शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
3
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
4
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
5
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
6
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
7
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
8
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
9
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
10
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
11
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
12
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
13
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
14
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
15
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
16
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
17
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
18
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
19
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
20
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!

coronavirus: खायला शिळे अन्न, शौचालयात नाही पाणी, ट्रेनला १०-१० तास सिग्नल नाही, श्रमिक ट्रेनने प्रवास करणाऱ्यांचे हाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2020 13:28 IST

गावांकडे स्थलांतर करणाऱ्या मजुरांचे हाल कमी करण्यासाठी श्रमिक ट्रेन सुरू करण्यात आल्या आहेत. मात्र या श्रमिक ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या मजुरांना प्रचंड हालअपेष्टांचा सामना करावा लागत आहे.

ठळक मुद्देदेशाच्या विविध भागांतून सुटत असलेल्या श्रमिक ट्रेन प्रवासादरम्यान अनेक ठिकाणी तासनतास थांबवून ठेवण्यात येत आहेतप्रवासादरम्यान, खाण्यासाठी शिळे अन्न दिले जात असल्याचा तसेच डब्यातील शौचालयांमध्ये पाण्याचा अभाव श्रमिक एक्स्प्रेसमधून प्रवास करणाऱ्या मजुरांनी केला आरोप

लखनौ - संपूर्ण जगात हाहाकार माजवणाऱ्या कोरोनामुळे निर्माण झालेली दहशत आणि लॉकडाऊनमुळे निर्माण झालेल्या रोजगाराच्या अनिश्चिततेमुळे शहरात वास्तव्य करणारे लाखो मजूर गावच्या दिशेने स्थलांतर करत आहेत. मिळेल त्या वाहनाने नाहीतर पायी गावाच्या दिशेने निघालेल्या या मजुरांचे तांडे आणि त्यांच्या व्यथा ऐकून सर्वसामान्यांचे मन हेलावत आहे. या मजुरांचे हाल कमी करण्यासाठी श्रमिक ट्रेन सुरू करण्यात आल्या आहेत. मात्र या श्रमिक ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या मजुरांना प्रचंड हालअपेष्टांचा सामना करावा लागत आहे.

देशाच्या विविध भागांतून सुटत असलेल्या श्रमिक ट्रेन प्रवासादरम्यान अनेक ठिकाणी तासनतास थांबवून ठेवण्यात येत आहेत. तसेच प्रवासाच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत या ट्रेनमधील प्रवाशांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. प्रवासादरम्यान, खाण्यासाठी शिळे अन्न दिले जात असल्याचा तसेच डब्यातील शौचालयांमध्ये पाण्याचा अभाव असल्याचा आरोप या ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी केला आहे. यासंदर्भातील वृत्त एनडीटीव्हीच्या संकेतस्थळाने दिले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार विशाखापट्टणम येथून निघालेली एक ट्रेन दीनदयाल उपाध्याय स्टेशनच्या आउटर सिग्नलवर तब्बल १० तास थांबवून ठेवण्यात आली होती. येथे रात्री ११ वाजता आलेली ही ट्रेन १० तास थांबवून ठेवण्यात आली, असा आरोप या ट्रेनमधून प्रवास करत असलेला प्रवासी धीरेन राय याने केला.

 अशाच प्रकारे महाराष्ट्रातील पनवेल येथून जौनपूरसाठी निघालेली एक ट्रेन वाराणसी येथे १० तास उभी करून ठेवण्यात आली. त्यानंतर या ट्रेनमधील प्रवाशांनी आंदोलन सुरू केले. त्यानंतर पोलिसांनी प्रवाशांच्या भोजनाची व्यवस्था केली. तसेच ट्रेन पुढे रवाना करण्यात आली. या ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या गोविंद राजभर यांनी सांगितले की, महाराष्ट्रात आपल्याला एकदा भोजन देण्यात आले. मात्र नंतर उत्तर प्रदेशमध्ये काहीच मिळाले नाही. ट्रेन काशी येथे ७ तास थांबवण्यात आली. त्यानंतर काही अंतर कापल्यावर अजून दोन तास ट्रेन थांबवली गेली. त्यानंतर तिसऱ्यांना ट्रेन पुढे सरकली आणि पुन्हा थांबली.

इतर महत्त्वाच्या बातम्या

कोरोनाचा एकही रुग्ण न सापडलेल्या या राज्यात १५ जूनपासून सुरू होणार शाळा-कॉलेज  

लॉकडाऊन आणि मंदीचे सावट असतानाही ही कंपनी करणार ५० हजार कर्मचाऱ्यांची मेगाभरती  

रामजन्मभूमीचे सपाटीकरण करताना सापडले प्राचीन मंदिराचे अवशेष

कोलकाता विमानतळ पाण्याखाली, वादळी वाऱ्यांनी महाकाय विमानेही हादरली

तर गुजरातमधून बिहारकडे निघालेल्या एका ट्रेनमध्ये कानपूर येथे देण्यात आलेले भोजन मजुरांनी फेकून दिले. हे भोजन शिळे असल्याचा आरोप मजुरांनी केला. तसेच ट्रेनमधील डब्यातील शौचालयात पाणीसुद्धा उपलब्ध नसल्याचे मजुरांनी सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndian Railwayभारतीय रेल्वेGovernmentसरकार