शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

नियतीचा क्रूर खेळ! स्वत:च्याच हॉटेलमध्ये भाजला, उपचारासाठी दिल्लीला निघाला; वाटेतच विमानाचा झाला चक्काचूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2026 13:38 IST

विमानात संजय यांच्यासोबत त्यांची पत्नी अर्चना देवी आणि पुतण्या धीरू कुमार हे देखील होते. या तिघांच्याही मृत्यूमुळे संजय यांची दोन मुले, १७ वर्षांचा शुभम आणि १३ वर्षांचा शिवम आता पूर्णपणे अनाथ झाले आहेत.

एकीकडे मृत्यूशी झुंज देणाऱ्या रुग्णाला वाचवण्यासाठी विमानाने दिल्लीला नेले जात होते, तर दुसरीकडे प्रत्यक्ष काळ वाटेतच टपून बसला होता. झारखंडच्या चतरा जिल्ह्यातील सिमरिया जंगलात सोमवारी संध्याकाळी एक भीषण एअर ॲम्बुलन्स दुर्घटना घडली. या अपघातात विमानातील सातही जणांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने केवळ चतराच नव्हे, तर संपूर्ण झारखंड शोकसागरात बुडाले आहे. ज्या रुग्णाला वाचवण्यासाठी धडपड सुरू होती, त्या संजय कुमार यांच्यासह त्यांच्या पत्नीचाही या अपघातात मृत्यू झाल्याने दोन मुले अनाथ झाली आहेत.

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!

स्वत:च्याच हॉटेलमध्ये लागलेल्या आगीत भाजले होते संजय

लातेहार जिल्हयातील चंदवा येथील रहिवासी असलेले ४१ वर्षीय संजय कुमार हे एक ढाबा चालवत होते. काही दिवसांपूर्वी त्यांच्याच ढाब्यावर झालेल्या एका दुर्दैवी अपघातात ते ६५ टक्क्यांहून अधिक भाजले होते. त्यांच्यावर रांची येथील देवकमल रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने डॉक्टरांनी त्यांना दिल्लीला हलवण्याचा सल्ला दिला. कुटुंबीयांनी मोठ्या आशेने एअर ॲम्बुलन्सची व्यवस्था केली, पण हीच आशा त्यांच्या विनाशाचे कारण ठरली.

२३ व्या मिनिटाला घात झाला!

रेडबर्ड एअरवेजचे 'बीचक्राफ्ट C90' हे विमान सोमवारी संध्याकाळी ७:११ वाजता रांची विमानतळावरून दिल्लीसाठी झेपावले. सर्व काही सुरळीत सुरू असतानाच, उड्डाणानंतर बरोबर २३ मिनिटांनी म्हणजे ७:३४ वाजता कोलकाता एटीसीशी असलेला विमानाचा संपर्क अचानक तुटला. त्यानंतर काही वेळातच चतरा येथील सिमरियाच्या घनदाट जंगलात विमान कोसळल्याची बातमी आली. विमानाचा चक्काचूर झाला होता आणि सातही प्रवाशांचे प्राण गेले होते.

अख्खं घरं झालं उध्वस्त, दोन मुले अनाथ

या अपघाताने संजय कुमार यांच्या कुटुंबावर आभाळ कोसळलं आहे. विमानात संजय यांच्यासोबत त्यांची पत्नी अर्चना देवी आणि पुतण्या धीरू कुमार हे देखील होते. या तिघांच्याही मृत्यूमुळे संजय यांची दोन मुले, १७ वर्षांचा शुभम आणि १३ वर्षांचा शिवम आता पूर्णपणे अनाथ झाले आहेत. आई-वडील दोघेही आता परतणार नाहीत, ही बातमी समजताच चंदवा गावात शोककळा पसरली असून नातेवाईकांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा आहे.

मृतांमध्ये कोणाचा समावेश?

या भीषण दुर्घटनेत कॅप्टन विवेक विकास भगत (पायलट), कॅप्टन सवराजदीप सिंह (को-पायलट), डॉ. विकास कुमार गुप्ता, पॅरामेडिक सचिन कुमार मिश्रा, रुग्ण संजय कुमार, त्यांची पत्नी अर्चना देवी आणि अटेंडंट धीरू कुमार यांचा समावेश आहे. डॉक्टर विकास कुमार गुप्ता हे एका रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी आपल्या कर्तव्यावर निघाले होते, पण नियतीने त्यांच्यावरही झडप घातली.

DGCA कडून चौकशीचे आदेश

प्राथमिक अंदाजानुसार, खराब हवामान आणि मुसळधार पावसामुळे दृश्यमानता कमी झाली असावी आणि यामुळेच हा अपघात घडला असावा, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. नागरी उड्डाण महासंचालनालयाने या प्रकरणाच्या सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Tragedy strikes: Air ambulance crash kills patient, family, and crew.

Web Summary : A Jharkhand air ambulance crash killed seven, including a patient burned in his restaurant, his wife, and medical personnel. The flight to Delhi ended abruptly 23 minutes after takeoff, leaving two children orphaned. Poor weather is suspected; investigation ongoing.
टॅग्स :AccidentअपघातJharkhandझारखंडPlane Crashविमान दुर्घटना