शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

coronavirus: खायला शिळे अन्न, शौचालयात नाही पाणी, ट्रेनला १०-१० तास सिग्नल नाही, श्रमिक ट्रेनने प्रवास करणाऱ्यांचे हाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2020 13:28 IST

गावांकडे स्थलांतर करणाऱ्या मजुरांचे हाल कमी करण्यासाठी श्रमिक ट्रेन सुरू करण्यात आल्या आहेत. मात्र या श्रमिक ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या मजुरांना प्रचंड हालअपेष्टांचा सामना करावा लागत आहे.

ठळक मुद्देदेशाच्या विविध भागांतून सुटत असलेल्या श्रमिक ट्रेन प्रवासादरम्यान अनेक ठिकाणी तासनतास थांबवून ठेवण्यात येत आहेतप्रवासादरम्यान, खाण्यासाठी शिळे अन्न दिले जात असल्याचा तसेच डब्यातील शौचालयांमध्ये पाण्याचा अभाव श्रमिक एक्स्प्रेसमधून प्रवास करणाऱ्या मजुरांनी केला आरोप

लखनौ - संपूर्ण जगात हाहाकार माजवणाऱ्या कोरोनामुळे निर्माण झालेली दहशत आणि लॉकडाऊनमुळे निर्माण झालेल्या रोजगाराच्या अनिश्चिततेमुळे शहरात वास्तव्य करणारे लाखो मजूर गावच्या दिशेने स्थलांतर करत आहेत. मिळेल त्या वाहनाने नाहीतर पायी गावाच्या दिशेने निघालेल्या या मजुरांचे तांडे आणि त्यांच्या व्यथा ऐकून सर्वसामान्यांचे मन हेलावत आहे. या मजुरांचे हाल कमी करण्यासाठी श्रमिक ट्रेन सुरू करण्यात आल्या आहेत. मात्र या श्रमिक ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या मजुरांना प्रचंड हालअपेष्टांचा सामना करावा लागत आहे.

देशाच्या विविध भागांतून सुटत असलेल्या श्रमिक ट्रेन प्रवासादरम्यान अनेक ठिकाणी तासनतास थांबवून ठेवण्यात येत आहेत. तसेच प्रवासाच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत या ट्रेनमधील प्रवाशांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. प्रवासादरम्यान, खाण्यासाठी शिळे अन्न दिले जात असल्याचा तसेच डब्यातील शौचालयांमध्ये पाण्याचा अभाव असल्याचा आरोप या ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी केला आहे. यासंदर्भातील वृत्त एनडीटीव्हीच्या संकेतस्थळाने दिले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार विशाखापट्टणम येथून निघालेली एक ट्रेन दीनदयाल उपाध्याय स्टेशनच्या आउटर सिग्नलवर तब्बल १० तास थांबवून ठेवण्यात आली होती. येथे रात्री ११ वाजता आलेली ही ट्रेन १० तास थांबवून ठेवण्यात आली, असा आरोप या ट्रेनमधून प्रवास करत असलेला प्रवासी धीरेन राय याने केला.

 अशाच प्रकारे महाराष्ट्रातील पनवेल येथून जौनपूरसाठी निघालेली एक ट्रेन वाराणसी येथे १० तास उभी करून ठेवण्यात आली. त्यानंतर या ट्रेनमधील प्रवाशांनी आंदोलन सुरू केले. त्यानंतर पोलिसांनी प्रवाशांच्या भोजनाची व्यवस्था केली. तसेच ट्रेन पुढे रवाना करण्यात आली. या ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या गोविंद राजभर यांनी सांगितले की, महाराष्ट्रात आपल्याला एकदा भोजन देण्यात आले. मात्र नंतर उत्तर प्रदेशमध्ये काहीच मिळाले नाही. ट्रेन काशी येथे ७ तास थांबवण्यात आली. त्यानंतर काही अंतर कापल्यावर अजून दोन तास ट्रेन थांबवली गेली. त्यानंतर तिसऱ्यांना ट्रेन पुढे सरकली आणि पुन्हा थांबली.

इतर महत्त्वाच्या बातम्या

कोरोनाचा एकही रुग्ण न सापडलेल्या या राज्यात १५ जूनपासून सुरू होणार शाळा-कॉलेज  

लॉकडाऊन आणि मंदीचे सावट असतानाही ही कंपनी करणार ५० हजार कर्मचाऱ्यांची मेगाभरती  

रामजन्मभूमीचे सपाटीकरण करताना सापडले प्राचीन मंदिराचे अवशेष

कोलकाता विमानतळ पाण्याखाली, वादळी वाऱ्यांनी महाकाय विमानेही हादरली

तर गुजरातमधून बिहारकडे निघालेल्या एका ट्रेनमध्ये कानपूर येथे देण्यात आलेले भोजन मजुरांनी फेकून दिले. हे भोजन शिळे असल्याचा आरोप मजुरांनी केला. तसेच ट्रेनमधील डब्यातील शौचालयात पाणीसुद्धा उपलब्ध नसल्याचे मजुरांनी सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndian Railwayभारतीय रेल्वेGovernmentसरकार