शहरं
Join us  
Trending Stories
1
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
2
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
3
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
4
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
5
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
6
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
7
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
8
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
9
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
10
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
11
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
12
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
13
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
14
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
15
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
16
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
17
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
18
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
19
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus: खायला शिळे अन्न, शौचालयात नाही पाणी, ट्रेनला १०-१० तास सिग्नल नाही, श्रमिक ट्रेनने प्रवास करणाऱ्यांचे हाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2020 13:28 IST

गावांकडे स्थलांतर करणाऱ्या मजुरांचे हाल कमी करण्यासाठी श्रमिक ट्रेन सुरू करण्यात आल्या आहेत. मात्र या श्रमिक ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या मजुरांना प्रचंड हालअपेष्टांचा सामना करावा लागत आहे.

ठळक मुद्देदेशाच्या विविध भागांतून सुटत असलेल्या श्रमिक ट्रेन प्रवासादरम्यान अनेक ठिकाणी तासनतास थांबवून ठेवण्यात येत आहेतप्रवासादरम्यान, खाण्यासाठी शिळे अन्न दिले जात असल्याचा तसेच डब्यातील शौचालयांमध्ये पाण्याचा अभाव श्रमिक एक्स्प्रेसमधून प्रवास करणाऱ्या मजुरांनी केला आरोप

लखनौ - संपूर्ण जगात हाहाकार माजवणाऱ्या कोरोनामुळे निर्माण झालेली दहशत आणि लॉकडाऊनमुळे निर्माण झालेल्या रोजगाराच्या अनिश्चिततेमुळे शहरात वास्तव्य करणारे लाखो मजूर गावच्या दिशेने स्थलांतर करत आहेत. मिळेल त्या वाहनाने नाहीतर पायी गावाच्या दिशेने निघालेल्या या मजुरांचे तांडे आणि त्यांच्या व्यथा ऐकून सर्वसामान्यांचे मन हेलावत आहे. या मजुरांचे हाल कमी करण्यासाठी श्रमिक ट्रेन सुरू करण्यात आल्या आहेत. मात्र या श्रमिक ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या मजुरांना प्रचंड हालअपेष्टांचा सामना करावा लागत आहे.

देशाच्या विविध भागांतून सुटत असलेल्या श्रमिक ट्रेन प्रवासादरम्यान अनेक ठिकाणी तासनतास थांबवून ठेवण्यात येत आहेत. तसेच प्रवासाच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत या ट्रेनमधील प्रवाशांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. प्रवासादरम्यान, खाण्यासाठी शिळे अन्न दिले जात असल्याचा तसेच डब्यातील शौचालयांमध्ये पाण्याचा अभाव असल्याचा आरोप या ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी केला आहे. यासंदर्भातील वृत्त एनडीटीव्हीच्या संकेतस्थळाने दिले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार विशाखापट्टणम येथून निघालेली एक ट्रेन दीनदयाल उपाध्याय स्टेशनच्या आउटर सिग्नलवर तब्बल १० तास थांबवून ठेवण्यात आली होती. येथे रात्री ११ वाजता आलेली ही ट्रेन १० तास थांबवून ठेवण्यात आली, असा आरोप या ट्रेनमधून प्रवास करत असलेला प्रवासी धीरेन राय याने केला.

 अशाच प्रकारे महाराष्ट्रातील पनवेल येथून जौनपूरसाठी निघालेली एक ट्रेन वाराणसी येथे १० तास उभी करून ठेवण्यात आली. त्यानंतर या ट्रेनमधील प्रवाशांनी आंदोलन सुरू केले. त्यानंतर पोलिसांनी प्रवाशांच्या भोजनाची व्यवस्था केली. तसेच ट्रेन पुढे रवाना करण्यात आली. या ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या गोविंद राजभर यांनी सांगितले की, महाराष्ट्रात आपल्याला एकदा भोजन देण्यात आले. मात्र नंतर उत्तर प्रदेशमध्ये काहीच मिळाले नाही. ट्रेन काशी येथे ७ तास थांबवण्यात आली. त्यानंतर काही अंतर कापल्यावर अजून दोन तास ट्रेन थांबवली गेली. त्यानंतर तिसऱ्यांना ट्रेन पुढे सरकली आणि पुन्हा थांबली.

इतर महत्त्वाच्या बातम्या

कोरोनाचा एकही रुग्ण न सापडलेल्या या राज्यात १५ जूनपासून सुरू होणार शाळा-कॉलेज  

लॉकडाऊन आणि मंदीचे सावट असतानाही ही कंपनी करणार ५० हजार कर्मचाऱ्यांची मेगाभरती  

रामजन्मभूमीचे सपाटीकरण करताना सापडले प्राचीन मंदिराचे अवशेष

कोलकाता विमानतळ पाण्याखाली, वादळी वाऱ्यांनी महाकाय विमानेही हादरली

तर गुजरातमधून बिहारकडे निघालेल्या एका ट्रेनमध्ये कानपूर येथे देण्यात आलेले भोजन मजुरांनी फेकून दिले. हे भोजन शिळे असल्याचा आरोप मजुरांनी केला. तसेच ट्रेनमधील डब्यातील शौचालयात पाणीसुद्धा उपलब्ध नसल्याचे मजुरांनी सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndian Railwayभारतीय रेल्वेGovernmentसरकार