शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

२४ व्या वर्षी बनला करोडपती, आलिशान कारमधून करायचा मौजमजा, लग्नाला २ दिवस असताना झाली अटक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2024 19:03 IST

Jharkhand Crime News: शेजारी-पाजारी, नातेवाईक, मित्रमंडळी यांच्यामध्ये पत्रिका वाटल्या गेल्या. दोन दिवसांमध्ये धुमधडाक्यात विवाह होणार होता. अनेक नातेवाईकही पोहोचले होते. वधू आणि वर पक्षाकडून विवाहाच्या तयारीला अंतिम रूप दिलं गेलं होतं.मात्र लग्नाला दोन दिवस उरले असतानाच पोलिसांनी नवरदेवाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आणि सर्व आनंदावर विरजण पडले.

झारखंडमधून गुन्ह्याची एक अजब घटना समोर आली आहे. एका तरुणाचं लग्न ठरलं होतं. शेजारी-पाजारी, नातेवाईक, मित्रमंडळी यांच्यामध्ये पत्रिका वाटल्या गेल्या. दोन दिवसांमध्ये धुमधडाक्यात विवाह होणार होता. अनेक नातेवाईकही पोहोचले होते. वधू आणि वर पक्षाकडून विवाहाच्या तयारीला अंतिम रूप दिलं गेलं होतं. दोन्ही ठिकाणी भव्य मंडपासह लग्नाचा मंडपही बांधून तयार झाला होता.  लग्नावर कोट्यवधी रुपयांचा खर्च झाला होता. मात्र लग्नाला दोन दिवस उरले असतानाच पोलिसांनी नवरदेवाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आणि सर्व आनंदावर विरजण पडले.

सायबर गुन्ह्यांच्या आरोपांखाली पोलिसांनी या नवरदेवाला अटक करून त्याची तुरुंगात रवावनी केली. देवघर जिल्ह्यातील सरवा नारंगी येथे त्याचा विवाह निश्चित झाला होता. आलिशान एमजी हेक्टरमधून फिरणाऱ्या सोनू वर्मा या नवरदेवाला लग्न ठरवताना वधू पक्षाच्या लोकांनी त्याच्या व्यवयायाबाबत विचारलं तेव्हा त्याने आपण आयटी इंजिनियर असल्याचं सांगितलं होतं.

दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार सोनू याने वयाच्या अठराव्या वर्षी सायबर गुन्ह्यांच्या क्षेत्रात प्रवेश केला. तसेच लवकरच तो या काळ्या दुनियेतील सराईत गुन्हेगार बनला. या माध्यमातून त्याने अमाप संपत्ती गोळा केली. अटकेची कारवाई केल्यानंतर त्याने पोलिसांनी त्याच्याकडून सुमारे ३.५ कोटी रुपयांची मालमत्तेची ओळख पटवून ती जप्त करण्यासाठी सरकारकडे परवानगीची मागणी केली आहे. 

तसेच आता सखोल चौकशीनंतर आरोपी नवरदेवाला पोलिसांनी तुरुंगात पाठवलं आहे. पोलिसांनी त्याच्याकडून एक महागडा मोबाईल, लॅपटॉप, तसेच सायबर गुन्हेगारीमधून गोळा केलेली अमाप संपत्ती आणि कागदपत्रे जप्त केली आहेत. दरम्यान, हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर दोन्ही कुटुंबामध्ये वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत.  

टॅग्स :Jharkhandझारखंडcyber crimeसायबर क्राइमmarriageलग्न