शहरं
Join us  
Trending Stories
1
६ डिसेंबरला करायचा होता स्फोट, पण अटकसत्रामुळे उधळला कट, ‘कार बॉम्ब’ची सुरू होती तयारी, नेटवरून घेतले धडे
2
२० क्विंटल स्फोटकांची खरेदी अन् पैशांवरुन वाद; ४ शहरांमध्ये IED हल्ला करण्याचा होता दहशतवाद्यांचा प्लॅन
3
दिल्ली स्फोटाचे गुपित उघडले; कारमधील मृतदेह डॉ. उमर नबीचाच, DNA रिपोर्ट समोर
4
Groww IPO Listing: Google सारखीच आहे Groww ची कहाणी! एक चूक आणि बनलं ओळखीचं नाव, शेअर बाजारातही केलं अवाक्
5
आजचे राशीभविष्य,१३ नोव्हेंबर २०२५: कामाच्या धावपळीत कुटुंबाकडे दुर्लक्ष; सरकारकडून लाभाची शक्यता
6
'३ इडियट्स'मधील मिलीमीटर पत्नीसोबत दिसला दिल्लीच्या रस्त्यावर, १६ वर्षांनंतर त्याला ओळखणं झालं कठीण
7
FREE मध्ये अपडेट होतंय Aadhaar Card, वर्षभरासाठी माफ झाली फी; पाहा कोणाला मिळणार फायदा?
8
“नगरपालिका निवडणुकीत सर्वाधिक जागा लढवण्यावर असेल भर, सत्तेची नाही विचारांची लढाई”: सपकाळ
9
वोटचोरीसह सरकार नोकरी चोर निघाले, वर्षाला २ कोटी नोकऱ्या देण्याचे आश्वासनाचे काय?: काँग्रेस
10
"आता सगळं देवाच्या हातात आहे...", धर्मेंद्र यांच्या तब्येतीबाबत बोलताना हेमा मालिनी भावुक, म्हणाल्या- "मुलं रात्रभर..."
11
५०० वर्षांनी गुरु-शनिचा शुभ योग: १० राशींना चौफेर चौपट लाभ, समस्या संपतील; पद-पैसा-भाग्योदय!
12
Datta Jayanti 2025: यंदा दत्त जयंती गुरुवारी, अत्यंत शुभ दिवस; पाहा, महत्त्व अन् महात्म्य!
13
लग्न होत नाहीये, पत्नी मिळवून द्या! तुमचे उपकार विसरणार नाही! अकाेल्यातील तरुणाचे थेट शरद पवारांना साकडे
14
दहशतवाद्यांनी जानेवारीत केली होती लाल किल्ला भागात रेकी, टॉवर लोकेशन डेटाद्वारे करण्यात आली खात्री
15
भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे केंद्र ठरलेले लंडनमधील ‘इंडिया हाऊस’ आता महाराष्ट्र सरकार करणार खरेदी
16
तेजस्वीची राजद घेईल सर्वाधिक जागा, पण सत्ता एनडीएचीच, 'ॲक्सिस माय इंडिया' एक्झिट पोलमध्ये अंदाज  
17
त्या दहशतवादी महिला डॉक्टरचा माजी पती म्हणतो... ती प्रेमळ आई
18
काश्मीरमध्ये तीन दिवसांत तब्बल १५०० जण ताब्यात, कुलगाम-सोपोरसह शेकडो ठिकाणी छापे, झडती तीव्र
19
एमसीएच्या निवडणुकीमध्ये आ. जितेंद्र आव्हाड यांची बाजी, उपाध्यक्षपदी १३६ मतांनी विजय; अध्यक्षपदी अजिंक्य नाईक यांची बिनविरोध निवड
20
‘ओंकार’ जाणार वनतारामध्ये, सर्किट बेंचचा निर्णय, मूळ याचिका कायम

धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2025 19:04 IST

Uttar Pradesh Crime News: कौटुंबिक कलहामुळे वैतागलेल्या एका महिलेने तीन मुलांना शरीराला बांधून कालव्यात उडी मारत जीवन संपवल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशमधील बांदा येथे घडली आहे.

कौटुंबिक कलहामुळे वैतागलेल्या एका महिलेने तीन मुलांना शरीराला बांधून कालव्यात उडी मारत जीवन संपवल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशमधील बांदा येथे घडली आहे. रिसोडा गावातील ३० वर्षीय रीना देवी नावाच्या या महिलेने कौटुंबिक कलहामुळे कंटाळून मुलांसह केन कालव्यामध्ये उडी मारली आणि जीवन संपवलं. दरम्यान, या चौघांचेही मृतदेह सापडल्यानंतर परिसरात शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार रीनाचा पती अखिलेश हा मोलमजुरी करून कुटुंबाचं पालनपोषण करत असे. तसेच चार पैसे अधिक कमावण्यासाठी तो शहरामध्येही जाऊन काम करत असे. मात्र गेल्या काही काळापासून तो व्यसनांच्या आहारी गेला होता. त्यामुळे तो पत्नी आणि मुलांपासून दुरावला होता. कुटुंबाची आर्थिक स्थिती बिघडली तरी तो कुटुंबाकडे लक्ष देत नव्हता. रीना ही पतीला मुलांसाठी  आवश्यक वस्तू आणि घरात किराणा आणायला सांगायची. मात्र तो ऐकायला तयार नव्हता. त्यावरून घरात रोज वादविवाद व्हायचे.

अखेरीस सततच्या वादांना कंटाळून रीना हिनं धक्कादायक पाऊल उचललं. तिने हिमांशू (९), अंशी (५) आणि प्रिंस (३) यांना घेऊन घराबाहेर पडली.  तिने तिच्याकडील काही वस्तू किनाऱ्यावर ठेवल्या. त्यानंतर तिने एका कपड्याने मुलांना स्वत:च्या शरीराला घट्ट बांधले बांधले आणि कालव्यात उडी मारली.

या महिलेच्या पतीने पत्नी आणि मुले घरात नसल्याचे पाहिल्यानंतर त्यांचा शोध सुरू केला. यादरम्यान, कालव्याच्या किनाऱ्यावर महिलेचं साहित्य मिळाल्यानंतर याची माहिती पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी कालव्यातील पाण्याचा प्रवाह कमी केला आणि स्थानिक पाणबुड्यांच्या मदतीने महिला आणि इतर तीन मुलांचे मृतदेह बाहेर काढले.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेश