शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB चा 'विराट' विजय! प्ले ऑफच्या शर्यतीत इतरांच्या जीवावर उभे, पण PBKS ला बाहेर फेकले
2
वैजयंतीमाला, चिरंजीवी यांच्यासह १३२ विजेत्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पद्म पुरस्कार प्रदान
3
गंमत-जंमत केली तर खपवून घेणार नाही, मीच बंदोबस्त करेन; अजित पवारांनी दिला सज्जड दम
4
सेनेगलमध्ये ८५ प्रवाशांनी भरलेले विमान धावपट्टीवरून घसरले, लागली आग; मोठी दुर्घटना टळली!
5
रायली रुसोने फिफ्टी मारून बॅट उंचावली, विराट कोहलीने विकेट पडताच खोड काढली
6
भारतीय प्रवाशांनी भरलेलं विमान या देशानं माघारी पाठवलं! नेमकं काय घढलं? सरकारनं सांगितलं
7
जंगल सफारीला निघाला क्रिकेटचा देव! Sachin Tendulkar ने शेअर केले जिम कॉर्बेट नॅशनल पार्कमधील निसर्गरम्य Photos
8
मुंबईची लोकसभा निवडणूक आता भारत-पाकिस्तान लढाई झालेली आहे; भाजपाचे मविआवर टीकास्त्र
9
स्ट्राइक रेटवरून विराट कोहलीची अप्रत्यक्षपणे पुन्हा गावस्करांना कोपरखळी, म्हणाला...  
10
मतदान झालं, बारामतीत लीड कोणाला?; सुनेत्रा पवारांच्या विजयाबद्दल अजित पवार म्हणाले...
11
विराट कोहलीला शतकाची हुलकावणी, पण RCB ची आतषबाजी; PBKS समोर २४२ धावांचे लक्ष्य
12
यशाची गॅरंटी; 'पुष्य नक्षत्र' असेल PM मोदींसाठी खास, 'या' दिवशी उमेदवारी अर्ज भरणार...
13
शिवसेना नेते सुरेशदादा जैन यांचा उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
14
"खलिस्तानवर नियंत्रण ठेवण्याची गरज", ब्रिटनच्या NSA सोबत अजित डोवालांची चर्चा
15
ही निवडणूक राहुल गांधी vs नरेंद्र मोदी अन् जिहाद विरुद्ध...; अमित शाह यांचा मोठा हल्ला
16
PBKS vs RCB सामन्यात गारांचा पाऊस! सामना झालाच नाही तर कोण होईल 'गार'? चाहत्यांची वाढलीय चिंता
17
"अदानी, अंबानींची चौकशी करा; सत्य बाहेर येईल"; पंतप्रधान मोदींच्या टीकेवर काँग्रेसकडून पलटवार
18
धक्कादायक! चार दिवसांत दोन मातांनी गमावले प्राण, अहेरीत आरोग्यसेवेचा बोजवारा
19
तुफान राडा अन् लाथा-बुक्क्यांची जुगलबंदी! बसच्या दरवाज्यात दोन महिलांमध्ये तुंबळ हाणामारी (Video)
20
अब की बार, मतदान जोरदार!... कोल्हापुरातील वाढलेला टक्का कुणाला देणार धक्का? 

‘त्या’ पाच जणांचा सरकार उलथविण्याचा कट!; सरकारची कोर्टास विनंती

By ऑनलाइन लोकमत | Published: September 06, 2018 3:40 AM

पुणे पोलिसांनी २८ आॅगस्ट रोजी अटक केलेले वरवरा राव, सुधा भारद्वाज, अरुण फरेरा, व्हर्नॉन गोन्साल्विस व गौतम नवलखा बंदी घातलेल्या माओवादी कम्युनिस्ट पक्षाचे सदस्य असून, सरकार उलथून टाकण्याच्या कटातही त्यांचा सहभाग आहे, असा दावा महाराष्ट्र सरकारने बुधवारी सर्वोच्च न्यायालयात केला.

नवी दिल्ली : पुणे पोलिसांनी २८ आॅगस्ट रोजी अटक केलेले वरवरा राव, सुधा भारद्वाज, अरुण फरेरा, व्हर्नॉन गोन्साल्विस व गौतम नवलखा बंदी घातलेल्या माओवादी कम्युनिस्ट पक्षाचे सदस्य असून, सरकार उलथून टाकण्याच्या कटातही त्यांचा सहभाग आहे, असा दावा महाराष्ट्र सरकारने बुधवारी सर्वोच्च न्यायालयात केला.या पाचजणांना सोडून द्यावे, यासाठी रोमिला थापर, देवकी जैन, प्रभात पटनाईक, सतीश देशपांडे व माया दारूवाला यांनी याचिका केली आहे. पाचही जणांना घरात नजरकैदेत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने ३० आॅगस्ट रोजी दिला. याचिकेवर पुढील सुनावणी गुरुवारी होईल.पुण्याचे सहाय्यक आयुक्त डॉ. शिवाजी पंडितराव पवार यांनी याचिकेस उत्तर देणारे प्रतिज्ञापत्र सादर केले असून, त्यात पाच जणांची अटक व पुरावे मिळाले यांचा तपशील दिला आहे. नजरकैदेमुळे त्यांच्या शारीरिक स्वातंत्र्यावर बंधन असले तरी घरातून ते पुरावे नष्ट करणे व संभाव्य आरोपींना सावध करण्याचे उद्योग सहज करू शकतात. त्यामुळे कोठडीत तपासासाठी त्यांचा ताबा द्यावा, अशी विनंती त्यात आहे.फौजदारी गुन्ह्यातील व्यक्तीच अटकेविरुद्ध दाद मागू शकते. गुन्ह्याशी संबंध नसलेले न्यायालयात येऊ शकत नाहीत, असा पोलिसांनी आक्षेप घेतला आहे. सूडभावनेने धाडी व अटक केली, असे आरोप होणार हे लक्षात घेऊन, कारवाईचे व्हिडिओ रेकॉर्डिंग केले आहे. गुन्ह्याशी संबंधित पुरावे व व्हिडिओ सुनावणीच्या वेळी सीलबंद लखोट्यात सादर केले जाईल, असेही त्यांंनी नमूद केले आहे.कटात सक्रिय सहभागपोलिसांनी दावा केला आहे की, अटक केलेल्यांच्या संगणकांतून जे साहित्य हस्तगत केले, त्यावरून रक्तरंजित अराजक माजवून सरकार उलथवण्याच्या माओवाद्यांच्या कटात त्याचा सहभाग वरवरचा नाही, हे स्पष्ट होते. केडरची भरती करणे, ठराविक भागांमध्ये कामे नेमून देणे, पैशाची तजवीज करणे, शस्त्रांची खरेदी व वितरण करणे या सर्वांत त्यांचा सहभाग असल्याचे दिसते.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय