शहरं
Join us  
Trending Stories
1
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
2
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
3
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
4
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
5
पाच टप्पे, ‘चौसष्टी’च्या फेऱ्यात; राजकारण ढवळले, प्रचारसभांतील आरोप-प्रत्यारोपांना मिळाला पूर्णविराम
6
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
7
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
8
प्रचारतोफा शांत; राज्यात उद्या अखेरच्या टप्प्यातील मतदान; देशातील ८ राज्यांतील ४९ मतदारसंघांत लढत
9
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
10
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
11
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
12
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
13
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
14
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
15
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
16
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
17
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
18
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
19
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
20
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  

दिल्ली पोलिसांवर आरोप करू नका, अमित शाहांनी विरोधकांना सुनावले

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2020 7:41 PM

'700 हून अधिक जणांवर एफआयआर दाखल करण्यात आली आहे'

नवी दिल्ली : दिल्ली हिंसाचार प्रकरणी विरोधकांनी दिल्ली पोलिसांच्या भूमिकेवर टीकास्त्र सोडले होते. याला उत्तर देताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यसभेत पोलिसांनी दिल्लीतील हिंसाचार नियंत्रणात आणण्यासाठी योग्य कामगिरी केल्याचे सांगत दिल्ली पोलिसांचे कौतुक केले.

"मी राजकीय व्यक्ती आहे. देशाचा गृहमंत्री आहे. माझ्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करा. मात्र, दिल्ली पोलिसांच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित करू नका. कारण, दिल्ली पोलिसांनी संपूर्ण ताकदीने दंगलीवर नियंत्रण मिळविले आणि 13 टक्के लोकांना बाहेर जाऊ दिले नाही. ही पोलिसांची यशस्वी कामगिरी आहे. त्यामुळे पोलिसांवर आरोप करून त्यांचे मनोबल खच्चीकरण करू नका", अशा शब्दांत अमित शाह यांनी विरोधकांना सुनावले आहे. 

याचबरोबर, अमित शाह म्हणाले, "700 हून अधिक जणांवर एफआयआर दाखल करण्यात आली आहे. जलदगतीने कारवाई होत आहे. 2600 जणांना पुराव्याच्या आधारावर अटकेची कारवाई करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्यांना कोर्टासमोर हजर करण्यात येईल आणि त्यांना कठोर शिक्षा देण्यात येईल. काल 1170 जणांची ओळख पटली होती. आतापर्यंत 1170 जणांची ओळख पटली आहे. 24 फेब्रुवारीच्या रात्री उत्तर प्रदेशची सीमा बंद करण्यात आली होती". 

"दिल्ली हिंसाचाराआधी 22 फेब्रुवारीला काही सोशल मीडियावर अकाऊंट तयार करण्यात आले आणि 26 फेब्रुवारीला बंद करण्यात आले. हे करणारे लोक कोठेतरी बसले असतील आणि माझे म्हणणे ऐकत असतील. त्यांना वाटत असेल की आपण वाचू शकू. मात्र, मी स्पष्ट करू इच्छितो की त्यांना पाताळातून शोधून काढू", अशा शब्दांत अमित शाह यांनी दिल्ली हिंसाचारात हात असणाऱ्यांना राज्यसभेतून ठणकावले आहे. तसेच, दिल्ली हिंसाचार प्रकरणातील 1100 हून अधिक लोकांची ओळख पटली आहे. ज्यामध्ये 336 लोक उत्तर प्रदेशातून आले होते. याचे पुरावे सुद्धा आहेत, असा दावा अमित शहा यांनी केला आहे. 

 

टॅग्स :Amit Shahअमित शहाdelhi violenceदिल्ली