शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

एक मत 53 हजारांचं, EC च्या अजब कारभारामुळे कपाळावर हात माराल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2018 13:28 IST

उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांची विनंती निवडणूक आयोगाने फेटाळून लावली आहे.

लखनौ- निवडणुकीला लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव मानलं जातं. मतदान हे श्रेष्ठदान, लोकशाही देशातील नागरिकाचं परम कर्तव्य, पवित्र अधिकार समजला जातो. तसेच जगातील सर्वात मोठी लोकशाही आणि यशस्वी लोकशाही म्हणून भारताचे जगभरात नाव घेतले जात असले तरी काही नियमांमुळे देशाच्या तिजोरीवर चांगलाच ताण पडत आहे. 25 जून रोजी महाराष्ट्रात होणाऱ्या विधानपरिषदेच्या पदवीधर मतदारसंघासाठीच्या निवडणुकांबाबत आता असाच एक मुद्दा समोर आला आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयामुळे उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांच्या एका मतासाठी 53 हजार रुपयांचा खर्च करावा लागणार आहे.

आपण महाराष्ट्रापासून दूर राहात असल्यामुळे आपल्याला पोस्टाद्वारे मतदान करु देण्यात यावे असी विनंती उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांनी निवडणूक आयोगाला केली होती. त्याचप्रमाणे महाराष्ट्राबाहेर राहाणाऱ्या नागरिकांना विधानपरिषदेच्याही  निवडणुकांसाठी तशी मुभा देण्यात यावी अशीही विनंती त्यांनी आयोगाला केली होती. मात्र निवडमूक आयोगाने ही विनंती फेटाळली. आता राज्यपाल नाईक यांना स्वतः मुंबईत येऊन मतदान करावे लागेल. त्यांचा विमानप्रवास तसेच झेड प्लस सुरक्षेचा खर्च हा 53 हजारांवर जाणार असून त्यासाठी सरकारी तिजोरीतून खर्च केला जाईल.

टॅग्स :Ram Naikराम नाईकUttar Pradeshउत्तर प्रदेशGovernmentसरकारElectionनिवडणूकMaharashtraमहाराष्ट्रVidhan Parishadविधान परिषद