शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
3
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
4
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
5
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
6
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
7
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
8
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
9
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
10
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
11
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
12
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
13
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
14
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
15
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
16
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
17
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला
18
IND vs ENG : क्रिस वोक्सला सलाम! खांदा फॅक्चर असताना संघासाठी मैदानात उतरला (VIDEO)
19
शाहरुख खान अन् राणी मुखर्जीसाठी प्रिय मित्र करण जोहरची पोस्ट, म्हणाला, "३३ वर्षांचा हा काळ..."
20
थ्रेडिंगमुळे लिव्हर फेल? आयब्रो करणं पडेल चांगलंच महागात, डॉक्टरांचा धोक्याचा इशारा

सृजन घोटाळा प्रकरण : अशी कोणतीही टाकसाळ नाहीय, जी मला विकत घेईल - नितीश कुमार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2017 12:25 IST

आतापर्यंत अशी कोणतीही टाकसाळ नाहीय, जी मला विकत घेऊ शकेल, अशी प्रतिक्रिया बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी सृजन घोटाळ्याबाबत बोलताना दिली आहे.

पाटणा, दि. 25 -  आतापर्यंत अशी कोणतीही टाकसाळ नाहीय, जी मला विकत घेऊ शकेल, अशी प्रतिक्रिया बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी सृजन घोटाळ्याबाबत बोलताना दिली आहे. नितीश कुमार यांची गुरुवारी संध्याकाळी पक्षाच्या आमदारांसोबत बैठक झाली होती.  यावेळी आपल्या आमदारांना संबोधित करताना त्यांनी सांगितले की, ''सृजन घोटाळा प्रकरण मी स्वतः उजेडात आणला. चौकशीदरम्यान या प्रकरणात अनेक बँकांची भूमिका पाहता हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आले. सीबीआयला या प्रकरणाचा तपास करण्यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली असून येत्या दोन दिवसांत तपास सुरू करण्यातही येणार आहे''.

शिवाय, विरोधकांकडून होत असलेल्या आरोपांवरही नितीश कुमार यांनी स्पष्टीकरण दिले आहे. जी लोकं नैराश्यातून माझ्यावर जे काही आरोप करत आहेत त्यात काहीही तथ्य नाहीय, असे नितीश कुमार म्हणालेत. व्यवस्थेत असलेल्या कमतरतेचा काही जण फायदा घेत आहेत, मात्र लवकरच अशी व्यवस्था करण्यात येणार आहे, जेणेकरुन अशा घटनांची पुनरावृत्ती होणार नाही, असेही ते म्हणालेत. दरम्यान, यावेळी त्यांनी राबडीदेवींचं नाव न घेता त्यांच्यावर टीका केली. 2003 पासून हा घोटाळा सुरू असल्याची टीका करत नितीश कुमार यांनी राबडीदेवी यांना अप्रत्यक्षरित्या टोला लगावला आहे. 

या दरम्यान ‘सृजन’ घोटाळ्यातील एका आरोपीचा तुरुंगात मृत्यू झाला होता.  बिहार सरकारच्या कल्याण विभागाचा अधिकारी महेश मंडल याचा तुरुंगातच मृत्यू झाला.  मंडल किडनीच्या आजाराने त्रस्त असल्याचे सांगण्यात आले होते. यावर, मुख्य आरोपींना विषाचं इंजेक्शन देऊन मारल्याचा आरोप राबडीदेवी यांनी केला आहे.काय आहे घोटाळा?‘सृजन’ या स्वयंसेवी संस्थेच्या खात्यात सरकारी निधीचे झालेले हस्तांतरण पाहून २००८मधील येथील जिल्हाधिकारी विपीन कुमार यांनी आश्चर्य व्यक्त केले होते. त्यानंतर या एनजीओकडे देण्यात आलेले काम तत्काळ थांबवण्याचे आदेश त्यांनी दिले. याप्रकरणी आत्तापर्यंत १८ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. यामध्ये ११ सरकारी अधिकाऱ्यांचा तर ४ सृजन महिला विकास सहयोग समिती लिमिटेडच्या आणि ३ बँकेच्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.या प्रकरणात ‘सृजन’ महिला सहयोग समितीने सरकारी विभाग आणि दोन बँकेच्या कर्मचाऱ्यांना हाताशी धरत घोटाळ्याचा कट रचला होता. त्याद्वारे ८८४ कोटी रूपयांचा चुना सरकारला लावण्यात आला होता. अशाच पद्धतीचे आणखी प्रकार उघड होण्याची शक्यता आहे. कारण बिहार सरकारच्या इतरही काही विभागांचे लेखापरिक्षण करण्यात येत आहे.   

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमार