शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
2
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
3
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
4
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
5
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
6
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
7
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
8
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
9
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
10
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
11
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
12
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
13
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
14
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
15
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
16
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
17
निमिषा प्रियासाठी सरकार जनतेकडून ८ कोटी मागत आहे? परराष्ट्र मंत्रालयाने सत्य सांगितले
18
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
19
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार
20
ऑनलाइन बेटिंग आता दंडनीय गुन्हा, केंद्रीय मंत्रिमंडळाचा गेमिंग विधेयकाला हिरवा कंदील

coronavirus: बेरोजगारीचा कहर, लाखांमध्ये पगार घेणाऱ्यांवर मनरेगा मजूर म्हणून काम करण्याची वेळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2020 09:48 IST

कोरोनाचा संसर्ग आणि लॉकडाऊनचा फटका गोरगरीब मजूर आणि कामगारांसोबतच अनेक उच्चशिक्षित आणि मोठ्या पदांवर कार्यरत असलेल्या व्यक्तींनाही बसत आहे. त्यामुळे काही दिवसांपूर्वी चांगला पगार घेणारे शिक्षण आणि आयटी प्रोफेशनल्स व्यक्तींवरही उदरनिर्वाह मनरेगाच्या कामावर जाण्याची वेळ आल्याचे समोर आले आहे.

ठळक मुद्देकाही दिवसांपूर्वी चांगला पगार घेणारे शिक्षण आणि आयटी प्रोफेशनल्स व्यक्तींवरही उदरनिर्वाह मनरेगाच्या कामावर जाण्याची वेळ आल्याचे समोर आले आहेतेलंगणामधील एका उच्चशिक्षित पती-पत्नीला लॉकडाऊनमुळे दैनंदिन खर्च भागवण्यासाठी मनरेगा रोजगार हमी योजनेच्या कामावर कामगार म्हणून जावे लागत आहेकोरोना आणि लॉकडाऊनमुळे देशातील सुमारे दोन लाख शिक्षकांना गेल्या दोन तीन महिन्यांपासून पगार मिळालेला नाही

हैदराबाद - कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग आणि लॉकडाऊनमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेचे प्रचंड नुकसान होत आहे. उद्योगधंदे, आर्थिक व्यवहार ठप्प झाल्याने वेतन आणि रोजगाराचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. याचा फटका गोरगरीब मजूर आणि कामगारांसोबतच अनेक उच्चशिक्षित आणि मोठ्या पदांवर कार्यरत असलेल्या व्यक्तींनाही बसत आहे. त्यामुळे काही दिवसांपूर्वी चांगला पगार घेणारे शिक्षण आणि आयटी प्रोफेशनल्स व्यक्तींवरही उदरनिर्वाह मनरेगाच्या कामावर जाण्याची वेळ आल्याचे समोर आले आहे.

तेलंगणामधील एका उच्चशिक्षित पती-पत्नीला लॉकडाऊनमुळे दैनंदिन खर्च भागवण्यासाठी मनरेगा रोजगार हमी योजनेच्या कामावर कामगार म्हणून जावे लागत आहे. चिरंजिवी आणि पद्मा असे या पती-पत्नीचे नाव असून, हे दोघेही काही दिवसांपूर्वीपर्यंत शिक्षक म्हणून काम करत होते. चिरंजिवी याने पोस्ट ग्रॅज्युएशनसोबत बीएडची पदवी घेतली आहे. तर पद्मा यांनी एमबीए केले आहे. मात्र या शिक्षक पती-पत्नीला गेल्या दोन महिन्यांपासून वेतन मिळालेले नाही. त्यामुळे घरखर्च भागवण्यासाठी त्यांना मनरेगामध्ये मजुरी करावी लागत आहे.

 आपल्यावर आलेल्या या परिस्थितीबाबत चिरंजिवी सांगतात की, ‘’मनरेगाच्या योजनेतून मिळणाऱ्या रोजंदारीतून आम्ही किमान कुटुंबासाठी भाजीपाला तरी खरेदी करू शकतो. आमच्या घरात दोन मुले आणि आई-वडिलांसह एकूण सहा माणसं आहेत. पगाराविना आमचा उदरनिर्वाह कसा चालेल.’’ कोरोना आणि लॉकडाऊनमुळे देशातील सुमारे दोन लाख शिक्षकांना गेल्या दोन तीन महिन्यांपासून पगार मिळालेला नाही.

केवळ शिक्षकच नव्हे तर आयटी कंपन्यांमध्ये लाखोंनी पगार घेणाऱ्यांचीही स्थिती काहीशी अशीच आहे. स्वप्ना ही तरुणी अशा आयटी प्रोफेशनल्सचे प्रातिनिधिक उदाहरण म्हणता येईल. ती काही दिवसांपूर्वी दरमहा एक लाख रुपये पगार घेत होती. मात्र आज तिला खर्च भागवण्यासाठी मजुरी करावी लागत आहे. ती सांगते, मी माझ्याकडे असलेल्या बचतीमधून माझा खर्च भागवू शकले असते. मात्र असा साठवलेला पैसा किती दिवस पुरला असता. आज संपूर्ण जगाचे भवितव्य अनिश्चित आहे, अशा परिस्थितीत मला माझ्याकडील बचत आपातकालीन परिस्थितीतीसाठी जपून ठेवायची आहे. त्यामुळेच माझ्या सासरची मंडळी जेव्हा कामाला जातात. तेव्हा मीसुद्धा त्यांच्यासोबत जाते. सॉफ्टवेअर इंजिनियर असल्याने मी असे काम करू नये असे कुणी सांगितलंय, जिवंत राहण्यासाठी काहीही करण्यास तयार राहिले पाहिजे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याEconomyअर्थव्यवस्थाIndiaभारतTeacherशिक्षकUnemploymentबेरोजगारी