शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
6
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
7
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
8
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
9
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
10
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
11
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
12
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
13
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
14
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
15
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
16
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
17
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
18
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
19
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती

Coronavirus: 14 एप्रिलनंतर काय-काय सुरु होणार? कॅबिनेट बैठकीत मोदींनी दिले संकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2020 09:26 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नवी दिल्लीतील निवासस्थानी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या तातडीच्या बैठकीत हे निर्णय घेण्यात आले. स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षणमंत्री राजनाथ सिंग व गृहमंत्री

नवी दिल्ली - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने पंतप्रधानांसह सर्व मंत्री व खासदारांच्या वेतनामध्ये पुढील एक वर्षासाठी ३० टक्के कपात करण्याचा अभूतपूर्व निर्णय सोमवारी घेतला. याच बरोबर राष्ष्ट्रपती, उप-राष्ट्रपती व सर्व राज्यांच्या राज्यपालांनी वर्षभर स्वेच्छेने ३० टक्के वेतन कमी घेण्याचे ठरविले आहे. याखेरीज खासदारांचा ‘खासदार निधी’ही दोन वर्षांसाठी तात्पुरता स्थगित ठेवण्यात आला आहे. तसेच, १४ एप्रिलनंतर देशातील लॉकडाऊन समाप्त होईल की नाही? यासंदर्भातही पंतप्रधान मोदींनी काही संकेत दिले आहेत. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नवी दिल्लीतील निवासस्थानी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या तातडीच्या बैठकीत हे निर्णय घेण्यात आले. स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षणमंत्री राजनाथ सिंग व गृहमंत्री अमित शहा या बैठकीस प्रत्यक्ष हजर होते. अन्य मंत्री त्यांच्या घरून किंवा कार्यालयांतून ‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’ने बैठकीत सहभागी झाले. या बैठकीत मोदींनी मंत्र्यांना काही महत्वाचे मुद्दे आणि परिस्थिती आोटक्यात आणण्यासाठी करायची उपययोजना सांगतिली. त्यावेळी, प्रत्येकाच्या मनातील प्रश्नावरही मोदींनी काही संकेत देत उत्तर दिलंय. कोरोना व्हायरसच्या लढाईत उत्पादन आणि निर्यातीमध्ये वाढ करण्यात यावी. तसेच ग्रामीण भागात आरोग्य सेतू अॅप अधिकतम प्रसिद्ध करण्याचे सांगितले आहे.

देशातील २१ दिवसांचे लॉकडाऊन संपणार की वाढणार याबाबत याच आठवड्यात निर्णय घ्यावा लागणार आहे. मात्र, ज्या भागात कोरोनाचा प्रादुर्भाव नाही, त्या भागातील सरकारी कार्यालय खुले करण्यासंदर्भात सरकार निर्णय घेऊ शकते. लॉकडाऊनननंतर टप्प्याटप्याने सरकारी कार्यालय खुली करण्याचे संकेत मोदींनी या बैठकीत दिले आहेत. ज्या जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण अधिक नाहीत, त्याच भागात हे करण्यात येईल, असे समजते. यांसदर्भात सर्वच मंत्र्यांना एक प्लान तयार करण्याचेही मोदींनी सूचवले आहे. 

शेतकऱ्यांसोबत राहा

लॉकडाऊन काळात देशातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे, पंतप्रधान मोदींनी सर्वच कॅबिनेट मंत्र्यांना शेतकऱ्यांच्या मदतीसाठी एक सल्ला दिलाय. अॅप आधारित कॅब / टॅक्सीप्रमाणेच ट्रक एग्रीगेटर्स यांसारख्या नवसंकल्पनांवर काम करण्याचे आवाहन मोदींनी मंत्र्यांना केले आहे. दरम्यान, लॉकडाऊन काळातच शेतकऱ्यांचं पीक काढणीला आलं होतं, अनेकांचा माल शेतात पडून होता. मात्र, लॉकडाऊनमुळे या शेतकऱ्यांच्या मालाला भावच मिळाला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालंय. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीcorona virusकोरोना वायरस बातम्याAmit Shahअमित शहाFarmerशेतकरी