शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

2025 पर्यंत देशात 10 कोटी रोजगार, CII ने दाखवला आशेचा किरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2019 14:50 IST

देशात 2025 पर्यंत 10 करोड रोजगार निर्मिती होणार असल्याचा दावा कन्फेडरेशन ऑफ इंडीयन इंडस्ट्री (सीआयआय) या संस्थेने केला आहे. केंद्र सरकारकडून रोजगार निर्मिती करण्यासाठी अनेक सुधारणा आणि योजना लागू करण्यात आल्यामुळे नवीन व्यवसाय उभे राहू लागलेत

नवी दिल्ली - देशात 2025 पर्यंत 10 करोड रोजगार निर्मिती होणार असल्याचा दावा कन्फेडरेशन ऑफ इंडीयन इंडस्ट्री (सीआयआय) या संस्थेने केला आहे. केंद्र सरकारकडून रोजगार निर्मिती करण्यासाठी अनेक सुधारणा आणि योजना लागू करण्यात आल्या त्यामुळे नवीन व्यवसाय उभे राहू लागलेत. हेच व्यवसाय आगामी काळात देशातील बेरोजगारांसाठी आशेचा नवा किरण ठरणार आहेत. नव्याने निर्माण होणाऱ्या या व्यवसायांमुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळून वेगवेगळ्या 8 क्षेत्रांमध्ये 10 करोड लोकांना नवीन रोजगार मिळणार आहे. 

सीआयआयचे अध्यक्ष राकेश भारती मित्तल यांनी सांगितले की, देशात नव्याने स्टार्टअप उद्योग आणि कौशल्य विकासाला चालना मिळाल्यामुळे अनेक रोजगाराचे पर्याय उपलब्ध होणार आहेत. त्याचसोबत रोजगाराच्या गुणवत्तेतही वाढ होत असल्याचे सांगण्यात आले. व्यवसायांमध्ये सुलभता आणण्यासाठी सरकारकडून अनेक उपाययोजना करण्यात आल्या. त्यामध्ये लघु उद्योगांसाठी असलेल्या करांमध्ये 25 टक्क्यांपर्यंत कपात करण्यात आली आहे. तसेच व्यवसायासाठी लागणाऱ्या व्याजदर घटवल्याने लघु उद्योजकांना उद्योगासाठी चालना मिळाली. त्यामुळे या उद्योगात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होत आहे. 

राकेश मित्तल यांनी केंद्र सरकारने उद्योगांसाठी चालना दिल्याने रोजगार निर्मिती वाढली असं सांगताना ईपीएफओच्या आकडेवारीचा हवाला दिला. ईपीएफओमध्ये सप्टेंबर 2017 ते डिसेंबर 2018 या दरम्यान जवळपास 72 लाख नवीन नोकरदार वर्ग जोडल्याचे सांगितले. 

कोणकोणत्या क्षेत्रात होणार रोजगार निर्मिती ?

सीआयआयने ज्या 8 क्षेत्रांचा उल्लेख करून 10 करोड रोजगार निर्मितीचा दावा केला आहे त्यामध्ये रिटेल व्यवसाय, बांधकाम व्यवसाय, परिवहन आणि साधन सामुग्री विभाग, पर्यटन व्यवसाय, कापड व्यवसाय, टेक्सटाइल इंडस्ट्री, फूड प्रोसेसिंग आणि वाहन व्यवसाय यांचा समावेश केला आहे. 

सीआयआयने हा दावा केला असला तरी, मागील महिन्यात नॅशनल सँपल सर्व्हे ऑर्गनायझेशनने अहवाल प्रसिद्ध केला होता. या अहवालातून गेल्या 45 वर्षातील सर्वाधिक बेरोजगारी यंदाच्या वर्षात वाढली असल्याचं स्पष्ट झालं होतं.  त्यानंतर, मोदी सरकारवर विरोधकांकडून मोठ्या प्रमाणात टीका झाली होती. तर, मोदी सरकारने हा अहवाल चुकीचा असल्याचं म्हटलं होतं. नोटबंदी आणि जीएसटी या निर्णयाचा लहान-सहान उद्योगांना फटका बसला होता. त्यामुळे बेरोजगारीच्या प्रमाणात वाढ झाल्याचं सांगण्यात येत होते.  

टॅग्स :jobनोकरीIndiaभारतGovernmentसरकार