शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

CoronaVirusupdate : हरिद्वारमध्ये कोरोनाचं तांडव, दर सव्वा मिनिटाला एक संक्रमित!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2021 18:03 IST

येथे कोरोना परिस्थिती भयावह असतानाही, वैष्णव वैरागी अखाडा अखेरच्या कुंभ स्नानासाठी शाही थाटात आणि अंदाजात हर की पैडीला जाण्याच्या तयारीत आहे.

हरिद्वार - कुंभनगरी हरिद्वार येथे कोरोना व्हायरसने कुंभ महापर्वाला ग्रहण लावले आहे. मात्र, अद्यापही चैत्र पौर्णिमेच्या स्नानासाठी येथेच असलेल्या संतांच्या आखाड्यात कोरोना संक्रमण हाताबाहेर जाताना दिसत आहे. गेल्या 24 तासांत हरिद्वार आणि ऋषिकेशसह संपूर्ण जिल्ह्यात कोरोनाचे 1175 कोरोनाबाधित समोर आले आहेत. (CoronaVirus update Uttarakhand kumbh haridwar many positive case)

निरंजनी अखाड्याच्या महामंडलेश्वरांचे दिल्लीत निधन झाल्याशिवाय, हरिद्वारमध्ये चार लोकांचा मृत्यू झाला आहे. शहरात आरोग्य विभागाची व्यवस्था कमी पडत आहे. यामुळे शहरात अराजकाची स्थिती आहे. कोणत्या रुग्णालयात जाऊन उपचार घ्यावा, हेही लोकांना कळेनासे झाले आहे. 

Corona Vaccine : कोरोना लस घेतल्यानंतर महिलेच्या अंगावर आले रक्ताचे फोड, पाय कापावा लागण्याची सतावतेय भीती

हरिद्वारमध्ये कोरोना हाताबाहेर -येथे कोरोना परिस्थिती भयावह असतानाही, वैष्णव वैरागी अखाडा अखेरच्या कुंभ स्नानासाठी शाही थाटात आणि अंदाजात हर की पैडीला जाण्याच्या तयारीत आहे. अधिकांश शैव अखाड्यांनी आपापल्या पातळ्यांवर कुंभ संपल्याची घोषणाही केली आहे. तसेच शैव साधूंच्या दाहाही आखाड्यांसोबत दोन उदासीन अखाडे आणि शीख साधूंच्या निर्मल अखाड्यांनी तीन शाही स्नान केले आहे. मात्र, 14 एप्रिलला मेष संक्रांतीनिमित्त झालेल्या कुंभमेळ्याच्या तिसऱ्या शाही स्नान होताना कोरोनाचा, असा स्फोट झाला आहे, की परिस्थिती अद्यापही हातात आलेली नाही. येथो कोरना रुग्णांची संख्या सातत्याने वाढताना दिसत आहे.

दर सव्वा मिनिटाला एक कोरोना रुग्ण -आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बीएचआयएलमध्ये  48, शिवालिक नगरात 13, कनखलमध्ये 10, नवोदय स्कूलमध्ये 8, आयआयटी रुडकीमध्ये चार, जूना व निरंजनी अखाड्यात 11 संक्रमित आढळून आले आहेत. तर संपूर्ण जिल्ह्याभरात 24 तासांत 1175 संक्रमित आढळून आले आहेत. याचा विचार करता दर सव्वा मिनिटाला एक करोना रुग्ण आढळत आहे. सातत्याने येथील परिस्थिती बिघडताना दिसत आहे. तसेच यामुळे आरोग्य यंत्रणेवरही प्रचंड ताण येत आहे. 

CoronaVirus : शरीरातील ऑक्सीजन स्तर कमी होऊ लागला, तर करा 'हा' उपाय; आरोग्य मंत्रालयानं दिलीय माहिती

उत्तराखंडमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होताना दिसत आहे. गेल्या 24 तासांत राज्यात 4 हजारहून अधिक नवे कोरोनाबाधित समोर आले आहेत. तर, 49 लोकांनी आपला जीवही गमावला आहे. याचे गांभीर्य लक्षात घेत आता राज्य सरकारच्या वतीने येथे कडक नियमावली जारी केली आहे. मात्र, तरीही कोरोना रुग्णसंख्येत कमी येताना दिसत नाही.

टॅग्स :Kumbh Melaकुंभ मेळाcorona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारत