शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक... दिवसाला चार ते पाच मुली मुंबई शहरातून होत आहेत बेपत्ता
2
आजचे राशीभविष्य, १३ डिसेंबर २०२५: 'या' राशीसाठी आज आर्थिक फायद्याचा दिवस; यश, किर्ती वाढेल
3
धक्कादायक वास्तव : राज्यात ७ जिल्ह्यांमध्ये ३ वर्षांत बालकांच्या मृत्यूचे वाढते प्रमाण
4
आव्हाड-पडळकरांच्या कार्यकर्त्यांना दोन दिवस कारावासाची शिक्षा, पावसाळी अधिवेशनातील राडा; गंभीर दखल
5
चार वर्षांत शेतीभोवती दिसणार पक्क्या पाणंद रस्त्यांचे जाळे; मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ता योजना मंजूर
6
छत्रपती शिवरायांचा इतिहास केवळ ६८ शब्दांत का? विधानपरिषदेत सदस्यांचा सवाल : कन्टेंट हटवा
7
इंडिगो घोळाचा फटका मुंबई, नागपूरलाही; इतर कंपन्यांची विमानेही उडताहेत उशिराने
8
मुनगंटीवारांकडून झिरवळांचा ‘क्लीनअप’! पाकिस्तानी सौंदर्यप्रसाधनाच्या मुद्यावरून चिमटे : सभागृहातला ‘नरहरी’ तरी वाचवेल, अशी आशा
9
निष्कलंक, सुसंस्कृत नेतृत्व हरपले; माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील-चाकूरकर यांचे निधन
10
चांदीसाठी किलोला ‘जीएसटी’सह मोजा दोन लाख रुपये ! दोन हजारांच्या वाढीसह पोहोचली १,९४,००० रुपयांवर
11
इंडिगोला दणका; ४ फ्लाइट ऑपरेशन इन्स्पेक्टर निलंबित, सीईओ पीटर एल्बर्स यांची सलग दुसऱ्या दिवशी डीजीसीएने चौकशी केली
12
भाजप आमदारांनी आरोप केलेले तुकाराम मुंढे यांना ‘क्लीन चिट’,ईओडब्ल्यू व पोलिसांच्या चौकशीत काहीच आढळले नाही
13
विमा क्षेत्रात १०० टक्के ‘एफडीआय’ला मंजुरी; आतापर्यंत एफडीआयमार्फत ८२,००० कोटींची परकीय गुंतवणूक
14
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
15
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
16
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
17
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
18
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
19
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
20
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus: बेरोजगारीचा कहर, लाखांमध्ये पगार घेणाऱ्यांवर मनरेगा मजूर म्हणून काम करण्याची वेळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2020 09:48 IST

कोरोनाचा संसर्ग आणि लॉकडाऊनचा फटका गोरगरीब मजूर आणि कामगारांसोबतच अनेक उच्चशिक्षित आणि मोठ्या पदांवर कार्यरत असलेल्या व्यक्तींनाही बसत आहे. त्यामुळे काही दिवसांपूर्वी चांगला पगार घेणारे शिक्षण आणि आयटी प्रोफेशनल्स व्यक्तींवरही उदरनिर्वाह मनरेगाच्या कामावर जाण्याची वेळ आल्याचे समोर आले आहे.

ठळक मुद्देकाही दिवसांपूर्वी चांगला पगार घेणारे शिक्षण आणि आयटी प्रोफेशनल्स व्यक्तींवरही उदरनिर्वाह मनरेगाच्या कामावर जाण्याची वेळ आल्याचे समोर आले आहेतेलंगणामधील एका उच्चशिक्षित पती-पत्नीला लॉकडाऊनमुळे दैनंदिन खर्च भागवण्यासाठी मनरेगा रोजगार हमी योजनेच्या कामावर कामगार म्हणून जावे लागत आहेकोरोना आणि लॉकडाऊनमुळे देशातील सुमारे दोन लाख शिक्षकांना गेल्या दोन तीन महिन्यांपासून पगार मिळालेला नाही

