शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
9
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
10
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
11
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
12
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
13
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
14
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
15
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
16
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
17
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
18
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
19
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
20
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर

Coronavirus : तिसऱ्या लाटेचा इशारा अतिशय गांभीर्याने घ्या; केंद्रानं व्यक्त केली नाराजी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2021 05:56 IST

Coronavirus Third Wave : नागरिकांकडून नियमांचे उल्लंघन, केंद्र सरकार नाराज. कोरोनाविरोधातील  लढ्यात आतापर्यंत जे काही यश मिळविले आहे, ते असे केल्याने वाया जातील, असे लव अग्रवाल यांचं वक्तव्य.

ठळक मुद्देनागरिकांकडून नियमांचे उल्लंघन, केंद्र सरकार नाराज.कोरोनाविरोधातील  लढ्यात आतापर्यंत जे काही यश मिळविले आहे, ते असे केल्याने वाया जातील, असे लव अग्रवाल यांचं वक्तव्य.

नवी दिल्ली : जगात कोरोनाची तिसरी लाट आलेली आहे. भारत सरकारनेही देशात तिसऱ्या लाटेचा धेाका असल्याचा इशारा सातत्याने दिला आहे. मात्र, लोकांकडून तो गांभीर्याने घेतला जात नसल्याचे दिसत आहे. हवामान खात्याच्या सूचनेप्रमाणे लोक या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करीत आहेत, अशा शब्दांमध्ये केंद्र सरकारने नाराजी व्यक्त केली आहे. 

आरोग्य मंत्रालयाच्या पत्रकार परिषदेत आरोग्य सहसचिव लव अग्रवाल यांनी नागरिकांना गाफील न राहण्याचा इशारा दिला. ते म्हणाले की, बाजारपेठा, पर्यटन स्थळे अशा ठिकाणी लोकांकडून कोरोना नियमावलीचे पालन होताना दिसत नाही. आम्ही तिसऱ्या लाटेचा इशारा देत आहोत. मात्र, लोक त्याकडे हवामान खात्याच्या एखाद्या अपडेटप्रमाणे पाहत आहेत. याचे गांभीर्य लोकांना नसल्याबद्दल अग्रवाल यांनी खंत व्यक्त केली. कोरोनाविरोधातील  लढ्यात आतापर्यंत जे काही यश मिळविले आहे, ते असे केल्याने वाया जातील, असे अग्रवाल यांनी म्हटले आहे. निती आयाेगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल म्हणाले की, जगात कोरोनाची तिसरी लाट आली आहे. मात्र, भारतात ती येऊ नये यासाठी लोकांना गंभीर्याने प्रयत्न करावे लागतील. 

चार राज्यांमध्ये ७३ टक्के नवे रुग्ण  जुलैमध्ये नव्या रुग्णांपैकी सुमारे ७३.४ टक्के रुग्ण केरळ, महाराष्ट्र, तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि ओडिशा या राज्यांमध्ये आढळल्याची माहिती केंद्राने दिली आहे. १३ जुलैला संपलेल्या आठवड्याअखेर भारतातील ५५ जिल्ह्यांमध्ये पॉझिटिव्हिटी दर १० टक्क्यांहून अधिक आहे. ईशान्येकडील राज्यांमधील परिस्थिती चिंताजनक आहे. आसाम, मिझोरम, अरुणाचल प्रदेश आणि मणिपूरसह १० राज्यांमध्ये केंद्रीय पथक मदतीसाठी पाठविण्यात आली होती.

धडकी भरविणारी छायाचित्रेदेशभरात बाजारपेठा तसेच थंड हवेच्या पर्यटन स्थळांवर लोकांनी प्रचंड गर्दी केली. पर्यटन स्थळांवर लोकांच्या प्रचंड गर्दीची धडकी भरविणारी छायाचित्रे व्हायरल झाली होती. ती पाहून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही चिंता व्यक्त केली होती.

‘डेल्टा व्हेरियन्ट’च्या रुग्णांमुळे धोका कायमकोरोनाच्या ‘डेल्टा व्हेरियन्ट’चे रुग्ण महाराष्ट्रातही आढळले आहेत. महाराष्ट्राप्रमाणेच हे रुग्ण इतर राज्यांतही आढळून येत आहेत. एकीकडे कोरोनाची रुग्णसंख्या कमी होत आहेत. मात्र, धोका टळलेला नाही. केरळमध्ये ‘झिका’ विषाणूचे रुग्णही वाढत आहेत. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतHealthआरोग्यMarketबाजारweatherहवामान