शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
3
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
4
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
5
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
6
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
7
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
8
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
9
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
10
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
11
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
12
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
13
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
14
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
15
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
16
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
17
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
18
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
19
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
20
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश

Crime News: बाप रे... रातोरात 60 फूट लांब पूल चोरीला, अभियंत्याची पोलिसात तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2022 10:04 IST

भल्या-मोठ्या पुलाची चोरी झाल्याची घटना घडल्याने प्रशासनाने ही बाब गंभीरतेने घेत संबंधित विभागाच्या अभियंत्यास पोलिसात चोरीची तक्रार दाखल करण्यास सांगितले आहे

रोहतास - बिहारच्या रोहतास जिल्ह्याच्या नासरीगंज तालुक्यातील आमियावर स्थित एक लोखंडी पुलच रातोरात गायब झाला आहे. 60 फूट लांब, 10 फूट चौरस आणि 12 फूट उंच असलेला हा पूल अज्ञाताने जेसीबीच्या सहाय्याने पळवून नेला आहे. सोमवारी रात्री जेसीबीच्या सहाय्याने येथील लोखंडी पूल काढून वाहनातून पळवून नेण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे या चोरीची प्रशासन आणि जलसंधारण विभागाला भनकही लागली नाही. 

भल्या-मोठ्या पुलाची चोरी झाल्याची घटना घडल्याने प्रशासनाने ही बाब गंभीरतेने घेत संबंधित विभागाच्या अभियंत्यास पोलिसात चोरीची तक्रार दाखल करण्यास सांगितले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सोन नहर परिमंडळातील आमियावर स्थित एका प्रमुख बंधाऱ्यावर असलेल्या काँक्रिटला समांतर एक जुना पुला होता. विशेष म्हणजे हा पुल 25 वर्षे जुना असल्याचे सांगण्यात येते. मात्र, हा लोखंडी पूलच गायब झाला आहे. यापूर्वीही पुलाच्या काही भागाचे लोखंड अनेकांनी पिकअप वाहनातून पळवले होते. 

सोमवारी जेसीबीच्या सहाय्याने हा पुल उखाडण्यात आला. त्यावेळी, हा पुल कोणाच्या आदेशाने काढण्यात येत असल्याची विचारणा ग्रामस्थांनी केली होती. त्यावेळी, जेसीबी चालकांनी आपण जलसंधारण विभागाचं काम करत असल्याचं सांगितलं. आत्तापर्यंत या पुलातून अंदाजे 20 टनापेक्षा अधिक लोखंड काढण्यात आलं आहे. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, बंधाऱ्याच्या निर्मित्तीअगोदर नावेतून गावातील लोक ये-जा होत होती. सन 1966 मध्ये प्रवाशांना घेऊन जाणारी नाव पलटी होवून अपघात झाला. त्यानंतर, सन 1972 ते 75 या कालावधीत तत्कालीन सरकारने हा पूल बांधला होता. मात्र, हा पुल कमकवूत झाल्यानंतर यास समांतर सीमेंट काँक्रिटचा पूल बांधण्यात आला. त्यामुळे, या पुलावरुन वाहतूक कमी झाली होती. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBiharबिहारPoliceपोलिस