सुधारित -आरोप मंत्र्यावर; सरकारवर नाही

By Admin | Updated: July 19, 2015 21:24 IST2015-07-19T21:24:27+5:302015-07-19T21:24:27+5:30

सुधारित -आरोप मंत्र्यावर; सरकारवर नाही

Corrected by Reuters Not on government | सुधारित -आरोप मंत्र्यावर; सरकारवर नाही

सुधारित -आरोप मंत्र्यावर; सरकारवर नाही

धारित -आरोप मंत्र्यावर; सरकारवर नाही
सुधारित -आरोप मंत्र्यावर; सरकारवर नाही
राकेश सिंग : स्वतंत्र चौकशीसाठी सरकारची तयारी
नागपूर : काँग्रेस व विरोधकांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकारमधील काही मंत्र्यांवर आरोप केले आहेत. सरकारवर कोणतेही आरोप नसल्याची क्लीन चिट भाजपचे महाजनसंपर्क अभियानाचे महाराष्ट्राचे सहप्रभारी खासदार राकेश सिंग यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.
महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांचा चिक्की घोटाळा व शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यावर बोगस पदवीसंदर्भात विरोधी पक्षाने आरोप केले आहेत. मुख्यमंत्र्यांनी यावर भूमिका स्पष्ट केली आहे. या आरोपाची स्वतंत्र चौकशी करण्याची सरकारची तयारी असल्याचे त्यांनी प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.
मध्य प्रदेशातील व्यापमं घोटाळ्याच्या चौकशीचे आदेश मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांनीच दिले होते. यात कुणालाही पाठीशी घालण्याचा प्रयत्न नाही. उच्च न्यायालयाच्या नियंत्रणात एसआयटी गठित करण्यात आली होती. काँग्रेसच्या काही लोकांनी उच्च न्यायालयाकडे सीबीआय चौकशीची मागणी केली होती. परंतु ही मागणी फेटाळली होती. सवार्ेच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार सीबीआय चौकशी सुरू आहे. कुणाचाही मृत्यू होणे ही घटना चांगली नाही. परंतु सर्वच मृत्यूचा या घटनेसोबत संबंध जोडता येणार नाही. व्यापमं व महाराष्ट्रातील घोटाळ्याच्या आरोपाचा भाजपवर कोणताही परिणाम होणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केेले. पक्षाचे प्रदेश प्रवक्ते गिरीश व्यास, शहर अध्यक्ष आमदार कृष्णा खोपडे, सुधाकर कोहळे आदी यावेळी उपस्थित होते.
चौकट..
११ कोटींहून अधिक सदस्य
भाजपने सदस्यता नोंदणी अभियान हाती घेतले होते. एसएमएसच्या माध्यमातून १० कोटी सदस्यांचे उद्दिष्ट ठेवले होते. प्रत्यक्षात ११ कोटींहून अधिक प्राथमिक सदस्यांची नोंदणी करण्यात आली. महाराष्ट्रात १ कोटी ५ लाख तर नागपूर शहरात ६ लाख १३ हजार सदस्यांची नोंदणी करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
चौकट..
महाप्रशिक्षण शिबिर
पक्षाने महासंपर्क अभियान हाती घेतले आहे. यात केंद्र, राज्य, जिल्हा व विभागस्तरावर १५ लाखांहून अधिक प्रतिनिधींना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यात सदस्यांना प्रशिक्षण देणाऱ्यांचाही समावेश आहे. तिसऱ्या टप्प्यात महाप्रशिक्षण अभियान राबविले जाणार आहे. यात कार्यक र्त्यांना प्रशिक्षण देण्यात येईल. यानिमित्ताने महाराष्ट्रातील तयारीचा आढावा घेत असल्याची माहिती त्यांनी दिली.

Web Title: Corrected by Reuters Not on government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.