शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

Cyclone Amphan : ‘अ‍ॅम्फन’च्या तडाख्याने पश्चिम बंगालमध्ये ७२ ठार, ओडिशातही धूळधाण

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2020 3:53 AM

हजारो लोक बेघर झाले असून पश्चिम बंगालच्या दीघा किनारपट्टीला धडकलेल्या या विक्राळ चक्रीवादळाने पश्चिम बंगालसोबत ओडिशातही भयंकर हैदोस घातला.

कोलकाता/भुवनेश्वर : ताशी १९५ किलोमीटर वेगाच्या वाऱ्यासोबत धडकलेल्या ‘अ‍ॅम्फन’ चक्रीवादळाने पश्चिम बंगालमध्ये ७२ लोकांचा बळी घेत भयानक धूळधाण केली. हजारो लोक बेघर झाले असून पश्चिम बंगालच्या दीघा किनारपट्टीला धडकलेल्या या विक्राळ चक्रीवादळाने पश्चिम बंगालसोबत ओडिशातही भयंकर हैदोस घातला. वेगवान वाºयासोबत आलेल्या जोरदार पावसाने सखल भाग जलमय झाले असून मातीची घरे आणि उभी पिके उद्ध्वस्त झाली आहेत. अनेक ठिकाणी उभी झाडे आणि विजेचे खांब उखडून पडले. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी या हानीची हवाई पाहणी करणार आहेत.पश्चिम बंगालमधील उत्तर आणि दक्षिण २४ परगणा हे दोन जिल्हे अ‍ॅम्फन चक्रीवादळाच्या तडाख्याने पूर्णत: उद्ध्वस्त झाले आहेत. ओडिशातील किनारपट्टीवरील अनेक भागांत वीज आणि दूरध्वनी सेवा ठप्प झाली असून ओडिशातील जवळपास ४४ लाखांहून अधिक लोकांना तडाखा बसला आहे. प. बंगाल आणि ओडिशात धूळधाण करणाºया या चक्रीवादळाने बांगलादेशातही १० लोक ठार झाले असून बांगलादेशातील किनारपट्टीवरील अनेक गावे उद्ध्वस्त झाली आहेत.उत्तर आणि दक्षिण २४ परगणा तसेच कोलकाता बुधवारी सायंकाळपासून अंधारात आहे. दूरध्वनी आणि मोबाईल सेवाही ठप्प आहे. यावेळी चक्रीवादळाने तडाख्यात मृत्यू पावलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या कुटुंबियांना दोन ते अडीच लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी घोषित केली.अ‍ॅम्फन चक्रीवादळग्रस्त राज्यातील लोकांना सर्वतोपरी मदत केली जाईल, असा आश्वासक शब्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला. पश्चिम बंगालमधील विध्वंसाची दृश्ये मी पाहिली आहेत. ही आव्हानात्मक घडी आहे. संपूर्ण देश पश्चिम बंगालच्या पाठीशी आहे, असे त्यांनी टष्ट्वीट केले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्याशी संपर्क साधून सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले.चक्रीवादळग्रस्त पश्चिम बंगाल आणि ओडिशातील बचाव व मदत कार्याचा राष्टÑीय संकट व्यवस्थापन समितीने दिल्लीतील बैठकीत आढावा घेतला. चक्रीवादळाची स्थिती आणि दिशा ओळखून भारतीय हवामान खात्याने अचूक अंदाज केल्याने वेळीच या दोन्ही राज्यांतील किनारपट्टी भागात एनडीआरएफची पथके तैनात करण्यात आल्याने नुकसान कमी झाले.कॅबिनेट सेक्रेटरी राजीव गौबा यांच्या नेतृत्वाखालील समितीने या दोन्ही राज्यांच्या मुख्य सचिवांना सांगितले की, वेळीच एनडीआरएफची पथके तैनात करून या दोन्ही राज्यांतील जवळपास ७ लाख लोकांना सुरक्षित हलविण्यात आले. त्यामुळे १९९९ मधील महाचक्रीवादळाच्या तडाख्याच्या तुलनेत जीवितहानी कमी झाली. जलदगतीने पुनर्वसन करण्यासाठी एनडीआरएफची अतिरिक्त पथके पश्चिम बंगालमध्ये विशेषत: कोलकाताकडे रवाना झाली आहेत.चक्रीवादळाच्या तडाख्याने झालेल्या जीवित आणि वित्तीय हानीचा अधिकाऱ्यांसोबत आढावा घेतला. मी माझ्या आयुष्यात एवढे भयानक चक्रीवादळ आणि विध्वंस पाहिला नव्हता. केंद्राने राज्याला सर्वतोपरी मदत करावी. चक्रीवादळग्रस्त भागाचा मी लवकरच दौरा करणार आहे. या भागात पुनर्वसनाचे कामही सुरू केले जाईल. - ममता बॅनर्जी

टॅग्स :west bengalपश्चिम बंगालCyclone Amphanअम्फान चक्रीवादळOdishaओदिशाBangladeshबांगलादेश