शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
3
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
4
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
5
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
6
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
7
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
8
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
9
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
10
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
11
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
12
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
13
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
14
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
15
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
16
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
17
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
18
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
19
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
20
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?

काँग्रेसच्या मध्य प्रदेशमधील जाहीरनाम्यात गाय, गोशाळा आणि गोमुत्र 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2018 10:57 IST

भाजपाच्या उग्र हिंदुत्वाला शह देण्यासाठी सौम्य हिंदुत्वाची कास धरण्याची रणनीती काँग्रेसने आखली आहे.

ठळक मुद्देदीर्घकाळापासून मध्य प्रदेशमधील सत्तेपासून दूर असलेल्या काँग्रेसने राज्यातील सत्तेत पुनरागमन करण्यासाठी कंबर कसली आहेभाजपाच्या उग्र हिंदुत्वाला शह देण्यासाठी सौम्य हिंदुत्वाची कास धरण्याची रणनीती काँग्रेसने आखली आहेकाँग्रेसच्या वचनपत्रामधून गोशाळांची बांधणी, गोमय, गोमुत्र यांचे व्यावसायित स्तरावर उत्पादन आणि मृत गाईंच्या अंत्यसंस्काराची व्यवस्था करण्याबाबत आश्वासने देण्यात आली आहे

भोपाळ - दीर्घकाळापासून मध्य प्रदेशमधील सत्तेपासून दूर असलेल्या काँग्रेसने राज्यातील सत्तेत पुनरागमन करण्यासाठी कंबर कसली आहे. एकीकडे ज्योतिरादित्य शिंदे, कमलनाथ या स्थानिक नेत्यांसोबत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी झंझावाती प्रचार करत आहेत, तर भाजपाच्या उग्र हिंदुत्वाला शह देण्यासाठी सौम्य हिंदुत्वाची कास धरण्याची रणनीती काँग्रेसने आखली आहे. मध्य प्रदेशमधील  विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने आपले वचन पत्र शनिवारी प्रसिद्ध केले असून, या वचनपत्रामधून गोशाळांची बांधणी, गोमय, गोमुत्र यांचे व्यावसायित स्तरावर उत्पादन आणि मृत गाईंच्या अंत्यसंस्काराची व्यवस्था करण्याबाबत आश्वासने देण्यात आली आहेत. मध्य प्रदेश विधानसभेसाठी 28 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे.  या निवडणुकीत हिंदू मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी काँग्रेसने आपल्या वचनपत्राला सौम्य हिंदुत्वाचा रंग दिला आहे. शनिवारी प्रसिद्ध करण्यात आलेल्या वचनपत्रामध्ये चित्रकूट येथून सुरू होणाऱ्या राम पथ गमन मार्गाची राज्याच्या सीमेपर्यंत बांधणी करण्याचे आश्वासन वचनपत्रात देण्यात आले आहे. तसेच तसेच राज्याची जीवनदायिनी असलेल्या नर्मदा नदीच्या परिक्रमा मार्गावर 1100 कोटी रुपये खर्च करून विश्रामगृहांची बांधणी करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.  या वचनपत्रामध्ये उल्लेखनीय बाब म्हणजे राज्यात गोरक्षणासाठी करण्यात आलेल्या  विविध घोषणा होय. काँग्रेसने आपल्या वचनपत्रामधून ग्रामपंचायत स्तरावर गोशाळा उघडण्याचे आणि विशिष्ट्य भागात गोअभयारण्य तयार करण्याची घोषणा केली आहे. तसेच गोशाळेतील गोबर, खत, कंडा, गोमुत्र आणि अन्य वस्तूंचे व्यावसायिक स्तरावर उत्पादन करण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच अपघातात जखमी झालेल्या गाईंवर उपचार तसेच मृत गाईंवर अंत्यसंस्कार करण्याचेही आश्वासन काँग्रेसने या वचननाम्यातून दिले आहे.  दरम्यान, या वचननाम्यातून काँग्रेसने जरी सौम्य हिंदुत्वाची कास धरली असली तरी राज्यात सत्ता आल्यास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखांना वेसण घालण्याचे आश्वासनही काँग्रेसने दिले आहे. राज्यात सत्ता आल्यावर संघाच्या प्रभावाला आळा घालण्याचे वचन काँग्रेसने दिले आहे. सत्ता आल्यावर राज्यातील सरकारी कार्यालये आणि परिसरात आरएसएसच्या शाखा घेण्यावर बंदी घालण्यात येईल. तसेच सरकारी कर्मचाऱ्यांना शाखेमध्ये भाग घेण्याच्या आदेशालाही रद्द करण्यात येईल, असे काँग्रेसने म्हटले आहे.  

टॅग्स :Madhya Pradesh Assembly Election 2018मध्य प्रदेश विधानसभा निवडणूक 2018congressकाँग्रेसPoliticsराजकारणcowगाय