शहरं
Join us  
Trending Stories
1
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
2
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
3
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
4
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
5
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
6
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
7
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
8
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
9
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
10
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
11
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
12
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
13
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
14
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
15
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
16
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
17
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
18
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
19
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
20
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus: कोरोनाची अजून दोन लक्षणे आली समोर, अर्ध्याहून अधिक रुग्णांमध्ये पाहिली गेली ही लक्षणे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2021 08:57 IST

coronavirus in India : यापूर्वी खोकला येणे, ताप येणे, घसा खवखवणे, चव आणि वास कळेनासे होणे, श्वास घेण्यास त्रास होणे अशी लक्षणे कोरोना रुग्णांमध्ये दिसून येत होती मात्र आता या लक्षणांमध्ये अजून काही लक्षणांची भर पडली आहे.

ठळक मुद्देष्ट्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण संस्थेने दिलेल्या माहितीनुसार कोरोनाच्या अर्ध्याहून अधिक रुग्णांमध्ये काही अशी लक्षणे दिसून आली आहेत यामधील प्रमुख लक्षण हे तोंड कोरडे पडणे हे आहे. याला जेरोस्टोमिया असेही म्हटले जातेसंसर्गाच्या सुरुवातीच्या काळात हे लक्षण दिसून येऊ शकते

नवी दिल्ली - कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेने सध्या देशभरात धुमाकूळ घातला आहे. (coronavirus in India)चिंतेची बाब म्हणजे दुसऱ्या लाटेमध्ये कोरोनाचा संसर्ग वेगाने होत असून, बाधित रुग्णांमध्ये नवनवी लक्षणेही दिसून येत आहेत. यापूर्वी खोकला येणे, ताप येणे, घसा खवखवणे, चव आणि वास कळेनासे होणे, श्वास घेण्यास त्रास होणे अशी लक्षणे कोरोना रुग्णांमध्ये दिसून येत होती मात्र आता या लक्षणांमध्ये अजून काही लक्षणांची भर पडली आहे. ( Two more symptoms of coronavirus have been reported in more than half of the patients)

राष्ट्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण संस्थेने दिलेल्या माहितीनुसार कोरोनाच्या अर्ध्याहून अधिक रुग्णांमध्ये काही अशी लक्षणे दिसून आली आहेत जी याआधी दिसून आली नव्हती. यामधील प्रमुख लक्षण हे तोंड कोरडे पडणे हे आहे. याला जेरोस्टोमिया असेही म्हटले जाते. संसर्गाच्या सुरुवातीच्या काळात हे लक्षण दिसून येऊ शकते. त्यानंतर पुढच्या काही दिवसांमध्ये रुग्णाला ताप आणि घसा दुखण्यासारखी लक्षणे दिसू लागतात. 

एका रिपोर्टनुसार कोरोनाच्या संसर्गाच्या नव्या लक्षणांमध्ये जीभ कोरडी पडणे हे लक्षणसुद्धा दिसून येत आहे. हे सुद्धा लाळ न बनण्याचे कारण असू शकते. यादरम्यान जीभ पांढरी पडू शकते किंवा त्यावर पांढरे डाग दिसू शकतात. ज्या रुग्णांमध्ये अशी लक्षणे दिसून येतात त्यांना जेवताना त्रास होतो. लाळ नसल्याने जेवण व्यवस्थित चावता येत नाही. तसेच बोलण्यामध्येसुद्धा अडचणी येतात. 

 डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार शरीरामध्ये लाळ निर्माण करण्याची क्षमता कमी होणे हे तोंड सुकण्याचे मुख्य कारण असते. लाळेमुळे आपले तोंड धोकादायक जिवाणू आणि अन्य हानिकारक घटकांपासून वाचते. तसेच पचन क्रियेलाही मदत मिळते. तज्ज्ञांच्या मते जर सुरुवातीच्या काळात लक्षणांवर लक्ष ठेवले तर तपास आणि रुग्णावर उपचार करण्यामध्ये खूप मदत मिळू शकते. त्यामुळे संसर्ग पसरण्यापासून रोखता येऊ शकेल. दरम्यान, देशातील कोरोनाच्या संसर्गाचा वेग कमी होण्याचे नाव घेत नाही आहे. देशात पुन्हा एकदा दोन लाखांहून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. दिवसभरात देशात २ लाख ३३ हजार ९४३ रुग्ण सापडले आहेत. तसेच गेल्या १४ तासांत तब्बल १ हजार ३३८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतHealthआरोग्य