शहरं
Join us  
Trending Stories
1
Sandhya Shantaram Death: नृत्याच्या 'बिजली'च्या पैंजणांचा आवाज थांबला..! ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचं निधन
2
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
3
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
4
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
5
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
6
“आम्ही युती-आघाडीचे बळी ठरलो, आता स्थानिकांच्या भावना लक्षात घेणार”; उद्धव ठाकरे थेट बोलले
7
"गौतमी पाटील तू महाराष्ट्राचा बिहार केलास, तुझी कार..."; मराठी अभिनेत्याने व्यक्त केला संताप
8
वनडेतही नवे पर्व! रोहित शर्माचं मोठं स्वप्न भंगलं; गिलच्या कॅप्टन्सीत किंग कोहलीसमोरही असेल चॅलेंज
9
"अरे बिट्टू, मी तुझ्यासाठी काय केलं नाही, तरीही तू..."  मुलीचा ब्रेकअपनंतरचा व्हिडीओ व्हायरल!
10
'जननायक' पदवीची चोरी होतेय , बिहारी वाले सावधान! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधी आणि 'राजद'वर निशाणा साधला
11
Uddhav Thackeray : बाळासाहेबांच्या पार्थिवावरुन रामदास कदम यांनी केलेल्या आरोपावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
12
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला १ रुपयांचा शिक्का करेल कमाल, नशीब उजळेल, व्हाल मालामाल 
13
धक्कादायक घटना ; 'कफ सिरप' घेतल्याने आठ बालकांचा मृत्यू ! जीव जाण्याला काय ठरले कारणीभूत ?
14
हृदयद्रावक! बॉयफ्रेंडसोबत पळून गेली बायको; ढसाढसा रडत नवऱ्याने ४ मुलांसह नदीत मारली उडी
15
IND vs AUS: ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; रोहित शर्माला ठेंगा! शुबमन गिल वनडेचा नवा कॅप्टन
16
"हात पाय सलामत ठेवायचे असतील तर…", आमदार संतोष बांगर यांची अधिकाऱ्यांना धमकी, कॉल रेकॉर्डिंग व्हायरल
17
IND vs WI: मोहम्मद सिराज, रवींद्र जडेजाची कमाल; सामन्याच्या तिसऱ्याच दिवशी वेस्ट इंडीजचा खेळ खल्लास!
18
निर्दयी बाप! गावातील तरुणासोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय; पोटच्या मुलीला दिली भयंकर शिक्षा
19
आसिम मुनीरची आणखी एक चाल, गाझा प्लॅनवर घेतली पलटी; पाकिस्तानची अमेरिकेला मोठी 'ऑफर'
20
वाहनधारकांसाठी आनंदाची बातमी! FASTag नसला तरी दंडापासून सवलत, UPI द्वारे भरावा लागणार फक्त एवढा दंड

coronavirus: बेरोजगारीचा कहर, लाखांमध्ये पगार घेणाऱ्यांवर मनरेगा मजूर म्हणून काम करण्याची वेळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2020 09:48 IST

कोरोनाचा संसर्ग आणि लॉकडाऊनचा फटका गोरगरीब मजूर आणि कामगारांसोबतच अनेक उच्चशिक्षित आणि मोठ्या पदांवर कार्यरत असलेल्या व्यक्तींनाही बसत आहे. त्यामुळे काही दिवसांपूर्वी चांगला पगार घेणारे शिक्षण आणि आयटी प्रोफेशनल्स व्यक्तींवरही उदरनिर्वाह मनरेगाच्या कामावर जाण्याची वेळ आल्याचे समोर आले आहे.

ठळक मुद्देकाही दिवसांपूर्वी चांगला पगार घेणारे शिक्षण आणि आयटी प्रोफेशनल्स व्यक्तींवरही उदरनिर्वाह मनरेगाच्या कामावर जाण्याची वेळ आल्याचे समोर आले आहेतेलंगणामधील एका उच्चशिक्षित पती-पत्नीला लॉकडाऊनमुळे दैनंदिन खर्च भागवण्यासाठी मनरेगा रोजगार हमी योजनेच्या कामावर कामगार म्हणून जावे लागत आहेकोरोना आणि लॉकडाऊनमुळे देशातील सुमारे दोन लाख शिक्षकांना गेल्या दोन तीन महिन्यांपासून पगार मिळालेला नाही

हैदराबाद - कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग आणि लॉकडाऊनमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेचे प्रचंड नुकसान होत आहे. उद्योगधंदे, आर्थिक व्यवहार ठप्प झाल्याने वेतन आणि रोजगाराचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. याचा फटका गोरगरीब मजूर आणि कामगारांसोबतच अनेक उच्चशिक्षित आणि मोठ्या पदांवर कार्यरत असलेल्या व्यक्तींनाही बसत आहे. त्यामुळे काही दिवसांपूर्वी चांगला पगार घेणारे शिक्षण आणि आयटी प्रोफेशनल्स व्यक्तींवरही उदरनिर्वाह मनरेगाच्या कामावर जाण्याची वेळ आल्याचे समोर आले आहे.

तेलंगणामधील एका उच्चशिक्षित पती-पत्नीला लॉकडाऊनमुळे दैनंदिन खर्च भागवण्यासाठी मनरेगा रोजगार हमी योजनेच्या कामावर कामगार म्हणून जावे लागत आहे. चिरंजिवी आणि पद्मा असे या पती-पत्नीचे नाव असून, हे दोघेही काही दिवसांपूर्वीपर्यंत शिक्षक म्हणून काम करत होते. चिरंजिवी याने पोस्ट ग्रॅज्युएशनसोबत बीएडची पदवी घेतली आहे. तर पद्मा यांनी एमबीए केले आहे. मात्र या शिक्षक पती-पत्नीला गेल्या दोन महिन्यांपासून वेतन मिळालेले नाही. त्यामुळे घरखर्च भागवण्यासाठी त्यांना मनरेगामध्ये मजुरी करावी लागत आहे.

 आपल्यावर आलेल्या या परिस्थितीबाबत चिरंजिवी सांगतात की, ‘’मनरेगाच्या योजनेतून मिळणाऱ्या रोजंदारीतून आम्ही किमान कुटुंबासाठी भाजीपाला तरी खरेदी करू शकतो. आमच्या घरात दोन मुले आणि आई-वडिलांसह एकूण सहा माणसं आहेत. पगाराविना आमचा उदरनिर्वाह कसा चालेल.’’ कोरोना आणि लॉकडाऊनमुळे देशातील सुमारे दोन लाख शिक्षकांना गेल्या दोन तीन महिन्यांपासून पगार मिळालेला नाही.

केवळ शिक्षकच नव्हे तर आयटी कंपन्यांमध्ये लाखोंनी पगार घेणाऱ्यांचीही स्थिती काहीशी अशीच आहे. स्वप्ना ही तरुणी अशा आयटी प्रोफेशनल्सचे प्रातिनिधिक उदाहरण म्हणता येईल. ती काही दिवसांपूर्वी दरमहा एक लाख रुपये पगार घेत होती. मात्र आज तिला खर्च भागवण्यासाठी मजुरी करावी लागत आहे. ती सांगते, मी माझ्याकडे असलेल्या बचतीमधून माझा खर्च भागवू शकले असते. मात्र असा साठवलेला पैसा किती दिवस पुरला असता. आज संपूर्ण जगाचे भवितव्य अनिश्चित आहे, अशा परिस्थितीत मला माझ्याकडील बचत आपातकालीन परिस्थितीतीसाठी जपून ठेवायची आहे. त्यामुळेच माझ्या सासरची मंडळी जेव्हा कामाला जातात. तेव्हा मीसुद्धा त्यांच्यासोबत जाते. सॉफ्टवेअर इंजिनियर असल्याने मी असे काम करू नये असे कुणी सांगितलंय, जिवंत राहण्यासाठी काहीही करण्यास तयार राहिले पाहिजे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याEconomyअर्थव्यवस्थाIndiaभारतTeacherशिक्षकUnemploymentबेरोजगारी