शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
2
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
3
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
4
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
5
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
6
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
7
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
8
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
9
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
10
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
11
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
12
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
13
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
14
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
15
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
16
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
17
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
18
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
19
Video: टोल प्‍लाझावर गजराजची एन्ट्री; कारवर केला हल्ला, एका क्षणात काचा फोडल्या अन्...
20
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."

धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2025 19:04 IST

Uttar Pradesh Crime News: कौटुंबिक कलहामुळे वैतागलेल्या एका महिलेने तीन मुलांना शरीराला बांधून कालव्यात उडी मारत जीवन संपवल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशमधील बांदा येथे घडली आहे.

कौटुंबिक कलहामुळे वैतागलेल्या एका महिलेने तीन मुलांना शरीराला बांधून कालव्यात उडी मारत जीवन संपवल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशमधील बांदा येथे घडली आहे. रिसोडा गावातील ३० वर्षीय रीना देवी नावाच्या या महिलेने कौटुंबिक कलहामुळे कंटाळून मुलांसह केन कालव्यामध्ये उडी मारली आणि जीवन संपवलं. दरम्यान, या चौघांचेही मृतदेह सापडल्यानंतर परिसरात शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार रीनाचा पती अखिलेश हा मोलमजुरी करून कुटुंबाचं पालनपोषण करत असे. तसेच चार पैसे अधिक कमावण्यासाठी तो शहरामध्येही जाऊन काम करत असे. मात्र गेल्या काही काळापासून तो व्यसनांच्या आहारी गेला होता. त्यामुळे तो पत्नी आणि मुलांपासून दुरावला होता. कुटुंबाची आर्थिक स्थिती बिघडली तरी तो कुटुंबाकडे लक्ष देत नव्हता. रीना ही पतीला मुलांसाठी  आवश्यक वस्तू आणि घरात किराणा आणायला सांगायची. मात्र तो ऐकायला तयार नव्हता. त्यावरून घरात रोज वादविवाद व्हायचे.

अखेरीस सततच्या वादांना कंटाळून रीना हिनं धक्कादायक पाऊल उचललं. तिने हिमांशू (९), अंशी (५) आणि प्रिंस (३) यांना घेऊन घराबाहेर पडली.  तिने तिच्याकडील काही वस्तू किनाऱ्यावर ठेवल्या. त्यानंतर तिने एका कपड्याने मुलांना स्वत:च्या शरीराला घट्ट बांधले बांधले आणि कालव्यात उडी मारली.

या महिलेच्या पतीने पत्नी आणि मुले घरात नसल्याचे पाहिल्यानंतर त्यांचा शोध सुरू केला. यादरम्यान, कालव्याच्या किनाऱ्यावर महिलेचं साहित्य मिळाल्यानंतर याची माहिती पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी कालव्यातील पाण्याचा प्रवाह कमी केला आणि स्थानिक पाणबुड्यांच्या मदतीने महिला आणि इतर तीन मुलांचे मृतदेह बाहेर काढले.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेश