शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

coronavirus: रुग्णालयात ऑक्सिजन सिलेंडरसाठी हाहाकार; सुप्रिटेंडेट डॉक्टर म्हणाले, "मला कार्यमुक्त करा"

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2021 10:27 IST

coronavirus: कोविड-१९ रुग्णांच्या उपचारादरम्यान ऑक्सिजन सिलेंडरची मोठ्या प्रमाणात टंचाई निर्माण होत असून, त्यामुळे उपचार घेत असलेल्या अनेक रुग्णांचा मृत्यू होण्याची भीती आहे

पाटणा - कोरोना विषाणूच्या फैलावामुळे सध्या देशात चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. (coronavirus in India)अनेक भागात कोरोना रुग्णांवर उपचारांसाठी लागणाऱ्या आवश्यक सामुग्रीची चणचण भासत आहे. बिहारमधील पटणा येथील रुग्णालयातही अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. येथील रुग्णालयात ऑक्सिजन सिलेंडरचा तुडवडा (Shortage of oxygen cylinder) निर्माण होण्याची चिन्हे असल्याने कोविड-१९ रुग्णावर उपचार करणारे नालंदा मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयाचे मेडिकल सुप्रिटेंडेंट डॉक्टर विनोद कुमार सिंह यांनी आरोग्य विभागाचे मुख्य सचिव प्रत्यय अमृत यांना पत्र लिहून आपल्याला कार्यमुक्त करण्याची विनंती केली आहे. या पत्रात डॉ. सिंह यांनी कोविड-१९ रुग्णांच्या उपचारादरम्यान ऑक्सिजन सिलेंडरची मोठ्या प्रमाणात टंचाई निर्माण होत असून, त्यामुळे उपचार घेत असलेल्या अनेक रुग्णांचा मृत्यू होण्याची भीती आहे, असे त्यांनी या पत्रात म्हटले आहे. ( Shortage of oxygen cylinder in hospital; superintendent says, free me)

डॉक्टर सिंह म्हणतात की, ऑक्सिजन सिलेंडरच्या टंचाईमुळे जर कुठल्या रुग्णाचा मृत्यू झाला तर त्याची सर्व जबाबदारी रुग्णालयातील मेडिकल सुप्रिटेंडेंट म्हणजे माझ्यावर येईल. त्यानंतर माझ्यावर कारवाई होईल. अशा परिस्थितीत तुम्ही मला या पदावरून कार्यमुक्त करावं. तसे झाल्यास मी तुमचा आयुष्यभर आभारी राहीन, असे त्यांनी आरोग्य सचिव प्रत्यय अमृत यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. नालंदा मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयाला जेवढ्या संख्येने ऑक्सिजन सिलेंडर मिळाले पाहिजेत, तेवढ्या संख्येने ते मिळत नाही आहेत, त्याच्या जागी अन्य रुग्णालयांना ऑक्सिजन सिलेंडरचा पुरवठा केला जात आहे, असा आरोप त्यांनी केला आहे. 

दरम्यान, एनएमसीएचच्या मेडिकल सुप्रिटेंडेंट यांचे हे पत्र ट्विट करत तेजस्वी यादव यांनी नितीश कुमार सरकारवर जोरदार टीका केली आहे. हा नितीश कुमार यांचा छद्म विकास आहे. नालंदा मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयाच्या अधीक्षकांनी ऑक्सिजनच्या टंचाईमुळे स्वत:ला कार्यमुक्त करण्याची विनंती केली आहे. त्यावरून तुम्ही परिस्थितीची कल्पना करा. १६ वर्षे मुख्यमंत्री असलेल्यांकडून उत्तर मागण्याच मनाई आहे. ते १६ काय १६०० वर्षे मुख्यमंत्री राहतील तेव्हाही आपली चूक कबूल करणार नाहीत, असे तेजस्वी यादव यांनी म्हटले आहे.    

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटलIndiaभारतBiharबिहारHealthआरोग्य