शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

Coronavirus : ...अन् आईने आजारी मुलासाठी केला 6 राज्यांतून तब्बल 2700 किलोमीटरचा प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2020 09:34 IST

Coronavirus : कोरोनामुळे देशभरात अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व गोष्टी बंद आहे. मात्र याच दरम्यान एक घटना समोर आली आहे.

तिरुवनंतपूरम - कोरोनाच्या जगव्यापी साथीने प्रगत देशांना हतबल केले आहे. सर्वतोपरी प्रयत्न करूनही आव्हाने वाढत आहेत. एक-दुसऱ्यापासून दूर राहणे, घराबाहेर न पडणे, घरातच राहणे, हा एकमेव मार्ग आहे. यात जराही निष्काळजीपणा केल्यास भारताला जबर किंमत मोजावी लागेल. त्याचा अंदाज बांधणेही कठीण आहे, असं कळकळीने सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात 3 मेपर्यंत संपूर्ण ‘लॉकडाऊन’ लागू करण्यात येत असल्याची घोषणा केली. मोदींनी लोकांना जेथे आहात तेथेच राहण्याचे आवाहन केले आहे. कोरोनामुळे देशभरात अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व गोष्टी बंद आहे. मात्र याच दरम्यान एक घटना समोर आली आहे. आपल्या आजारी मुलासाठी एका आईने तब्बल 2700 किलोमीटरचा प्रवास केला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, आजारी मुलाला भेटण्यासाठी एका आईने 6 राज्यांतून तीन दिवस 2700 किलोमीटरचा प्रवास केल्याची घटना समोर आली आहे. या महिलेने सून आणि नातेवाईकासोबत कारने हा प्रवास पूर्ण केला आहे. अरुण कुमार असं या महिलेच्या मुलाचं नाव आहे. अरुण बीएसएफमध्ये असून सध्या राजस्थानमध्ये कार्यरत आहेत. काही दिवसांपासून अरुण आजारी असल्याने जोधपूरमधील एम्सच्या डॉक्टरांनी फोन करून याबाबत त्याच्या कुटुंबीयांना माहिती दिली. मुलाच्या आजारपणाची माहिती मिळताच त्याची आई शिल्लमा वासन अस्वस्थ झाल्या. 

मुलाची काळजी त्यांना सतावत होती. त्यामुळेच त्यांनी मुलाला भेटण्याचा निर्णय घेतला. सून आणि नातेवाईकाला सोबत घेऊन त्यांनी कारने प्रवास करायचं ठरवलं. केरळमधून त्यांनी आपला प्रवास सुरू केला. तामिळनाडू, कर्नाटक, महाराष्ट्र आणि गुजरात असा प्रवास करत त्या राजस्थानमध्ये पोहोचल्या आणि मुलाला भेटल्या. सध्या अरुण यांच्या मुलाच्या प्रकृतीत सुधारणा होत असून कोणत्याही अडचणीशिवाय राजस्थानमध्ये आलो, याबद्दल त्यांनी देवाचे आभार मानले आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

काही दिवसांपूर्वी आईच्या अंत्यसंस्कारासाठी एका जवानाला तब्बल तीन दिवस 1100 किलोमीटरचा प्रवास करावा लागल्याची घटना समोर आली होती. संतोष यादव असं जवानाचं नाव असून त्यांना आपल्या आईच्या अंत्यसंस्कारासाठी तब्बल तीन दिवस 1100 किलोमीटरचा प्रवास करावा लागला. संतोष छत्तीसगड सशस्त्र दलात कार्यरत आहेत. कोरोनामुळे देशात लॉकडाऊन असतानाच त्यांच्या आईचे उत्तर प्रदेशमध्ये निधन झाले. मात्र लॉकडाऊनमध्ये रेल्वेसेवा बंद असल्याने जवानाला तीन दिवसांचा प्रवास करावा लागला. आईच्या अंत्यसंस्कारासाठी उत्तर प्रदेशातील सिखड या गावी पोहोचण्यासाठी 1100 किलोमीटर अंतर पार करण्यासाठी त्यांना तीन दिवस लागले होते.

महत्त्वाच्या बातम्या

Coronavirus : कोरोनाचा भारतीय नौदलात शिरकाव, 20 नौसैनिकांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह

Coronavirus : चिंताजनक! जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या 22 लाखांवर, तब्बल 154,247 जणांचा मृत्यू

कोरोनाचे रहस्य : ‘तो’ दावा आयसीएमआरने नाकारला

‘कोरोना’ विरोधातील लढ्यासाठी कायदाही सक्षम हवा; विधी तज्ज्ञांचे मत

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याKeralaकेरळIndiaभारतhospitalहॉस्पिटलdoctorडॉक्टरRajasthanराजस्थान