शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

काँग्रेसच्या मध्य प्रदेशमधील जाहीरनाम्यात गाय, गोशाळा आणि गोमुत्र 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2018 10:57 IST

भाजपाच्या उग्र हिंदुत्वाला शह देण्यासाठी सौम्य हिंदुत्वाची कास धरण्याची रणनीती काँग्रेसने आखली आहे.

ठळक मुद्देदीर्घकाळापासून मध्य प्रदेशमधील सत्तेपासून दूर असलेल्या काँग्रेसने राज्यातील सत्तेत पुनरागमन करण्यासाठी कंबर कसली आहेभाजपाच्या उग्र हिंदुत्वाला शह देण्यासाठी सौम्य हिंदुत्वाची कास धरण्याची रणनीती काँग्रेसने आखली आहेकाँग्रेसच्या वचनपत्रामधून गोशाळांची बांधणी, गोमय, गोमुत्र यांचे व्यावसायित स्तरावर उत्पादन आणि मृत गाईंच्या अंत्यसंस्काराची व्यवस्था करण्याबाबत आश्वासने देण्यात आली आहे

भोपाळ - दीर्घकाळापासून मध्य प्रदेशमधील सत्तेपासून दूर असलेल्या काँग्रेसने राज्यातील सत्तेत पुनरागमन करण्यासाठी कंबर कसली आहे. एकीकडे ज्योतिरादित्य शिंदे, कमलनाथ या स्थानिक नेत्यांसोबत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी झंझावाती प्रचार करत आहेत, तर भाजपाच्या उग्र हिंदुत्वाला शह देण्यासाठी सौम्य हिंदुत्वाची कास धरण्याची रणनीती काँग्रेसने आखली आहे. मध्य प्रदेशमधील  विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने आपले वचन पत्र शनिवारी प्रसिद्ध केले असून, या वचनपत्रामधून गोशाळांची बांधणी, गोमय, गोमुत्र यांचे व्यावसायित स्तरावर उत्पादन आणि मृत गाईंच्या अंत्यसंस्काराची व्यवस्था करण्याबाबत आश्वासने देण्यात आली आहेत. मध्य प्रदेश विधानसभेसाठी 28 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे.  या निवडणुकीत हिंदू मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी काँग्रेसने आपल्या वचनपत्राला सौम्य हिंदुत्वाचा रंग दिला आहे. शनिवारी प्रसिद्ध करण्यात आलेल्या वचनपत्रामध्ये चित्रकूट येथून सुरू होणाऱ्या राम पथ गमन मार्गाची राज्याच्या सीमेपर्यंत बांधणी करण्याचे आश्वासन वचनपत्रात देण्यात आले आहे. तसेच तसेच राज्याची जीवनदायिनी असलेल्या नर्मदा नदीच्या परिक्रमा मार्गावर 1100 कोटी रुपये खर्च करून विश्रामगृहांची बांधणी करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.  या वचनपत्रामध्ये उल्लेखनीय बाब म्हणजे राज्यात गोरक्षणासाठी करण्यात आलेल्या  विविध घोषणा होय. काँग्रेसने आपल्या वचनपत्रामधून ग्रामपंचायत स्तरावर गोशाळा उघडण्याचे आणि विशिष्ट्य भागात गोअभयारण्य तयार करण्याची घोषणा केली आहे. तसेच गोशाळेतील गोबर, खत, कंडा, गोमुत्र आणि अन्य वस्तूंचे व्यावसायिक स्तरावर उत्पादन करण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच अपघातात जखमी झालेल्या गाईंवर उपचार तसेच मृत गाईंवर अंत्यसंस्कार करण्याचेही आश्वासन काँग्रेसने या वचननाम्यातून दिले आहे.  दरम्यान, या वचननाम्यातून काँग्रेसने जरी सौम्य हिंदुत्वाची कास धरली असली तरी राज्यात सत्ता आल्यास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखांना वेसण घालण्याचे आश्वासनही काँग्रेसने दिले आहे. राज्यात सत्ता आल्यावर संघाच्या प्रभावाला आळा घालण्याचे वचन काँग्रेसने दिले आहे. सत्ता आल्यावर राज्यातील सरकारी कार्यालये आणि परिसरात आरएसएसच्या शाखा घेण्यावर बंदी घालण्यात येईल. तसेच सरकारी कर्मचाऱ्यांना शाखेमध्ये भाग घेण्याच्या आदेशालाही रद्द करण्यात येईल, असे काँग्रेसने म्हटले आहे.  

टॅग्स :Madhya Pradesh Assembly Election 2018मध्य प्रदेश विधानसभा निवडणूक 2018congressकाँग्रेसPoliticsराजकारणcowगाय