शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

लॉकडाऊनमुळे परराज्यात अडकलेल्या मुलासाठी ती झाली हिरकणी,केले असे काही...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2020 19:12 IST

आपल्या मुलांसाठी आई काहीही करू शकते, हे तुम्ही अनेकदा ऐकले असेल, पाहिले असेल.

ठळक मुद्देआपल्या मुलांसाठी आई काहीही करू शकते, हे तुम्ही अनेकदा ऐकले असेल, पाहिले असेलतेलंगणामधील रझिया बेगम या महिलेचा मुलगा लॉक डाऊनमुळे आंध्र प्रदेशमधील नेल्लोर येथे अडकून पडला होता. या आईने स्कुटीवरून तब्बल 1400 किलोमीटर अंतर कापत मुलाला परत सुखरूप घरी आणले

हैदराबाद - आईसाठी आपली मुलं ही जीव की प्राण असतात. आपल्या मुलांसाठी आई काहीही करू शकते, हे तुम्ही अनेकदा ऐकले असेल, पाहिले असेल. सध्या सुरू असलेल्या लॉकडाऊनदरम्यान याचाच प्रत्यय घडवणारी एक घटना समोर आली आहे. लॉकडाऊनमुळे सर्व राज्यांच्या सीमा बंद करण्यात आल्या आहेत.  त्यामुळे अनेक लोक वेगवेगळ्या राज्यात अडकून पडले आहेत. लॉकडाऊनमुळे परराज्यात अडकून पडलेल्या मुलाला परत घरी आणण्यासाठी आईने जे काही केले ते वाचून तुम्ही तिच्या मातृत्वाला सलाम ठोकल्याशिवाय राहणार नाही.

ही घटना तेलंगणामधील आहे. येथील रझिया बेगम या महिलेचा मुलगा लॉक डाऊनमुळे आंध्र प्रदेशमधील नेल्लोर येथे अडकून पडला होता. त्याला परत आणण्याचा निश्चय या आईने केला आणि स्कुटीवरून तब्बल 1400 किलोमीटर अंतर कापत मुलाला परत सुखरूप घरी आणले. 

 निजमाबाद येथील एका सरकारी शाळेत कार्यरत असलेल्या रझिया बेगम यांना दोन मुलगे आहेत. काही वर्षांपूर्वी पतीचे निधन झाल्यानंतर त्यांनी आपल्या दोन्ही मुलांचा सांभाळ केला. दरम्यान, त्यांचा धाकटा मुलगा निजामुद्दीन हा एमबीबीएसच्या पात्रता परीक्षेची तयारी करत आहे. दरम्यान,  12 मार्च रोजी तो आपल्या मित्राला सोडण्यासाठी आंध्र प्रदेशमधील नेल्लोर येथे गेला होता. तो तिथे काही दिवस राहिला. मात्र त्याचदरम्यान कोरोनामुळे लॉकडाऊनची घोषणा झाल्याने तो तिथेच अडकून पडला. त्याला घरी परतायचे होते, मात्र परतण्यासाठी कुठलेही साधन उपलब्ध नव्हते. इकडे मुलाच्या आठवणीने रझिया यांचा जीव बैचेन होत होता. 

अखेरीस त्यांनी नेल्लोर येथे जाऊन मुलाला परत जाण्याचा निर्णय त्यांनी घेतला. त्यांनी स्थानिक पोलिसांची परवानगी घेतली आणि 6 एप्रिल रोजी प्रवासास सुरुवात केली. सलग प्रवास करून त्या दुसऱ्या दिवशी दुपारी नेल्लोरला पोहोचल्या. त्यानंतर मुलाला सोबत घेत त्यांनी परतीचा प्रवास सुरू केला आणि तिसऱ्या दिवशी संध्याकाळी त्या घरी पोहोचल्या.

'एक महिला म्हणून माझ्यासाठी दुचाकीवरून प्रवास करणे सोपे नव्हते. मात्र मुलाला परत आणण्यासाठीच्या प्रबळ इच्छाशक्तीसमोर ही भीती गायब झाली. रस्त्यावर वाहतूक असल्याने निर्मनुष्य असलेले रस्ते भीतीदायक वाट होते. मात्र मी प्रवास सुरूच ठेवला आणि मुलाला परत आणले,' अशी प्रतिक्रिया या महिलेने दिली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याFamilyपरिवारTelanganaतेलंगणाAndhra Pradeshआंध्र प्रदेश