शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
2
"एवढ्या मोठ्या शुल्कवाढीने..."; ट्रम्प यांनी फोडला H-1B व्हिसा बॉम्ब, भारतानं व्यक्त केली मोठी चिंता!
3
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
4
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
5
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
6
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
7
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
8
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
9
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
10
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
11
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
12
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
13
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
14
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
15
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
16
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
17
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
18
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
19
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
20
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल

2025 पर्यंत देशात 10 कोटी रोजगार, CII ने दाखवला आशेचा किरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2019 14:50 IST

देशात 2025 पर्यंत 10 करोड रोजगार निर्मिती होणार असल्याचा दावा कन्फेडरेशन ऑफ इंडीयन इंडस्ट्री (सीआयआय) या संस्थेने केला आहे. केंद्र सरकारकडून रोजगार निर्मिती करण्यासाठी अनेक सुधारणा आणि योजना लागू करण्यात आल्यामुळे नवीन व्यवसाय उभे राहू लागलेत

नवी दिल्ली - देशात 2025 पर्यंत 10 करोड रोजगार निर्मिती होणार असल्याचा दावा कन्फेडरेशन ऑफ इंडीयन इंडस्ट्री (सीआयआय) या संस्थेने केला आहे. केंद्र सरकारकडून रोजगार निर्मिती करण्यासाठी अनेक सुधारणा आणि योजना लागू करण्यात आल्या त्यामुळे नवीन व्यवसाय उभे राहू लागलेत. हेच व्यवसाय आगामी काळात देशातील बेरोजगारांसाठी आशेचा नवा किरण ठरणार आहेत. नव्याने निर्माण होणाऱ्या या व्यवसायांमुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळून वेगवेगळ्या 8 क्षेत्रांमध्ये 10 करोड लोकांना नवीन रोजगार मिळणार आहे. 

सीआयआयचे अध्यक्ष राकेश भारती मित्तल यांनी सांगितले की, देशात नव्याने स्टार्टअप उद्योग आणि कौशल्य विकासाला चालना मिळाल्यामुळे अनेक रोजगाराचे पर्याय उपलब्ध होणार आहेत. त्याचसोबत रोजगाराच्या गुणवत्तेतही वाढ होत असल्याचे सांगण्यात आले. व्यवसायांमध्ये सुलभता आणण्यासाठी सरकारकडून अनेक उपाययोजना करण्यात आल्या. त्यामध्ये लघु उद्योगांसाठी असलेल्या करांमध्ये 25 टक्क्यांपर्यंत कपात करण्यात आली आहे. तसेच व्यवसायासाठी लागणाऱ्या व्याजदर घटवल्याने लघु उद्योजकांना उद्योगासाठी चालना मिळाली. त्यामुळे या उद्योगात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होत आहे. 

राकेश मित्तल यांनी केंद्र सरकारने उद्योगांसाठी चालना दिल्याने रोजगार निर्मिती वाढली असं सांगताना ईपीएफओच्या आकडेवारीचा हवाला दिला. ईपीएफओमध्ये सप्टेंबर 2017 ते डिसेंबर 2018 या दरम्यान जवळपास 72 लाख नवीन नोकरदार वर्ग जोडल्याचे सांगितले. 

कोणकोणत्या क्षेत्रात होणार रोजगार निर्मिती ?

सीआयआयने ज्या 8 क्षेत्रांचा उल्लेख करून 10 करोड रोजगार निर्मितीचा दावा केला आहे त्यामध्ये रिटेल व्यवसाय, बांधकाम व्यवसाय, परिवहन आणि साधन सामुग्री विभाग, पर्यटन व्यवसाय, कापड व्यवसाय, टेक्सटाइल इंडस्ट्री, फूड प्रोसेसिंग आणि वाहन व्यवसाय यांचा समावेश केला आहे. 

सीआयआयने हा दावा केला असला तरी, मागील महिन्यात नॅशनल सँपल सर्व्हे ऑर्गनायझेशनने अहवाल प्रसिद्ध केला होता. या अहवालातून गेल्या 45 वर्षातील सर्वाधिक बेरोजगारी यंदाच्या वर्षात वाढली असल्याचं स्पष्ट झालं होतं.  त्यानंतर, मोदी सरकारवर विरोधकांकडून मोठ्या प्रमाणात टीका झाली होती. तर, मोदी सरकारने हा अहवाल चुकीचा असल्याचं म्हटलं होतं. नोटबंदी आणि जीएसटी या निर्णयाचा लहान-सहान उद्योगांना फटका बसला होता. त्यामुळे बेरोजगारीच्या प्रमाणात वाढ झाल्याचं सांगण्यात येत होते.  

टॅग्स :jobनोकरीIndiaभारतGovernmentसरकार