शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या नकवींचा कांगावा! म्हणे, इस्त्रायलने आमच्या ऑईल टँकरवर हल्ला केला, नंतर हुतींनी कब्जा केला
2
डोंबिवलीत त्या तरुणाने ११ व्या मजल्यावरुन उडी का मारली; धक्कादायक कारण आले समोर
3
बीसीसीआयला मिळाला नवा अध्यक्ष, या माजी क्रिकेटपटूच्या नावावर झालं शिक्कामोर्तब
4
एक खेळाडू सामन्याचा निकाल फिरवू...; आशिया कप फायनलपूर्वी वसीम अक्रमची मोठी भविष्यवाणी
5
अभिनेता विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी कशी झाली? प्रत्यक्षदर्शींनी दिली धक्कादायक माहिती, म्हणाले...  
6
Tamilnadu Stampede : अभिनेता थलपती विजयची मोठी घोषणा; चेंगराचेंगरीतील मृतांच्या कुटुंबियांना देणार प्रत्येकी २० लाख
7
महेश मांजरेकरांची पहिली पत्नी दीपा मेहता यांचं निधन, आईच्या आठवणीत मुलाची पोस्ट
8
दिवाळीपूर्वी मोठी बातमी! फक्त १,२०० रुपयांमध्ये देशात कुठेही विमान प्रवासाची संधी; 'या' कंपनीने आणली ऑफर्स
9
Sheetal Devi : सुवर्णवेध! हातांशिवायही अचूक निशाणा; जागतिक तिरंदाजी स्पर्धेत शीतल देवीला गोल्ड मेडल, रचला इतिहास
10
स्वामी चैतन्यानंद फसवणुकीतही माहिर! लोकांवर प्रभाव पाडण्यासाठी बनावट UN-BRICS कार्ड; धक्कादायक माहिती उघड
11
Tamilnadu Stampede : "अभिनेत्याला यायला उशीर, पाण्याची कमतरता आणि..."; चेंगराचेंगरीबद्दल काय म्हणाले पोलीस?
12
IND vs PAK Final, Asia Cup 2025: फायनलमध्ये पाकिस्तानविरोधात भारताचा रेकॉर्ड फारसा चांगला नाही; आजपर्यंत १० वेळा भिडला, पण...
13
Rain Update : काळजी घ्या! बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, आज मुसळधार; विदर्भ, मराठवाड्यासह या भागात बरसणार
14
'पीएम किसान'चा २१ वा हप्ता जाहीर! ३ राज्यांतील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कधी?
15
IND vs PAK Final, Asia Cup 2025: भारत-पाक अंतिम सामना: सूर्यकुमार पाकिस्तानी मंत्री मोहसिन नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारणार?
16
Video - तामिळनाडूतील चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांचे मृतदेह पाहून शिक्षणमंत्री ढसाढसा रडले
17
LPG ते पेन्शन, UPI पासून रेल्वे तिकीटापर्यंत... १ ऑक्टोबरपासून 'हे' ५ नियम बदलणार
18
आधी मसाज करायला आले अन्..; हायकोर्टाच्या वकिलाकडून ब्लॅकमेलिंगद्वारे पैसे उकळले!
19
IND vs PAK Final, Asia Cup 2025 Marathi : आज 'ऑपरेशन पाकिस्तान'! फायनलमध्ये भारतीय संघात दोन मोठे बदल होणार; अशी असेल प्लेइंग 11 
20
वाट चुकलेले दुचाकीस्वार थेट बेलापूर खाडीत; दोन महिन्यांतील दुसरी घटना; एक जण गेला वाहून

काँग्रेसच्या मध्य प्रदेशमधील जाहीरनाम्यात गाय, गोशाळा आणि गोमुत्र 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2018 10:57 IST

भाजपाच्या उग्र हिंदुत्वाला शह देण्यासाठी सौम्य हिंदुत्वाची कास धरण्याची रणनीती काँग्रेसने आखली आहे.

