शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
3
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
4
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
5
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
6
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
7
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
8
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
9
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
10
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
11
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
12
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
13
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
14
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
15
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
16
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
17
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
18
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
19
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
20
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द

coronavirus: लॉकडाऊनवरून WHOच्या प्रमुख संशोधकांचा इशारा; म्हणाल्या, याचे परिणाम... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2021 10:09 IST

coronavirus & lockdown News Update : कोरोनाच्या वाढत्या फैलावाच्या पार्श्वभूमीवर काही ठिकाणी कठोर लॉकडाऊनबाबत विचार सुरू आहे. मात्र यादरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेमधील मुख्य शास्त्रज्ञ डॉ. सौम्या स्वामिनाथन यांनी लॉकडाऊनबाबत मोठे विधान केले आहे.

नवी दिल्ली - कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेमुळे सध्या भारतात बिकट परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यामुळे काही राज्यांमध्ये वीकेंड लॉकडाऊनसह रात्रीच्या संचारबंदीसारख्या निर्बंधांची अंमलबजावणी सुरूझाली आहे. तर काही ठिकाणी कठोर लॉकडाऊनबाबत विचार सुरू आहे. (Coronavirus in Maharashtra) मात्र यादरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेमधील (World health organisation ) मुख्य शास्त्रज्ञ डॉ. सौम्या स्वामिनाथन यांनी लॉकडाऊनबाबत मोठे विधान केले आहे. लॉकडाऊनचे परिणाम गंभीर होतील, असे त्यांनी म्हटले आहे. तसेच कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला नियंत्रित करण्यासाठी जनतेची भूमिका महत्त्वाची असेल असेही त्यांनी सांगितले. (WHO's researcher Dr. Soumya Swaminathan warns of lockdown;  That said, the consequences will be serious)

इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार डॉ. स्वामिनाथन यांनी सांगितले की, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत विचार करण्यापूर्वी आणि पुरेशा लोकांचे लसीकरण पूर्ण होईपर्यंत आपल्याला कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करावा लागणार आहे. या साथीच्या अनेक लाटा येऊ शकतात, असे खात्रीशीररीत्या सांगता येईल, असेही त्या म्हणाल्या. डब्ल्यूएचओने कोविशिल्ड लसीच्या दोन डोसांमध्ये ८ ते १२ आठवड्यांचे अंतर ठेवण्याचा सल्ला दिला आहे. यावर स्वामिनाथन यांनी सांगितले की, सध्या मुलांना कोरोनावरील लस देण्याचा सल्ला देण्यात आलेला नाही. मात्र लसीच्या दोन डोसमधील अंतर हे ८ ते १२ आठवड्यांपर्यंत वाढवता येऊ शकेल. 

दरम्यान, डब्ल्यूएचओच्या विभागीय संचालक डॉ. पूनम खेत्रीपाल यांनीही लसीकरणावर भर देण्याचा सल्ला दिला आहे. कोरोनाच्या संसर्गाची नवी लाट संपूर्ण प्रदेशात पसरली आहे. त्यामुळे लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी प्रयत्न करावे लागतील, असे त्या म्हणाल्या. उल्लेखनीय बाब म्हणजे भारतामध्ये दररोज सरासरी २६ लाख लसी दिल्या जात आहेत. लसीकरणाबाबत केवळ अमेरिका भारताच्या पुढे आहे. अमेरिकेत सरासरी ३० लाख डोस दिले जात आहेत. 

 दरम्यान, पुण्यातील तज्ज्ञानी लॉकडाऊनवर आक्षेप घेतला आहे. प्रा. एल. एस. शशिधरा यांनी सांगितले की, गतवर्षी लॉकडाऊन दरम्यान, पुण्यामध्ये अनेक हॉटस्पॉट होते. लॉकडाऊन हटवण्यात आल्यावर हे आकडे पुन्हा वाढू लागले. तेव्हा १० दिवसांचे लॉकडाऊनही निरुपयोगी ठरले होते. लॉकडाऊन दरम्यानही समूह संसर्गामुळे विषाणू लहान लहान समुहांमध्ये पसरतो. तसेच लॉकडाऊन हटवण्यात आल्यावर तो अधिक वेगाने पसरतो, असे त्या म्हणाल्या.   

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसWorld health organisationजागतिक आरोग्य संघटनाHealthआरोग्य