शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
3
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
4
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
5
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
6
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
7
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
8
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
9
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
10
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
11
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
12
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
13
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
14
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
15
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
16
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
17
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
18
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
19
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
20
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?

coronavirus: लॉकडाऊनमध्ये काय चुकलं? राहुल गांधींशी चर्चेदरम्यान राजीव बजाज यांनी नेमकं कारण सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Published: June 04, 2020 3:09 PM

उद्योगपती राहुल बजाज यांनी भारतात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या पद्धतीवर टीका केली आहे. तसेच या लॉकडाऊनमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेचे मोठे नुकसान झाल्याचा दावा केला आहे. 

नवी दिल्ली - कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी देशात लाग करण्यात आलेले व्यापक लॉकडाऊन हटवण्याची प्रक्रिया आता सुरू झाली आहे. अनलॉक-1 असे नाव देऊन देशातील लॉकडाऊनचे निर्बंध आता हळूहळू शिथिल करण्यात येत आहेत. दरम्यान, उद्योगपती राहुल बजाज यांनी भारतात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनवर टीका केली आहे. तसेच या लॉकडाऊनमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेचे मोठे नुकसान झाल्याचा दावा त्यांनी केला आहे.  काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याशी संवाद साधताना राजीव बजाज यांनी आपलं मत मांडलं.

या संवादावेळी बजाज अॉटोचे एमडी राजीव बजाज म्हणाले की, "भारतात ड्रेकोनियन म्हणजेच निर्दयी पद्धतीने लागू करण्यात आले. लॉकडाऊनमध्ये एवढी सक्ती करण्याची गरज नव्हती. लॉकडाऊनमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे." 

राजीव बजाज यांनी पुढे सांगितले की, जपान, अमेरिका, युरोप, सिंगापूरसारख्या देशात आमचे मित्र आहेत. त्याशिवाय जगातील अनेक देशातील मंडळींशी आमची चर्चा होते. मात्र भारतात कठोर पद्धतीने लॉकडाऊन लागू करण्यात आले. अशा पद्धतीने कुठेही लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्यात आली नाही. जगातील अनेक देशांमध्ये लोकांना बाहेर पडण्याची परवानगी होती. मात्र आपल्याकडे वेगळंच चित्र होतं. 

लॉकडाऊनच्याबाबतीत नेमकं काय चुकलं हे सांगताना राजीव बजाज म्हणाले की, कोरोनाचा सामना करण्यासाठी भारताने पूर्वेकडील देशांऐवजी पश्चिमेकडे पाहिले. आम्ही इटली, फ्रान्स, ब्रिटन, अमेरिका आदींचे अनुकरण केले. खरंतर आपण पूर्वेकडील देशांचे अनुकरण केले पाहिजे होते. या देशात कोरोनाला रोखण्याच्याबाबतीत चांगले काम झाले. तापमान, भौगोलिक वैशिष्ट्य, मेडिकल सह तमाम वैशिष्ट्यांमुळे हे देश आपल्यासाठी अनुकरणीय ठरले असते. 

सर्वसामान्यांच्या दृष्टीने लॉकडाऊन कठीण आहे. कारण भारतासारखे कठीण लॉकडाऊन कुठेच लागू करण्यात आलेले नाही. त्यामुळे आता प्रत्येक जण मध्यम मार्ग काढण्यासाठी इच्छुक आहे. भारताने पश्चिमेकडील देशांपेक्षा कठीण लॉकडाऊन लागू केले.  कमकुवत लॉकडाऊनमुळे विषाणू पसरतो आणि कठोर लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्था बिघडते, असेही ते पुढे म्हणाले. सध्या जगभरात सरकारकडून सर्वसामान्यांना थेट मदत दिली जात आहे. मात्र भारतात केवळ सहकार्याची भाषा केली गेली. सरकारकडून सर्वसामान्यांना पैसे दिले गेले नाहीत. 

दरम्यान, या चर्चेदरम्यान राहुल गांधी यांनी लॉकडाऊन अपयशी ठरल्याचे सांगितले. माझ्या दृष्टीने भारतातील लॉकडाऊन अपयशी ठरले आहे. आता केंद्र सरकार माघार घेत राज्यांना परिस्थिती सांभाळण्यास सांगत आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतEconomyअर्थव्यवस्थाRahul Gandhiराहुल गांधी