शहरं
Join us  
Trending Stories
1
Ganesh Kale Shot Dead: गणेशची हत्या करून फरार झालेले चार आरोपी सापडले; दोघांना अटक, नावे आली समोर
2
"वर्गात एक विद्यार्थी असेल तरी मराठीची तुकडी चालली पाहिजे", विश्वास पाटील यांची स्पष्ट भूमिका
3
Ganesh Kale: मानेत, छातीत व पोटात घुसल्या गोळ्या, पळण्याआधीच चौघांनी गणेशला संपवले; आरोपींची नावे काय?
4
Satara: फलटणमध्ये आणखी एका तरुणीने संपवले आयुष्य, आंचलच्या मृत्युसाठी आईवडिलच ठरले कारण
5
निर्भिड आणि बेधडक पत्रकारितेची आज गरज; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे मत
6
Pune Crime: नाशिकच्या तरुणीवर हिंजवडीत कोयत्याने हल्ला! प्रेमप्रकरणातून तरुणाने केला जीव घेण्याचा प्रयत्न
7
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
8
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
9
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
10
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
11
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
12
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
13
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
14
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
15
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
16
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
17
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
18
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
19
‘आपण काय मेसेज करत आहात? हे व्हॉट्सअ‍ॅपला ठाऊक...’, इलॉन मस्‍क यांचा गंभीर आरोप, केली मोठी घोषणा
20
"दिल्लीचे नामांतर 'इंद्रप्रस्थ' करा"; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भाजप खासदाराचे पत्र, पांडवांचा उल्लेख

coronavirus: लॉकडाऊनवरून WHOच्या प्रमुख संशोधकांचा इशारा; म्हणाल्या, याचे परिणाम... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2021 10:09 IST

coronavirus & lockdown News Update : कोरोनाच्या वाढत्या फैलावाच्या पार्श्वभूमीवर काही ठिकाणी कठोर लॉकडाऊनबाबत विचार सुरू आहे. मात्र यादरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेमधील मुख्य शास्त्रज्ञ डॉ. सौम्या स्वामिनाथन यांनी लॉकडाऊनबाबत मोठे विधान केले आहे.

नवी दिल्ली - कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेमुळे सध्या भारतात बिकट परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यामुळे काही राज्यांमध्ये वीकेंड लॉकडाऊनसह रात्रीच्या संचारबंदीसारख्या निर्बंधांची अंमलबजावणी सुरूझाली आहे. तर काही ठिकाणी कठोर लॉकडाऊनबाबत विचार सुरू आहे. (Coronavirus in Maharashtra) मात्र यादरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेमधील (World health organisation ) मुख्य शास्त्रज्ञ डॉ. सौम्या स्वामिनाथन यांनी लॉकडाऊनबाबत मोठे विधान केले आहे. लॉकडाऊनचे परिणाम गंभीर होतील, असे त्यांनी म्हटले आहे. तसेच कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला नियंत्रित करण्यासाठी जनतेची भूमिका महत्त्वाची असेल असेही त्यांनी सांगितले. (WHO's researcher Dr. Soumya Swaminathan warns of lockdown;  That said, the consequences will be serious)

इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार डॉ. स्वामिनाथन यांनी सांगितले की, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत विचार करण्यापूर्वी आणि पुरेशा लोकांचे लसीकरण पूर्ण होईपर्यंत आपल्याला कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करावा लागणार आहे. या साथीच्या अनेक लाटा येऊ शकतात, असे खात्रीशीररीत्या सांगता येईल, असेही त्या म्हणाल्या. डब्ल्यूएचओने कोविशिल्ड लसीच्या दोन डोसांमध्ये ८ ते १२ आठवड्यांचे अंतर ठेवण्याचा सल्ला दिला आहे. यावर स्वामिनाथन यांनी सांगितले की, सध्या मुलांना कोरोनावरील लस देण्याचा सल्ला देण्यात आलेला नाही. मात्र लसीच्या दोन डोसमधील अंतर हे ८ ते १२ आठवड्यांपर्यंत वाढवता येऊ शकेल. 

दरम्यान, डब्ल्यूएचओच्या विभागीय संचालक डॉ. पूनम खेत्रीपाल यांनीही लसीकरणावर भर देण्याचा सल्ला दिला आहे. कोरोनाच्या संसर्गाची नवी लाट संपूर्ण प्रदेशात पसरली आहे. त्यामुळे लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी प्रयत्न करावे लागतील, असे त्या म्हणाल्या. उल्लेखनीय बाब म्हणजे भारतामध्ये दररोज सरासरी २६ लाख लसी दिल्या जात आहेत. लसीकरणाबाबत केवळ अमेरिका भारताच्या पुढे आहे. अमेरिकेत सरासरी ३० लाख डोस दिले जात आहेत. 

 दरम्यान, पुण्यातील तज्ज्ञानी लॉकडाऊनवर आक्षेप घेतला आहे. प्रा. एल. एस. शशिधरा यांनी सांगितले की, गतवर्षी लॉकडाऊन दरम्यान, पुण्यामध्ये अनेक हॉटस्पॉट होते. लॉकडाऊन हटवण्यात आल्यावर हे आकडे पुन्हा वाढू लागले. तेव्हा १० दिवसांचे लॉकडाऊनही निरुपयोगी ठरले होते. लॉकडाऊन दरम्यानही समूह संसर्गामुळे विषाणू लहान लहान समुहांमध्ये पसरतो. तसेच लॉकडाऊन हटवण्यात आल्यावर तो अधिक वेगाने पसरतो, असे त्या म्हणाल्या.   

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसWorld health organisationजागतिक आरोग्य संघटनाHealthआरोग्य