शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
2
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
3
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव
4
ज्याला घुसखोर म्हणून महाराष्ट्रातून हाकललं, त्याला ममता सरकारने आणखी ४ जणांसह बांगलादेशमधून परत आणलं  
5
शेतीसाठी AI धोरण मंजूर, धारावीकरांसाठी खुशखबर, 'या' लोकांचे मानधन दुप्पट; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
6
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
7
होम लोनचा EMI भरुन-भरुन थकलायत, ही पद्धत वापरुन पाहा; लवकर संपेल तुमचं कर्ज
8
KEM Hospital: ‘केईएममध्ये नव्हे; तर आवारात पाणी तुंबले’ रुग्णालय प्रशासनाची न्यायालयाला माहिती
9
"कमेंट्समध्ये ट्रोल करतात अन् पर्सनल मेसेजमध्ये लोक...", राजेश्वरी खरातने व्यक्त केला राग
10
विमान अपघातापासून बॉलिवूडच्या सुपरस्टारचा थोडक्यात वाचलेला जीव, काय घडलेलं?
11
भयावह क्षण...! विमान कोसळताच विद्यार्थ्यांनी हॉस्टेलच्या बाल्कनीतून मारल्या उड्या, समोर आला हृदयाचा ठोका चुकवणारा नवा VIDEO
12
वर्ल्ड कप आधी स्मृती मानधनाची मुसंडी! ५ वर्षांनी पुन्हा झाली वनडेची 'क्वीन'
13
एअर इंडिया विमान अपघात: प्रेमानंद महाराजांची मोठी शिकवण; तुम्हालाही ‘ती’ गोष्ट माहिती हवीच!
14
Sonam Raghuvanshi : "लग्नानंतर राजा त्याच्या मित्रांसह..."; सोनम रघुवंशीने रिसेप्शनला नवऱ्याला दिलेलं 'हे' वचन
15
स्वामी विवेकानंदांना महाकालीकडे मागायचे होते एक, पण मागितले भलतेच आणि ते मिळालेसुद्धा!
16
'आमच्या देशाकडे पाहिलं तरी डोळे काढून...’, पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांची इस्राइलला धमकी
17
चीन-अमेरिका 'व्यापार युद्धात' लागली भारताची लॉटरी! आकडे बघून ड्रॅगनची झोप उडेल, लागेल मिरची
18
मारुतीची पहिली e Vitara लाँच झाली! व्हेरिअंटनुसार ३५ लाख ते ४२ लाख किंमत, फिचर्स, रेंज आणि कोण घेणार पहा...
19
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्तानची लुडबुड; शाहबाज शरीफ यांना कशाची वाटतेय भीती?
20
विरार- अलिबाग कॉरिडोरच्या भूसंपादनाला मिळणार गती!

भाजपपासून मुक्त झाल्याशिवाय देश प्रगती करू शकत नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2023 10:15 IST

सोनिया गांधींचा हल्लाबोल : काळ्या राजवटीविरुद्ध आवाज उठविण्याचे आवाहन

हुबळी : कर्नाटक आणि एकूणच भारत सत्ताधारी पक्षाच्या लूट, लबाडी, अहंकार, द्वेष यातून मुक्त झाल्याशिवाय प्रगती करू शकत नाही, अशा शब्दांत काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांनी शनिवारी भाजप सरकारवर हल्लाबोल केला. भाजप सरकारच्या काळ्या राजवटीविरोधात आपला आवाज मजबूत करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे.

चार वर्षांनी त्यांनी प्रथमच प्रचार सभा घेतली. त्यावेळी भाजपवर टीका करताना त्या म्हणाल्या की, राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा ही द्वेष पसरविणाऱ्यांच्या विरोधात होती. भाजपच्या लूट, लबाडी, अहंकार आणि द्वेषाच्या वातावरणातून मुक्त झाल्याशिवाय कर्नाटक किंवा भारत दोन्हीही प्रगती करू शकत नाही.

सोनिया गांधी यांनी आरोप केला की, दरोडे टाकणे हा सत्तेतील लोकांचा व्यवसाय झाला आहे. भाजपने दरोडा टाकून सत्ता हस्तगत केली आहे.

कर्नाटकचे लोक कोणाच्या आशीर्वादावर अवलंबून नाहीत...

सोनिया गांधी म्हणाल्या की, ते म्हणतात की जर ते जिंकले नाहीत तर कर्नाटकला पंतप्रधान मोदी यांचा आशीर्वाद मिळणार नाही, दंगली होतील. तुम्ही कर्नाटकातील जनतेला लाचार समजू नका. कर्नाटकचे लोक कोणाच्या आशीर्वादावर अवलंबून नाहीत तर त्यांच्या मेहनतीवर त्यांचा विश्वास आहे. कोणत्याही नेत्याच्या आशीर्वादाने जनतेचे भवितव्य ठरत नाही.

दहशतवाद मला चांगला समजतो : राहुल गांधी

माझी आजी इंदिरा गांधी आणि वडील राजीव गांधी यांची दहशतवाद्यांनी हत्या केली होती. अशा परिस्थितीत मला पंतप्रधान मोदींपेक्षा दहशतवाद चांगला समजतो, अशा शब्दात काँग्रेसचे

नेते राहुल गांधी यांनी शनिवारी पलटवार केला.

‘द केरळ स्टोरी’ चित्रपटावरून सुरू असलेल्या वादाचा संदर्भ देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी काँग्रेसवर निशाणा साधला. समाजाला उद्ध्वस्त करण्याच्या ‘दहशतवादी प्रवृत्ती’सोबत हा पक्ष उभा असल्याची टीका काँग्रेसवर केली होती. राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांच्या टीकेला येथे एका सभेत उत्तर दिले. ते म्हणाले की, पंतप्रधानांनी कर्नाटकातील तरुणांना सांगावे की त्यांनी गेल्या तीन वर्षांत राज्यातील ४० टक्के कमिशन विरोधात काय केले.

राहुल गांधी म्हणाले की, पंतप्रधान कर्नाटकात येतात. पण, भ्रष्टाचारावर एक शब्दही काढत नाहीत. गॅस सिलिंडर पूर्वी ४०० रुपयांचे होते.

मुख्यमंत्रिपदाबाबत पक्षाचा निर्णय मान्य असेल : शिवकुमार

काँग्रेस कर्नाटकात किमान १४१ जागा जिंकेल आणि मुख्यमंत्रिपदाबाबत पक्षाचा निर्णय मान्य असेल, असे प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी शनिवारी सांगितले. एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले की, माझ्यासाठी पक्ष आधी आणि मुख्यमंत्रिपद नंतर आहे.

टॅग्स :Sonia Gandhiसोनिया गांधीKarnatakकर्नाटकcongressकाँग्रेसBJPभाजपा