शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
2
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
3
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
4
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
5
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
6
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर
7
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
8
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
9
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
10
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
11
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
12
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
13
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
14
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
15
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
16
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
17
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
18
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
19
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
20
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान

coronavirus: खायला शिळे अन्न, शौचालयात नाही पाणी, ट्रेनला १०-१० तास सिग्नल नाही, श्रमिक ट्रेनने प्रवास करणाऱ्यांचे हाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2020 13:28 IST

गावांकडे स्थलांतर करणाऱ्या मजुरांचे हाल कमी करण्यासाठी श्रमिक ट्रेन सुरू करण्यात आल्या आहेत. मात्र या श्रमिक ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या मजुरांना प्रचंड हालअपेष्टांचा सामना करावा लागत आहे.

ठळक मुद्देदेशाच्या विविध भागांतून सुटत असलेल्या श्रमिक ट्रेन प्रवासादरम्यान अनेक ठिकाणी तासनतास थांबवून ठेवण्यात येत आहेतप्रवासादरम्यान, खाण्यासाठी शिळे अन्न दिले जात असल्याचा तसेच डब्यातील शौचालयांमध्ये पाण्याचा अभाव श्रमिक एक्स्प्रेसमधून प्रवास करणाऱ्या मजुरांनी केला आरोप

लखनौ - संपूर्ण जगात हाहाकार माजवणाऱ्या कोरोनामुळे निर्माण झालेली दहशत आणि लॉकडाऊनमुळे निर्माण झालेल्या रोजगाराच्या अनिश्चिततेमुळे शहरात वास्तव्य करणारे लाखो मजूर गावच्या दिशेने स्थलांतर करत आहेत. मिळेल त्या वाहनाने नाहीतर पायी गावाच्या दिशेने निघालेल्या या मजुरांचे तांडे आणि त्यांच्या व्यथा ऐकून सर्वसामान्यांचे मन हेलावत आहे. या मजुरांचे हाल कमी करण्यासाठी श्रमिक ट्रेन सुरू करण्यात आल्या आहेत. मात्र या श्रमिक ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या मजुरांना प्रचंड हालअपेष्टांचा सामना करावा लागत आहे.

देशाच्या विविध भागांतून सुटत असलेल्या श्रमिक ट्रेन प्रवासादरम्यान अनेक ठिकाणी तासनतास थांबवून ठेवण्यात येत आहेत. तसेच प्रवासाच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत या ट्रेनमधील प्रवाशांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. प्रवासादरम्यान, खाण्यासाठी शिळे अन्न दिले जात असल्याचा तसेच डब्यातील शौचालयांमध्ये पाण्याचा अभाव असल्याचा आरोप या ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी केला आहे. यासंदर्भातील वृत्त एनडीटीव्हीच्या संकेतस्थळाने दिले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार विशाखापट्टणम येथून निघालेली एक ट्रेन दीनदयाल उपाध्याय स्टेशनच्या आउटर सिग्नलवर तब्बल १० तास थांबवून ठेवण्यात आली होती. येथे रात्री ११ वाजता आलेली ही ट्रेन १० तास थांबवून ठेवण्यात आली, असा आरोप या ट्रेनमधून प्रवास करत असलेला प्रवासी धीरेन राय याने केला.

 अशाच प्रकारे महाराष्ट्रातील पनवेल येथून जौनपूरसाठी निघालेली एक ट्रेन वाराणसी येथे १० तास उभी करून ठेवण्यात आली. त्यानंतर या ट्रेनमधील प्रवाशांनी आंदोलन सुरू केले. त्यानंतर पोलिसांनी प्रवाशांच्या भोजनाची व्यवस्था केली. तसेच ट्रेन पुढे रवाना करण्यात आली. या ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या गोविंद राजभर यांनी सांगितले की, महाराष्ट्रात आपल्याला एकदा भोजन देण्यात आले. मात्र नंतर उत्तर प्रदेशमध्ये काहीच मिळाले नाही. ट्रेन काशी येथे ७ तास थांबवण्यात आली. त्यानंतर काही अंतर कापल्यावर अजून दोन तास ट्रेन थांबवली गेली. त्यानंतर तिसऱ्यांना ट्रेन पुढे सरकली आणि पुन्हा थांबली.

इतर महत्त्वाच्या बातम्या

कोरोनाचा एकही रुग्ण न सापडलेल्या या राज्यात १५ जूनपासून सुरू होणार शाळा-कॉलेज  

लॉकडाऊन आणि मंदीचे सावट असतानाही ही कंपनी करणार ५० हजार कर्मचाऱ्यांची मेगाभरती  

रामजन्मभूमीचे सपाटीकरण करताना सापडले प्राचीन मंदिराचे अवशेष

कोलकाता विमानतळ पाण्याखाली, वादळी वाऱ्यांनी महाकाय विमानेही हादरली

तर गुजरातमधून बिहारकडे निघालेल्या एका ट्रेनमध्ये कानपूर येथे देण्यात आलेले भोजन मजुरांनी फेकून दिले. हे भोजन शिळे असल्याचा आरोप मजुरांनी केला. तसेच ट्रेनमधील डब्यातील शौचालयात पाणीसुद्धा उपलब्ध नसल्याचे मजुरांनी सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndian Railwayभारतीय रेल्वेGovernmentसरकार