हैदराबाद - कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग आणि लॉकडाऊनमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेचे प्रचंड नुकसान होत आहे. उद्योगधंदे, आर्थिक व्यवहार ठप्प झाल्याने वेतन आणि रोजगाराचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. याचा फटका गोरगरीब मजूर आणि कामगारांसोबतच अनेक उच्चशिक्षित आणि मोठ्या पदांवर कार्यरत असलेल्या व्यक्तींनाही बसत आहे. त्यामुळे काही दिवसांपूर्वी चांगला पगार घेणारे शिक्षण आणि आयटी प्रोफेशनल्स व्यक्तींवरही उदरनिर्वाह मनरेगाच्या कामावर जाण्याची वेळ आल्याचे समोर आले आहे.

तेलंगणामधील एका उच्चशिक्षित पती-पत्नीला लॉकडाऊनमुळे दैनंदिन खर्च भागवण्यासाठी मनरेगा रोजगार हमी योजनेच्या कामावर कामगार म्हणून जावे लागत आहे. चिरंजिवी आणि पद्मा असे या पती-पत्नीचे नाव असून, हे दोघेही काही दिवसांपूर्वीपर्यंत शिक्षक म्हणून काम करत होते. चिरंजिवी याने पोस्ट ग्रॅज्युएशनसोबत बीएडची पदवी घेतली आहे. तर पद्मा यांनी एमबीए केले आहे. मात्र या शिक्षक पती-पत्नीला गेल्या दोन महिन्यांपासून वेतन मिळालेले नाही. त्यामुळे घरखर्च भागवण्यासाठी त्यांना मनरेगामध्ये मजुरी करावी लागत आहे.

 आपल्यावर आलेल्या या परिस्थितीबाबत चिरंजिवी सांगतात की, ‘’मनरेगाच्या योजनेतून मिळणाऱ्या रोजंदारीतून आम्ही किमान कुटुंबासाठी भाजीपाला तरी खरेदी करू शकतो. आमच्या घरात दोन मुले आणि आई-वडिलांसह एकूण सहा माणसं आहेत. पगाराविना आमचा उदरनिर्वाह कसा चालेल.’’ कोरोना आणि लॉकडाऊनमुळे देशातील सुमारे दोन लाख शिक्षकांना गेल्या दोन तीन महिन्यांपासून पगार मिळालेला नाही.

केवळ शिक्षकच नव्हे तर आयटी कंपन्यांमध्ये लाखोंनी पगार घेणाऱ्यांचीही स्थिती काहीशी अशीच आहे. स्वप्ना ही तरुणी अशा आयटी प्रोफेशनल्सचे प्रातिनिधिक उदाहरण म्हणता येईल. ती काही दिवसांपूर्वी दरमहा एक लाख रुपये पगार घेत होती. मात्र आज तिला खर्च भागवण्यासाठी मजुरी करावी लागत आहे. ती सांगते, मी माझ्याकडे असलेल्या बचतीमधून माझा खर्च भागवू शकले असते. मात्र असा साठवलेला पैसा किती दिवस पुरला असता. आज संपूर्ण जगाचे भवितव्य अनिश्चित आहे, अशा परिस्थितीत मला माझ्याकडील बचत आपातकालीन परिस्थितीतीसाठी जपून ठेवायची आहे. त्यामुळेच माझ्या सासरची मंडळी जेव्हा कामाला जातात. तेव्हा मीसुद्धा त्यांच्यासोबत जाते. सॉफ्टवेअर इंजिनियर असल्याने मी असे काम करू नये असे कुणी सांगितलंय, जिवंत राहण्यासाठी काहीही करण्यास तयार राहिले पाहिजे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याEconomyअर्थव्यवस्थाIndiaभारतTeacherशिक्षकUnemploymentबेरोजगारी