शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

CoronaVirus Updates: देशात नव्या २८ हजार ३२६ कोरोनाबाधितांची नोंद; राज्यातील सद्यस्थिती काय?, जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2021 11:05 IST

कोरोना महामारीच्या सुरुवातीपासून आतापर्यंत एकूण तीन कोटी ३६ लाख ५२ हजार रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे.

नवी दिल्ली: गेल्या २४ तासांत देशात २८,३२६ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर २६० जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच गेल्या २४ तासांत २६,०३२ जणांनी कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत एकूण ३,२९,०२,३५१ जण कोरोनामुक्त झाले आहेत.

कोरोना महामारीच्या सुरुवातीपासून आतापर्यंत एकूण तीन कोटी ३६ लाख ५२ हजार रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी ४ लाख ४६ हजार ९१८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, आतापर्यंत ३ कोटी २९ लाख २ हजार रुग्ण आतापर्यंत कोरोनामुक्त झाले आहेत. तर देशात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या तीन लाखांच्या जवळपास आहे. एकूण ३ लाख ३ हजार रुग्ण अद्यापही कोरोनावर उपचार घेत आहेत. 

राज्यात शनिवारी ३,७२३ रुग्ण बरे होऊन घरी परतले असून, आतापर्यंत एकूण ६३,६०,७३५ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.२४ टक्के एवढे झाले आहे. राज्यात ३७,९८४ रुग्ण उपचाराधीन आहेत.

राज्यात ३,२७६ रुग्णांचे निदान झाले असून, ५८ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२ टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५,७९,९२,०१० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ११.२८ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात २,५९,१२० व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत, तर १,४८३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ६५,४१,११९ झाली असून, मृतांचा आकडा १ लाख ३८ हजार ८३४ झाली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस