शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

Farmers Protest : "शेतकरी आंदोलन उच्च दर्जाचे दलाल चालवित आहेत"

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2020 12:57 IST

usha thakur : खोटा कट रचणे फार काळ टिकणार नाही, असे उषा ठाकूर यांनी सांगितले. 

ठळक मुद्देगेल्या काही दिवसांपासून केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्याविरोधात पंजाब आणि हरयाणाचे शेतकरी दिल्ली सीमेवर आंदोलन करत आहे.

इंदूर : भारतीय जनता पार्टी (भाजपा) आणि केंद्र सरकारवर कृषी कायदे आणि शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे सर्व स्तरावरून निशाणा साधला जात आहे. त्यामुळे मध्य प्रदेशच्या पर्यटन-संस्कृती आणि अध्यात्म विभागातील मंत्री उषा ठाकूर या आपल्या पार्टीचा आणि केंद्र सरकारचा बचाव करण्यासाठी मैदानात उतरल्या आहेत. पंजाब आणि हरियाणामध्ये उच्च दर्जाचे दलाल नियोजित पद्धतीने शेतकरी आंदोलन चालवित आहेत. डाव्या विचारसरणीचे लोक आणि तुकडे-तुकडे गँग यामध्ये सामील झाली असून शेतकर्‍यांच्या परिस्थितीचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. यामध्ये गँग कधीही यशस्वी होणार नाही. खोटा कट रचणे फार काळ टिकणार नाही, असे उषा ठाकूर यांनी सांगितले. 

याचबरोबर, कृषी कायद्यातील भ्रम दूर करण्यासाठी भाजपा जनजागृती मोहीम राबवित आहे. कृषी विधेयकाबाबत राज्यातील प्रत्येक शेतकऱ्याला माहिती देणे ही आपली जबाबदारी आहे. भाजपाने आता शेतकऱ्यांचा भ्रम दूर करण्यासाठी एक मेगा प्लॅन तयार केला आहे, असे उषा ठाकूर म्हणाल्या. तसेच, भाजपाचे मोठे नेते शेतकर्‍यांना कृषी कायद्याची माहिती आणि त्याचे फायदे सांगतील. शेतकऱ्यांना सांगितले जाईल की, भाजपा सरकारची सर्वोच्च प्राथमिकता ही गावे, गरीब आणि शेतकरी आहेत. केंद्र सरकारने आणलेले नवे कृषी कायदे शेतकऱ्यांना अधिकाधिक संधी आणि पर्याय उपलब्ध करून देणार आहेत, असे उषा ठाकूर यांनी सांगितले.

भाजपाच्या या अभियानांतर्गत १६ डिसेंबर इंदूरच्या दसरा मैदानावर विभागीय शेतकरी परिषद होणार आहे. यात इंदूर विभागातील सर्व जिल्ह्यातील शेतकरी सहभागी होणार आहेत. या परिषदेच्या तयारीसाठी विधानसभेनुसार बैठका घेण्यात आल्या आहेत. या परिषदेची व्यवस्था सुरळीत पार पाडण्यासाठी राज्य संघटनेने भाजपाचे प्रदेशाध्यक्ष खासदार नंदकुमारसिंग चौहान, आमदार रमेश मेंदोला आणि प्रदेश सरचिटणीस कविता पाटीदार यांची नियुक्ती केली आहे. किसान संमेलनाला भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय आणि राज्याचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा संबोधित करतील, असेही उषा ठाकूर यांनी सांगितले.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्याविरोधात पंजाब आणि हरयाणाचे शेतकरी दिल्ली सीमेवर आंदोलन करत आहे. केंद्र सरकारने संसदेत आणलेले तीन कृषी कायदे रद्द करावे, अशी मागणी शेतकऱ्यांची आहे. याबाबत आतापर्यंत सरकार आणि शेतकरी यांच्यात झालेल्या चर्चेत कोणताही तोडगा निघालेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

टॅग्स :Farmer strikeशेतकरी संपMadhya Pradeshमध्य प्रदेशBJPभाजपाFarmerशेतकरी