शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

दहावी, बारावी परीक्षा रद्द करण्यास सीबीएसईला कोर्टाचा ग्रीन सिग्नल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2020 03:58 IST

आयसीएसई बोर्डाच्या वकिलांनी न्यायालयात सांगितले की, त्यांचीही सीबीएसईशी मिळतीजुळती योजना आहे. मात्र, यात सरासरी गुणांचा फॉर्म्युला वेगळा आहे.

नवी दिल्ली : कोरोना साथीमुळे दहावी आणि बारावीच्या परीक्षा रद्द करण्यास सर्वोच्च न्यायालयाने केंद्र आणि सीबीएसईला परवानगी दिली आहे. न्या. ए.एम. खानविलकर, न्या. दिनेश माहेश्वरी आणि न्या. संजीव खन्ना यांच्या पीठाने सीबीएसईला परीक्षा रद्द करण्यासाठी एक अधिसूचना जारी करण्यास परवानगी दिली. केंद्र आणि सीबीएसईकडून हजर असलेले अतिरिक्त सॉलिसिटर जनरल तुषार मेहता म्हणाले की, मूल्यांकन योजना बोर्ड परीक्षांच्या गत तीन विषयांत विद्यार्थ्यांना मिळालेल्या गुणांच्या आधारे असेल. आयसीएसई बोर्डाच्या वकिलांनी न्यायालयात सांगितले की, त्यांचीही सीबीएसईशी मिळतीजुळती योजना आहे. मात्र, यात सरासरी गुणांचा फॉर्म्युला वेगळा आहे.>आम्ही दहावीच्या पुन्हा परीक्षा घेण्याबाबत विचार करू शकतो. याबाबत एका आठवड्याच्या आत अधिसूचना जारी केली जाऊ शकते आणि वेबसाईटवर अपलोड केली जाईल.सीबीएसई आणि आयसीएसई यांनी न्यायालयाला सांगितले की, दहावी आणि बारावी परीक्षेचे निकाल जुलैच्या मध्यापर्यंत घोषित करण्यात येतील.>काय आहेमूल्यांकन योजना?न्यायालयाने सीबीएसईच्या ज्या मूल्यांकन योजनेला मंजुरी दिली आहे त्यानुसार दहावी आणि बारावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचे निकाल परीक्षेतील त्यांच्या गुणवत्तेच्या आधारे घोषित करण्यात येतील. यात म्हटले आहे की, ज्या विद्यार्थ्यांनी तीनपेक्षा अधिक विषयांत परीक्षा दिली आहे आणि त्यांना ज्या तीन विषयांत सर्वाधिक गुण मिळाले आहेत त्याचे सरासरी गुण न झालेल्या विषयांसाठी दिले जातील. जे विद्यार्थी केवळ तीन विषयांत परीक्षेला बसले असतील त्यांना ज्या दोन विषयांत सर्वाधिक गुण मिळाले असतील त्याच्या सरासरी गुणांइतके गुण परीक्षा न झालेल्या विषयांसाठी दिले जातील.>सीबीएसईच्याबारावीच्या बोर्ड परीक्षा15 फेब्रुवारीपासून सुरू झाल्या होत्या आणि त्या एप्रिलमध्ये समाप्त होणार होत्या. दहावीच्या परीक्षा21 फेब्रुवारीला सुरू झाल्या होत्या आणि २९ मार्चला समाप्त होणार होत्या. आयसीएसई बोर्डाने दहावी आणि बारावीच्या परीक्षा स्थगित केल्या होत्या.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय