शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus: कोरोनाच्या रुग्णांसोबत जनावरांपेक्षा वाईट व्यवहार, सुप्रीम कोर्टाने या राज्याला लगावली फटकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2020 16:47 IST

एकीकडे आरोग्य कर्मचारी रुण्यांवर उपचारांसाठी प्रयत्न करत असले तरी काही ठिकाणी कोरोनाबाधित रुग्ण आणि कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या मृतदेहांची हेळसांड होत असल्याच्या बातम्या येत आहेत.

ठळक मुद्देसर्वोच्च न्यायालयाने दिल्ली सरकारला फटकार लगावताना दिल्लीतील रुग्णालयांची अवस्था चिंताजनक असल्याचे सांगितले. कोरोना बाधितांच्या मृतदेहांची हेळसांड होत आहे, तर काही ठिकाणी मृतदेह कचऱ्यामध्ये सापडत आहेत. लोकांना जनावरांपेक्षा वाईट वागणूक दिली जात आहेसर्वोच्च न्यायालयाने दिल्ली सरकारकडून करण्यात येत असलेल्या कोरोनाच्या कमी चाचण्यांबाबतही नाराजी व्यक्त केली आहे.

नवी दिल्ली - कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे देशातील बहुतांश भागात आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण येत आहे. एकीकडे आरोग्य कर्मचारी रुण्यांवर उपचारांसाठी प्रयत्न करत असले तरी काही ठिकाणी कोरोनाबाधित रुग्ण आणि कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या मृतदेहांची हेळसांड होत असल्याच्या बातम्या येत आहेत. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने स्वतः या प्रकाराची दखल घेतली आहे. तसेच कोरोना बाधितांच्या मृतदेहांची हेळसांड होत आहे, तर काही ठिकाणी मृतदेह कचऱ्यामध्ये सापडत आहेत. लोकांना जनावरांपेक्षा वाईट वागणूक दिली जात आहे, असे मत नोंदवत सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी न्यायमूर्ती अशोक भूषण, न्यायमूर्ती संजय किशन कौल आणि न्यायमूर्ती एम. आर. शाह यांच्या खंडपीठाकडे सोपवली आहे.दरम्यान, या सुनावणीदरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली सरकारला फटकार लगावताना दिल्लीतील रुग्णालयांची अवस्था चिंताजनक असल्याचे सांगितले. एमएचएच्या सूचनांचे पालन होताना दिसत नाही आहे. तसेच रुग्णालयांमध्ये मृतदेहांचीही योग्य व्यवस्था होत नाही आहे. काही प्रकरणात तर रुग्णांच्या नातेवाईकांना माहितीही दिली जात नाही आहे. काही प्रकरणात कुटुंबीयांना अंत्यसंस्कारामध्ये सहभागी होता येत नाही आहे, असे निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने नोंदवले आहे.एका वृत्ताचा आधार घेऊन सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की, एका सरकारी रुग्णालयात लॉबी आणि वेटींग एरियामध्ये मृतदेह पडलेले होते. तर वॉर्डमधील बहुतांश बेड रिकामे होते. तिथे अॉक्सिजन सलाईन ड्रिपची व्यवस्था नव्हती. असे बेड मोठ्या प्रमाणात रिकामे दिसत आहेत. तर दुसरीकडे रुग्ण भटकत फिरत आहेत.दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी केंद्र सरकारलाही नोटीस बजावली आहे. तसेच दिल्लीसोबत महाराष्ट्र, तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल या राज्यांनाही नोटीस बजावण्यात आली आहे. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली सरकारकडून करण्यात येत असलेल्या कोरोनाच्या कमी चाचण्यांबाबतही नाराजी व्यक्त केली आहे. दिल्लीत मुंबई आणि चेन्नईच्या तुलनेत रुग्ण वाढले आहेत. मात्र चाचण्यांचे प्रमाण दर दिवशी सात हजार ते पाच हजार एवढे कमी का करण्यात आले, असा सवालही न्यायालयाने उपस्थित केला. 

इतर महत्त्वाच्या बातम्या

त्या प्रस्तावाबाबत रशियाने घेतली भारताला प्रतिकूल भूमिका, चीनला दिले झुकते माप

जबरदस्त! LOCवर कुरापती काढणाऱ्या पाकिस्तानला भारतीय लष्कराचा दणका, १० चौक्या केल्या उद्ध्वस्त

अमेरिकेने चीनमध्ये पसरवले एलियन व्हायरस, होताहेत गंभीर परिणाम, चीनचा आरोप

ती संधी साधली आणि चीन अमेरिकेला आव्हान देणारी महासत्ता बनली

गाईच्या शरीरात सापडला कोरोनाला संपवण्याचा उपाय, या कंपनीने केले संशोधन

coronavirus: चौफेर टीकेनंतर चीनने श्वेतपत्रिका काढली, कोरोना कधी, कसा, कुठे पसरला सगळी माहिती दिली 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSupreme Courtसर्वोच्च न्यायालयdelhiदिल्लीCentral Governmentकेंद्र सरकार