ठळक मुद्देदीर्घकाळापासून मध्य प्रदेशमधील सत्तेपासून दूर असलेल्या काँग्रेसने राज्यातील सत्तेत पुनरागमन करण्यासाठी कंबर कसली आहेभाजपाच्या उग्र हिंदुत्वाला शह देण्यासाठी सौम्य हिंदुत्वाची कास धरण्याची रणनीती काँग्रेसने आखली आहेकाँग्रेसच्या वचनपत्रामधून गोशाळांची बांधणी, गोमय, गोमुत्र यांचे व्यावसायित स्तरावर उत्पादन आणि मृत गाईंच्या अंत्यसंस्काराची व्यवस्था करण्याबाबत आश्वासने देण्यात आली आहे

भोपाळ - दीर्घकाळापासून मध्य प्रदेशमधील सत्तेपासून दूर असलेल्या काँग्रेसने राज्यातील सत्तेत पुनरागमन करण्यासाठी कंबर कसली आहे. एकीकडे ज्योतिरादित्य शिंदे, कमलनाथ या स्थानिक नेत्यांसोबत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी झंझावाती प्रचार करत आहेत, तर भाजपाच्या उग्र हिंदुत्वाला शह देण्यासाठी सौम्य हिंदुत्वाची कास धरण्याची रणनीती काँग्रेसने आखली आहे. मध्य प्रदेशमधील  विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने आपले वचन पत्र शनिवारी प्रसिद्ध केले असून, या वचनपत्रामधून गोशाळांची बांधणी, गोमय, गोमुत्र यांचे व्यावसायित स्तरावर उत्पादन आणि मृत गाईंच्या अंत्यसंस्काराची व्यवस्था करण्याबाबत आश्वासने देण्यात आली आहेत. मध्य प्रदेश विधानसभेसाठी 28 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे.  या निवडणुकीत हिंदू मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी काँग्रेसने आपल्या वचनपत्राला सौम्य हिंदुत्वाचा रंग दिला आहे. शनिवारी प्रसिद्ध करण्यात आलेल्या वचनपत्रामध्ये चित्रकूट येथून सुरू होणाऱ्या राम पथ गमन मार्गाची राज्याच्या सीमेपर्यंत बांधणी करण्याचे आश्वासन वचनपत्रात देण्यात आले आहे. तसेच तसेच राज्याची जीवनदायिनी असलेल्या नर्मदा नदीच्या परिक्रमा मार्गावर 1100 कोटी रुपये खर्च करून विश्रामगृहांची बांधणी करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.  या वचनपत्रामध्ये उल्लेखनीय बाब म्हणजे राज्यात गोरक्षणासाठी करण्यात आलेल्या  विविध घोषणा होय. काँग्रेसने आपल्या वचनपत्रामधून ग्रामपंचायत स्तरावर गोशाळा उघडण्याचे आणि विशिष्ट्य भागात गोअभयारण्य तयार करण्याची घोषणा केली आहे. तसेच गोशाळेतील गोबर, खत, कंडा, गोमुत्र आणि अन्य वस्तूंचे व्यावसायिक स्तरावर उत्पादन करण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच अपघातात जखमी झालेल्या गाईंवर उपचार तसेच मृत गाईंवर अंत्यसंस्कार करण्याचेही आश्वासन काँग्रेसने या वचननाम्यातून दिले आहे.  दरम्यान, या वचननाम्यातून काँग्रेसने जरी सौम्य हिंदुत्वाची कास धरली असली तरी राज्यात सत्ता आल्यास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखांना वेसण घालण्याचे आश्वासनही काँग्रेसने दिले आहे. राज्यात सत्ता आल्यावर संघाच्या प्रभावाला आळा घालण्याचे वचन काँग्रेसने दिले आहे. सत्ता आल्यावर राज्यातील सरकारी कार्यालये आणि परिसरात आरएसएसच्या शाखा घेण्यावर बंदी घालण्यात येईल. तसेच सरकारी कर्मचाऱ्यांना शाखेमध्ये भाग घेण्याच्या आदेशालाही रद्द करण्यात येईल, असे काँग्रेसने म्हटले आहे.  

टॅग्स :Madhya Pradesh Assembly Election 2018मध्य प्रदेश विधानसभा निवडणूक 2018congressकाँग्रेसPoliticsराजकारणcowगाय