शहरं
Join us  
Trending Stories
1
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
2
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
3
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
4
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
5
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
6
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
7
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
9
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
10
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
11
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
12
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
13
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
14
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
15
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
16
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
17
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
18
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
19
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...

coronavirus: कोरोनाची अजून दोन लक्षणे आली समोर, अर्ध्याहून अधिक रुग्णांमध्ये पाहिली गेली ही लक्षणे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2021 08:57 IST

coronavirus in India : यापूर्वी खोकला येणे, ताप येणे, घसा खवखवणे, चव आणि वास कळेनासे होणे, श्वास घेण्यास त्रास होणे अशी लक्षणे कोरोना रुग्णांमध्ये दिसून येत होती मात्र आता या लक्षणांमध्ये अजून काही लक्षणांची भर पडली आहे.

ठळक मुद्देष्ट्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण संस्थेने दिलेल्या माहितीनुसार कोरोनाच्या अर्ध्याहून अधिक रुग्णांमध्ये काही अशी लक्षणे दिसून आली आहेत यामधील प्रमुख लक्षण हे तोंड कोरडे पडणे हे आहे. याला जेरोस्टोमिया असेही म्हटले जातेसंसर्गाच्या सुरुवातीच्या काळात हे लक्षण दिसून येऊ शकते

नवी दिल्ली - कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेने सध्या देशभरात धुमाकूळ घातला आहे. (coronavirus in India)चिंतेची बाब म्हणजे दुसऱ्या लाटेमध्ये कोरोनाचा संसर्ग वेगाने होत असून, बाधित रुग्णांमध्ये नवनवी लक्षणेही दिसून येत आहेत. यापूर्वी खोकला येणे, ताप येणे, घसा खवखवणे, चव आणि वास कळेनासे होणे, श्वास घेण्यास त्रास होणे अशी लक्षणे कोरोना रुग्णांमध्ये दिसून येत होती मात्र आता या लक्षणांमध्ये अजून काही लक्षणांची भर पडली आहे. ( Two more symptoms of coronavirus have been reported in more than half of the patients)

राष्ट्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण संस्थेने दिलेल्या माहितीनुसार कोरोनाच्या अर्ध्याहून अधिक रुग्णांमध्ये काही अशी लक्षणे दिसून आली आहेत जी याआधी दिसून आली नव्हती. यामधील प्रमुख लक्षण हे तोंड कोरडे पडणे हे आहे. याला जेरोस्टोमिया असेही म्हटले जाते. संसर्गाच्या सुरुवातीच्या काळात हे लक्षण दिसून येऊ शकते. त्यानंतर पुढच्या काही दिवसांमध्ये रुग्णाला ताप आणि घसा दुखण्यासारखी लक्षणे दिसू लागतात. 

एका रिपोर्टनुसार कोरोनाच्या संसर्गाच्या नव्या लक्षणांमध्ये जीभ कोरडी पडणे हे लक्षणसुद्धा दिसून येत आहे. हे सुद्धा लाळ न बनण्याचे कारण असू शकते. यादरम्यान जीभ पांढरी पडू शकते किंवा त्यावर पांढरे डाग दिसू शकतात. ज्या रुग्णांमध्ये अशी लक्षणे दिसून येतात त्यांना जेवताना त्रास होतो. लाळ नसल्याने जेवण व्यवस्थित चावता येत नाही. तसेच बोलण्यामध्येसुद्धा अडचणी येतात. 

 डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार शरीरामध्ये लाळ निर्माण करण्याची क्षमता कमी होणे हे तोंड सुकण्याचे मुख्य कारण असते. लाळेमुळे आपले तोंड धोकादायक जिवाणू आणि अन्य हानिकारक घटकांपासून वाचते. तसेच पचन क्रियेलाही मदत मिळते. तज्ज्ञांच्या मते जर सुरुवातीच्या काळात लक्षणांवर लक्ष ठेवले तर तपास आणि रुग्णावर उपचार करण्यामध्ये खूप मदत मिळू शकते. त्यामुळे संसर्ग पसरण्यापासून रोखता येऊ शकेल. दरम्यान, देशातील कोरोनाच्या संसर्गाचा वेग कमी होण्याचे नाव घेत नाही आहे. देशात पुन्हा एकदा दोन लाखांहून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. दिवसभरात देशात २ लाख ३३ हजार ९४३ रुग्ण सापडले आहेत. तसेच गेल्या १४ तासांत तब्बल १ हजार ३३८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतHealthआरोग्य