमएसच्या माध्यमाने लोकांना वादळाची माहिती दिली जात आहे. कोस्टगार्डचे चमू आणि नौका सातत्याने समुद्रात गस्त घालत आहेत.

CoronaVirus News : आनंदाची बातमी! : कोरोनावरील औषध सापडलं; 'ही' अँटीबॉडी 100 टक्के गुणकारी, अमेरिकन कंपनीचा दावा

या वादळाच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालमधील जवळपास 3 लाखहून अधिक लोकांना किनारपट्टी भागांतून सुरक्षित स्थळी नेण्यात आले आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, अम्फान चक्रीवादळ 185 किलो मीटर वेगाने पश्चिम बंगालच्या दीघा किनाऱ्यावर धडकू शकते. 

'या' राज्यांना 'हाय' तर 'या' राज्यांना 'ऑरेंज' अलर्ट -अम्फानचे संकट पाहता, हवामान खात्याने ओडिशा आणि आसामसाठी हाय अलर्ट जारी केला आहे. तर पश्चिम बंगाल, तामिलनाडू, आंध्र प्रदेश, पुदुच्चेरी, त्रिपुरा, मिजोरम, मणिपुर आणि जम्मू काश्मीरसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

आनंदाची बातमी : 'उवा' मारण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या 'या' औषधाने काही तासांतच केला कोरोनाचा 'खात्मा'!; क्लिनिकल ट्रायल सुरू

200 किलो मीटरपेक्षाही अधिक असू शकते तीव्रता -21 वर्षांपूर्वी म्हणजे 1999 मध्ये ओडिशातील पारादीप किनाऱ्यावर चक्रीवादळ धडकले होते. त्या वादळाने प्रचंड हाहाकार घातला होता. आता पुन्हा हा धोका निर्माण झाला आहे. अम्फान जसजसे जळव येऊ लागले आहे. तसतशी त्याची थैमान घालण्याची क्षमता अधिक तीव्र होत आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार, हे वादळ जेव्हा पारादीप किनाऱ्याला धडकेल, तेव्हा त्याची तीव्रता 200 किलो मीटरहूनही अधिक असू शकते.

चीनची भीती! 'या'मुळे आता संपूर्ण जग देतंय भारताच्या पावलावर पाऊल, 'अशी' आखतंय रणनीती

 

टॅग्स :Cyclone Amphanअम्फान चक्रीवादळcycloneचक्रीवादळOdishaओदिशाwest bengalपश्चिम बंगालbhubaneswar-pcभुवनेश्वरIndiaभारत