शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
3
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
8
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
9
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
10
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
11
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
12
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
13
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
14
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
15
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
16
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
17
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
18
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
19
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
20
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?

CoronaVirus Update: धक्कादायक! २४ तासांत एक लाखांहून अधिक नवे कोरोना रुग्ण; ४७८ जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2021 11:46 IST

coronavirus update: देशातील कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली असून, कोरोना रुग्ण संख्येने पुन्हा एकदा नवीन उच्चांक गाठला आहे.

ठळक मुद्देदेशात पुन्हा एकदा कोरोना रुग्ण वाढीचा उच्चांकगेल्या २४ तासांत एक लाखांहून अधिकांना कोरोनाची लागणकोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यात कडक निर्बंध

नवी दिल्ली : देशातील कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली असून, कोरोना रुग्ण संख्येने पुन्हा एकदा नवीन उच्चांक गाठला आहे. गेल्या २४ तासांत देशात १ लाखांहून अधिक कोरोनाचे नवीन रुग्ण आढळून आले असून, रविवारचा उच्चांक मोडीत निघाला असल्याचे सोमवारी जाहीर झालेल्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. (coronavirus update in india)

केंद्रीय मंत्रालयाने सोमवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, संपूर्ण देशात  १ लाख ३ हजार ५५८ नवीन रुग्ण आढळून आले असून, ४७८ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. गेल्या २४ तासांत ५२ हजार ८४७ जणांनी कोरोनावर मात केली असून, आतापर्यंत १ कोटी १६ लाख ८२ हजार १३६ जण कोरोनामुक्त झाले आहेत. 

उपचाराधीन रुग्णांमध्ये वाढ

देशात कोरोना उपचाराधीन रुग्णांची एकूण संख्या ७ लाख ४१ हजार ८३० इतकी आहे. आतापर्यंत देशात १ कोटी २५ लाख ८९ हजार ०६७ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. कोरोनामुळे आतापर्यंत १ लाख ६५ हजार १०१ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर ७ कोटी ९१ लाख ०५ हजार १६३ जणांना कोरोनाची लस देण्यात आली आहे. 

CoronaVirus Update: देशभरातील 'या' १० राज्यांत ९१ टक्के कोरोनाबाधित; सर्वाधिक मृत्यूदर

महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्णसंख्या

देशातील कोरोना रुग्णसंख्येमध्ये सर्वाधिक संख्या महाराष्ट्रातील आहे. राज्यात रविवारी दिवसभरात ५७ हजार नवे करोनाबाधित आढळून आले असून, २२२ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्याचा मृत्यू दर १.८६ टक्के असून, आतापर्यंत ५५ हजार ८७८ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात सध्या ४,३०,५०३ रुग्ण उपचार घेत आहेत.

‘ही’ मागणी आपण ताबडतोब मान्य करावी; आव्हाडांची उद्धव ठाकरेंना विनंती

दरम्यान, कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जीवनावश्यक वस्तू वगळता सर्व प्रकारची दुकाने, बाजारपेठा, उपाहारगृहे, खासगी कार्यालये, मॉल्स ३० एप्रिलपर्यंत पूर्ण बंद ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. शनिवार आणि रविवारी संचारबंदी, रात्री ८ ते सकाळी ७ पर्यंत संचारबंदी, दिवसा जमावबंदी, असे विविध निर्बंध लागू करीत राज्य सरकारने राज्यात अंशत: लॉकडाउनच लागू केला. मात्र, रेल्वे व रस्ते वाहतुकीवर कोणतेही निर्बंध नसून, वृत्तपत्र वितरणासही मुभा देण्यात आली आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस