शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

Crime News: बाप रे... रातोरात 60 फूट लांब पूल चोरीला, अभियंत्याची पोलिसात तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2022 10:04 IST

भल्या-मोठ्या पुलाची चोरी झाल्याची घटना घडल्याने प्रशासनाने ही बाब गंभीरतेने घेत संबंधित विभागाच्या अभियंत्यास पोलिसात चोरीची तक्रार दाखल करण्यास सांगितले आहे

रोहतास - बिहारच्या रोहतास जिल्ह्याच्या नासरीगंज तालुक्यातील आमियावर स्थित एक लोखंडी पुलच रातोरात गायब झाला आहे. 60 फूट लांब, 10 फूट चौरस आणि 12 फूट उंच असलेला हा पूल अज्ञाताने जेसीबीच्या सहाय्याने पळवून नेला आहे. सोमवारी रात्री जेसीबीच्या सहाय्याने येथील लोखंडी पूल काढून वाहनातून पळवून नेण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे या चोरीची प्रशासन आणि जलसंधारण विभागाला भनकही लागली नाही. 

भल्या-मोठ्या पुलाची चोरी झाल्याची घटना घडल्याने प्रशासनाने ही बाब गंभीरतेने घेत संबंधित विभागाच्या अभियंत्यास पोलिसात चोरीची तक्रार दाखल करण्यास सांगितले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सोन नहर परिमंडळातील आमियावर स्थित एका प्रमुख बंधाऱ्यावर असलेल्या काँक्रिटला समांतर एक जुना पुला होता. विशेष म्हणजे हा पुल 25 वर्षे जुना असल्याचे सांगण्यात येते. मात्र, हा लोखंडी पूलच गायब झाला आहे. यापूर्वीही पुलाच्या काही भागाचे लोखंड अनेकांनी पिकअप वाहनातून पळवले होते. 

सोमवारी जेसीबीच्या सहाय्याने हा पुल उखाडण्यात आला. त्यावेळी, हा पुल कोणाच्या आदेशाने काढण्यात येत असल्याची विचारणा ग्रामस्थांनी केली होती. त्यावेळी, जेसीबी चालकांनी आपण जलसंधारण विभागाचं काम करत असल्याचं सांगितलं. आत्तापर्यंत या पुलातून अंदाजे 20 टनापेक्षा अधिक लोखंड काढण्यात आलं आहे. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, बंधाऱ्याच्या निर्मित्तीअगोदर नावेतून गावातील लोक ये-जा होत होती. सन 1966 मध्ये प्रवाशांना घेऊन जाणारी नाव पलटी होवून अपघात झाला. त्यानंतर, सन 1972 ते 75 या कालावधीत तत्कालीन सरकारने हा पूल बांधला होता. मात्र, हा पुल कमकवूत झाल्यानंतर यास समांतर सीमेंट काँक्रिटचा पूल बांधण्यात आला. त्यामुळे, या पुलावरुन वाहतूक कमी झाली होती. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBiharबिहारPoliceपोलिस