शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

Court: 'लालुजी भाजपसोबत असते तर ते राजा हरिश्चंद्र, पण आज तुरुंगवासाची शिक्षा'

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2022 16:18 IST

Court: सीबीआय न्यायालयाने लालू प्रयाद यांना 5 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. यासोबतच 60 लाखांचा दंडही ठोठावण्यात आला.

पाटणा - बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे सुप्रीमो लालू प्रसाद यांना सीबीआयच्या विशेष न्यायालयाने मोठा दणका दिला आहे. चारा घोटाळ्यातील सर्वात मोठ्या आणि पाचव्या नंबरच्या डोरंडा कोषागार प्रकरणात दोषी ठरलेले लालू प्रसाद यादव यांना 5 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. न्यायालयाच्या या निकालानंतर लालूप्रसाद यादव यांचे सुपुत्र तेजस्वी यादव यांनी भाजपला लक्ष्य केलं आहे. 

सीबीआय न्यायालयाने लालू प्रयाद यांना 5 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. यासोबतच 60 लाखांचा दंडही ठोठावण्यात आला. 15 फेब्रुवारी रोजी सीबीआय न्यायाधीश एस.के. शशी यांच्या विशेष न्यायालयाने 21 फेब्रुवारी रोजी लालूंसह 38 जणांना दोषी ठरवत शिक्षेवर सुनावणीची तारीख निश्चित करण्यात आली होती. त्यानुसार लालू यादव यांना 5 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्यानंतर, माध्यमांशी बोलताना तेजस्वी यादव यांनी निकालावर प्रतिक्रिया दिली. 

''लालुंजींनी भाजपसोबत हातमिळवणी केली असती तर त्यांना राजा हरिश्चंद्र असं संबोधलं असतं. पण, ते आज भाजप आणि आरएसएसशी पंगा घेत आहेत, त्यामुळेच त्यांना तुरुंगवासाची शिक्षा'' झाल्याचं लालू प्रसाद यादव यांचे पुत्र आणि राजदचे नेते तेजस्वी यादव यांनी म्हटले. लालू प्रसाद यादव यांना चारा घोटाळ्याप्रकरणी 5 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली. तेजस्वी यादव यांनी केंद्रातील भाजप सरकारवर टीका केली.   दरम्यान, लालू प्रसाद यादव सध्या प्रकृती अस्वस्थेमुळे रांचीमधील रिम्समध्ये येथे उपचार घेत आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाचीही लागण झाली होती. त्यातून ते बरे झाले. 

तेजस्वी यादव यांनी सीबीआय, ईडीवरही निशाणा साधला आहे. देशात एकमेव चारा घोटाळाच झालाय का, इतर घोटाळ्याचं काय? असा प्रश्न त्यांनी विचारला आहे. तसेच, विजय मल्ल्या, मेहुल चोक्सी, नीरव मोदी हे कुठं आहेत, असेही तेजस्वी यांनी म्हटले. 

4 वेगवेगळ्या घोटाळ्यात शिक्षा

विशेष सीबीआय न्यायालयाने लालू प्रसाद यादव यांना आयपीसीच्या कलम 409, 420, 467, 468, 471, कट रचण्याशी संबंधित कलम 120बी आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम 12(2) अंतर्गत दोषी ठरवले आहे. या प्रकरणात सीबीआयने एकूण 170 आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल केले होते, तर 26 सप्टेंबर 2005 रोजी 148 आरोपींवर आरोप निश्चित करण्यात आले होते. चार वेगवेगळ्या चारा घोटाळ्यात 14 वर्षांची शिक्षा झालेल्या लालूप्रसाद यादव यांच्यासह 99 जणांविरुद्ध सर्व पक्षकारांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने आपला निकाल राखून ठेवला होता. 

टॅग्स :Lalu Prasad Yadavलालूप्रसाद यादवBJPभाजपाTejashwi Yadavतेजस्वी यादवRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघCourtन्यायालय