शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

coronavirus: कोरोनाच्या रुग्णांसोबत जनावरांपेक्षा वाईट व्यवहार, सुप्रीम कोर्टाने या राज्याला लगावली फटकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2020 16:47 IST

एकीकडे आरोग्य कर्मचारी रुण्यांवर उपचारांसाठी प्रयत्न करत असले तरी काही ठिकाणी कोरोनाबाधित रुग्ण आणि कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या मृतदेहांची हेळसांड होत असल्याच्या बातम्या येत आहेत.

ठळक मुद्देसर्वोच्च न्यायालयाने दिल्ली सरकारला फटकार लगावताना दिल्लीतील रुग्णालयांची अवस्था चिंताजनक असल्याचे सांगितले. कोरोना बाधितांच्या मृतदेहांची हेळसांड होत आहे, तर काही ठिकाणी मृतदेह कचऱ्यामध्ये सापडत आहेत. लोकांना जनावरांपेक्षा वाईट वागणूक दिली जात आहेसर्वोच्च न्यायालयाने दिल्ली सरकारकडून करण्यात येत असलेल्या कोरोनाच्या कमी चाचण्यांबाबतही नाराजी व्यक्त केली आहे.

नवी दिल्ली - कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे देशातील बहुतांश भागात आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण येत आहे. एकीकडे आरोग्य कर्मचारी रुण्यांवर उपचारांसाठी प्रयत्न करत असले तरी काही ठिकाणी कोरोनाबाधित रुग्ण आणि कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या मृतदेहांची हेळसांड होत असल्याच्या बातम्या येत आहेत. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने स्वतः या प्रकाराची दखल घेतली आहे. तसेच कोरोना बाधितांच्या मृतदेहांची हेळसांड होत आहे, तर काही ठिकाणी मृतदेह कचऱ्यामध्ये सापडत आहेत. लोकांना जनावरांपेक्षा वाईट वागणूक दिली जात आहे, असे मत नोंदवत सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी न्यायमूर्ती अशोक भूषण, न्यायमूर्ती संजय किशन कौल आणि न्यायमूर्ती एम. आर. शाह यांच्या खंडपीठाकडे सोपवली आहे.दरम्यान, या सुनावणीदरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली सरकारला फटकार लगावताना दिल्लीतील रुग्णालयांची अवस्था चिंताजनक असल्याचे सांगितले. एमएचएच्या सूचनांचे पालन होताना दिसत नाही आहे. तसेच रुग्णालयांमध्ये मृतदेहांचीही योग्य व्यवस्था होत नाही आहे. काही प्रकरणात तर रुग्णांच्या नातेवाईकांना माहितीही दिली जात नाही आहे. काही प्रकरणात कुटुंबीयांना अंत्यसंस्कारामध्ये सहभागी होता येत नाही आहे, असे निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने नोंदवले आहे.एका वृत्ताचा आधार घेऊन सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की, एका सरकारी रुग्णालयात लॉबी आणि वेटींग एरियामध्ये मृतदेह पडलेले होते. तर वॉर्डमधील बहुतांश बेड रिकामे होते. तिथे अॉक्सिजन सलाईन ड्रिपची व्यवस्था नव्हती. असे बेड मोठ्या प्रमाणात रिकामे दिसत आहेत. तर दुसरीकडे रुग्ण भटकत फिरत आहेत.दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी केंद्र सरकारलाही नोटीस बजावली आहे. तसेच दिल्लीसोबत महाराष्ट्र, तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल या राज्यांनाही नोटीस बजावण्यात आली आहे. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली सरकारकडून करण्यात येत असलेल्या कोरोनाच्या कमी चाचण्यांबाबतही नाराजी व्यक्त केली आहे. दिल्लीत मुंबई आणि चेन्नईच्या तुलनेत रुग्ण वाढले आहेत. मात्र चाचण्यांचे प्रमाण दर दिवशी सात हजार ते पाच हजार एवढे कमी का करण्यात आले, असा सवालही न्यायालयाने उपस्थित केला. 

इतर महत्त्वाच्या बातम्या

त्या प्रस्तावाबाबत रशियाने घेतली भारताला प्रतिकूल भूमिका, चीनला दिले झुकते माप

जबरदस्त! LOCवर कुरापती काढणाऱ्या पाकिस्तानला भारतीय लष्कराचा दणका, १० चौक्या केल्या उद्ध्वस्त

अमेरिकेने चीनमध्ये पसरवले एलियन व्हायरस, होताहेत गंभीर परिणाम, चीनचा आरोप

ती संधी साधली आणि चीन अमेरिकेला आव्हान देणारी महासत्ता बनली

गाईच्या शरीरात सापडला कोरोनाला संपवण्याचा उपाय, या कंपनीने केले संशोधन

coronavirus: चौफेर टीकेनंतर चीनने श्वेतपत्रिका काढली, कोरोना कधी, कसा, कुठे पसरला सगळी माहिती दिली 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSupreme Courtसर्वोच्च न्यायालयdelhiदिल्लीCentral Governmentकेंद्र सरकार