शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंचा भुजबळांवर हल्लाबोल; मुख्यमंत्र्यांनी बाजू सावरली, म्हणाले...
2
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
3
"अमेठीत पोलिंग बूथ कॅप्चर करणारे एका सामान्य कार्यकर्तीकडून हरले..."; स्मृती इराणींचा घणाघात
4
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
5
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
6
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
7
रिपाईला एकही जागा मिळाली नाही, पण मला कॅबिनेट मिळणार - रामदास आठवले
8
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
9
Uddhav Thackeray : "भाजपा RSS लाही नकली संघ म्हणू शकतो; बंदीही घालू शकतो, 100 वे वर्ष धोक्याचे"
10
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
11
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
12
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
13
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
14
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
15
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका
16
मंगळाचा रुचक राजयोग: ५ राशींना मंगलमय काळ, अधिक कमाईची संधी; उत्तम यश, प्रगती योग!
17
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
18
Rakhi Sawant : "मला खूप मजा करायचीय, माझ्यासाठी प्रार्थना करा..."; राखी सावंतचा सर्जरी आधीचा Video व्हायरल
19
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे
20
Gratuity Rules : खासगी नोकरीमध्ये ग्रॅच्युइटी मिळते का, त्याची गणना कशी होते माहितीये?

देशात राज्यपालांच्या बदल्या, 35 वर्षांनंतर जम्मू काश्मीरसाठी राजकीय व्यक्ती नियुक्त

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2018 9:32 PM

राष्ट्रपतींकडून देशातील अनेक राज्यांच्या राज्यपालपदी फेरबदल करण्यात आले आहेत. जम्मू काश्मीर, बिहार यांसह हरयाणा, उत्तराखंड, सिक्कीम, मेघालय आणि त्रिपुरा या राज्यांचा समावेश आहे.

नवी दिल्ली - राष्ट्रपतींकडून देशातील अनेक राज्यांच्या राज्यपालपदी फेरबदल करण्यात आले आहेत. जम्मू काश्मीर, बिहार यांसह हरयाणा, उत्तराखंड, सिक्कीम, मेघालय आणि त्रिपुरा या राज्यांचा समावेश आहे. बिहारचे सध्याचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांना जम्मू आणि काश्मीरच्या राज्यपालपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर उत्तर प्रदेशमधील भाजपचे ज्येष्ठ नेते लालजी टंडन यांना बिहारचे राज्यपाल बनविण्यात आले आहे. 

मोदी सरकारच्या काळात राज्यपालांच्या बदल्यावरुन अनकेदा राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. या बदल्यांमुळे मोदी सरकारवर टीकाही करण्यात आली होती. मात्र, पुन्हा एकदा राज्यपालांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी राज्यपालांच्या बदलीचे आदेश काढले आहेत. त्यानुसार, देशातील 4 राज्यांच्या राज्यपालांच्या बदल्या करण्यात आल्या असून तीन नवीन राज्यपालांची नियुक्ती करण्यात आली आहे. नवीन नियुक्त करण्यात आलेल्या राज्यपालांमध्ये उत्तर प्रदेश भाजपचे ज्येष्ठ नेते लालजी टंडन, सत्यदेव नारायण राव आणि बेबी राणी मौर्य यांचा समावेश आहे. बेबी राणी यांना उत्तराखंडचे राज्यपाल बनविण्यात आले आहे. उत्तर प्रदेशच्या रहिवासी असलेल्या मौर्य या भाजप नेत्या आणि महिला आघाडीशी जोडल्या आहेत. तर, सत्यदेव नारायण राव यांना हरयाणाचे राज्यपाल बनविण्यात आले आहे. तर तेथील राज्यपाल तथागत राय यांची मेघालय येथे बदली करण्यात आली आहे. तर मेघालयचे सध्याचे राज्यपाल गंगाप्रसाद यांना सिक्कीमच्या राज्यपालपदी नियुक्ती देण्यात आली आहे. 

दरम्यान, जम्मू आणि काश्मीरमध्ये साडे तीन दशकांनंतर राजकीय राज्यपाल मिळाला आहे. सन 1984 मध्ये जगमोहन यांनी जम्मू आणि काश्मीरच्या राज्यपालपदी शपथ घेतली होती. तेव्हापासून आजपर्यंत काश्मीरमध्ये राजकीय व्यक्तीला हे पद देण्यात आले नाही. दहशतवाद्यांनी ग्रासलेल्या या स्वर्गभूमीला नेहमीच सैन्य अधिकारी किंवा सेवानिवृत्त सनदी अधिकारीच राज्यपालपदी नियुक्त करण्यात येत होता. 

 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरPoliticsराजकारणNarendra Modiनरेंद्र मोदीHaryanaहरयाणाBiharबिहार