शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदींच्या मणिपूर दौऱ्यापूर्वी मोठे यश; राज्य आणि केंद्राने कुकी समूहाशी केला शांतता करार
2
"विकास हा संतुलितपणे हवा"; व्हायरल व्हिडीओनंतर सर्वोच्च न्यायालयाने टोचले कान, केंद्राला नोटीस
3
खराब सर्व्हिस, समस्या...! बजाज चेतक पाचव्या नंबरवर फेकली गेली! ऑगस्टमध्ये स्कूटर खपविताना आले नाकीनऊ...
4
१८ तास असेल राम मंदिर बंद, ‘या’ दिवशी अयोध्येत अजिबात जाऊ नका; रामलला विश्रांती घेणार?
5
US Open 2025: अमेरिकन ओपन स्पर्धेत भारतीयाचा जलवा! जेतेपदाच्या अगदी जवळ पोहचलाय; आता फक्त...
6
पीएम किसानचा २१ वा हप्ता अडकणार? 'ही' चूक तात्काळ दुरुस्त करा, अन्यथा २००० रुपये मिळणार नाहीत!
7
हुंड्याने घेतला आणखी एक बळी! २८ वर्षांच्या पूजाश्रीने संपवलं जीवन, पतीला अटक, काय-काय घडलं?
8
पतीचा पगार वाढला तर पत्नीची पोटगीची रक्कमही वाढणार?; दिल्ली हायकोर्टाचा महत्त्वाचा निकाल
9
'आठ दिवसात गुन्हा दाखल करा, अजित पवारांनी राजीनामा द्यावा'; महिला आयपीएस अधिकाऱ्याला तंबी प्रकरणी या नेत्याने उपमुख्यमंत्र्यांना फटकारले
10
पाकिस्तानात अंतर्गत धुसफूस! असीम मुनीरचा 'भाव' वाढल्याने संरक्षण मंत्री देणार राजीनामा?
11
जय श्रीराम! राम दर्शनासाठी आता लाइन लावावी लागणार नाही, पासही नको; अयोध्येत नवीन व्यवस्था
12
झाले उलटेच...! मर्सिडीज, बीएमडब्ल्यू, जेएलआर आणि ऑडी कार स्वस्त होणार; धनाढ्यांनाही GST पावला
13
Video: 'बिग बॉस १९' विशेष टास्कमध्ये प्रणित मोरेची तुफान कॉमेडी, सदस्य हसून हसून लोटपोट
14
Jio Recharge Plan: दररोज २GB डेटासह हवीये दीर्घ वैधता; 'हे' रिचार्ज प्लान्स आहेत बेस्ट
15
दिल्ली-मुंबईसह अनेक शहरांत उद्या बँका बंद राहणार का, पाहा काय म्हटलंय RBI नं?
16
'युक्रेनमधील शांततेसाठी भारतावर कर लावणे आवश्यक', ट्रम्प प्रशासनाचा न्यायालयात युक्तिवाद
17
मुंबई, उपनगरामध्ये मध्ये ईद ए मिलादच्या सुट्टीत बदल, राज्य सरकारने काढले आदेश
18
“छगन भुजबळांच्या मनातील शंका आम्ही दूर करू, ओबीसींवर अन्याय होणार नाही”: CM फडणवीस
19
Income Tax रिटर्न फाईल करण्याची अंतिम मुदत १५ सप्टेंबर; तारीख चुकवल्यास काय होईल? जाणून घ्या
20
Video: बंगाल विधानसभेत जोरदार राडा; BJP-TMC आमदारांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी, कारण...

Coronavirus: 14 एप्रिलनंतर काय-काय सुरु होणार? कॅबिनेट बैठकीत मोदींनी दिले संकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2020 09:26 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नवी दिल्लीतील निवासस्थानी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या तातडीच्या बैठकीत हे निर्णय घेण्यात आले. स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षणमंत्री राजनाथ सिंग व गृहमंत्री

नवी दिल्ली - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने पंतप्रधानांसह सर्व मंत्री व खासदारांच्या वेतनामध्ये पुढील एक वर्षासाठी ३० टक्के कपात करण्याचा अभूतपूर्व निर्णय सोमवारी घेतला. याच बरोबर राष्ष्ट्रपती, उप-राष्ट्रपती व सर्व राज्यांच्या राज्यपालांनी वर्षभर स्वेच्छेने ३० टक्के वेतन कमी घेण्याचे ठरविले आहे. याखेरीज खासदारांचा ‘खासदार निधी’ही दोन वर्षांसाठी तात्पुरता स्थगित ठेवण्यात आला आहे. तसेच, १४ एप्रिलनंतर देशातील लॉकडाऊन समाप्त होईल की नाही? यासंदर्भातही पंतप्रधान मोदींनी काही संकेत दिले आहेत. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नवी दिल्लीतील निवासस्थानी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या तातडीच्या बैठकीत हे निर्णय घेण्यात आले. स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षणमंत्री राजनाथ सिंग व गृहमंत्री अमित शहा या बैठकीस प्रत्यक्ष हजर होते. अन्य मंत्री त्यांच्या घरून किंवा कार्यालयांतून ‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’ने बैठकीत सहभागी झाले. या बैठकीत मोदींनी मंत्र्यांना काही महत्वाचे मुद्दे आणि परिस्थिती आोटक्यात आणण्यासाठी करायची उपययोजना सांगतिली. त्यावेळी, प्रत्येकाच्या मनातील प्रश्नावरही मोदींनी काही संकेत देत उत्तर दिलंय. कोरोना व्हायरसच्या लढाईत उत्पादन आणि निर्यातीमध्ये वाढ करण्यात यावी. तसेच ग्रामीण भागात आरोग्य सेतू अॅप अधिकतम प्रसिद्ध करण्याचे सांगितले आहे.

देशातील २१ दिवसांचे लॉकडाऊन संपणार की वाढणार याबाबत याच आठवड्यात निर्णय घ्यावा लागणार आहे. मात्र, ज्या भागात कोरोनाचा प्रादुर्भाव नाही, त्या भागातील सरकारी कार्यालय खुले करण्यासंदर्भात सरकार निर्णय घेऊ शकते. लॉकडाऊनननंतर टप्प्याटप्याने सरकारी कार्यालय खुली करण्याचे संकेत मोदींनी या बैठकीत दिले आहेत. ज्या जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण अधिक नाहीत, त्याच भागात हे करण्यात येईल, असे समजते. यांसदर्भात सर्वच मंत्र्यांना एक प्लान तयार करण्याचेही मोदींनी सूचवले आहे. 

शेतकऱ्यांसोबत राहा

लॉकडाऊन काळात देशातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे, पंतप्रधान मोदींनी सर्वच कॅबिनेट मंत्र्यांना शेतकऱ्यांच्या मदतीसाठी एक सल्ला दिलाय. अॅप आधारित कॅब / टॅक्सीप्रमाणेच ट्रक एग्रीगेटर्स यांसारख्या नवसंकल्पनांवर काम करण्याचे आवाहन मोदींनी मंत्र्यांना केले आहे. दरम्यान, लॉकडाऊन काळातच शेतकऱ्यांचं पीक काढणीला आलं होतं, अनेकांचा माल शेतात पडून होता. मात्र, लॉकडाऊनमुळे या शेतकऱ्यांच्या मालाला भावच मिळाला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालंय. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीcorona virusकोरोना वायरस बातम्याAmit Shahअमित शहाFarmerशेतकरी