शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
2
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
3
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
4
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
5
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
6
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
7
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
8
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
9
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
10
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
11
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
12
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
13
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
14
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
15
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन
16
एशियाटिक अध्यक्षपदासाठी २ माजी खासदार आमनेसामने; लढतीबाबत उत्सुकता
17
इंडक्शन कुकिंग वापरणाऱ्यांना फूटपाथवर अन्न शिजवण्यास मनाईचे ते परिपत्रक गैरलागू: हायकाेर्ट
18
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
19
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
20
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान

CoronaVirus: …महाराष्ट्र सरकारच्या त्या चुकीमुळे आमच्या अडचणी वाढल्या, पंजाबच्या आरोग्यमंत्र्यांचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2020 14:08 IST

पंजाबमधील कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर पंजाबचे आरोग्यमंत्री बलबीर सिंग सिद्धू यांनी महाराष्ट्र सरकारवर पुन्हा गंभीर आरोप केला आहे

चंदिगड - देशभरात कोरोनाचा फैलाव होत असताना पंजाबमध्ये मात्र कोरोनाला नियंत्रणात ठेवण्यात सरकारला यश आले होते. मात्र गेल्या दोन तीन दिवसांपासून पंजाबमध्ये कोरोनाबाधित रुग्णांचे प्रमाण लक्षणीय प्रमाणात घटले आहे. दरम्यान, पंजाबमधील कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर पंजाबचे आरोग्यमंत्री बलबीर सिंग सिद्धू यांनी महाराष्ट्र सरकारवर पुन्हा गंभीर आरोप केला आहे.

एएनआय या वृत्तसंस्थेशी संवाद साधताना बलबीर सिंह सिद्धू म्हणाले की, ‘’नांदेडमधील हजूर साहिब येथून पंजाबमध्ये परतलेल्या भाविकांच्या चाचण्या महाराष्ट्र सरकारने घेतल्या नव्हत्या. त्यामुळे आम्हाला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. जर महाराष्ट्र सरकारने चाचण्या घेतल्या नव्हत्या तर त्याची किमान आम्हाला माहिती द्यायला हवी होती, ‘’अशी टीका त्यांनी केली.

दरम्यान, महाराष्ट्रातील नांदेडमधून पंजाबला गेलेल्या अनेक भाविकांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. तसेच पंजामधील कोरोनाबाधितांच्या आकड्यातही दुपटीने वाढ झाली आहे. पंजाबमध्ये शुक्रवारी ५८५ कोरोनाबाधित होते, तो आकडा रविवारी १ हजार १०२ झाला आहे.  

देशात आतापर्यंत कोरोनाचे ४२ हजार ५३३ रुग्ण सापडले आहेत. पैकी ११ हजार ७०७ रुग्ण बरे झाले आहेत. तर  १३७२ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. सध्या देशात सध्याच्या घडीला कोरोनाचे २९ हजार ४५३ कोरोनाबाधित रुग्ण आहेत. १ मे ते ३ मे या अवघ्या तीन दिवसांच्या काळात देशात कोरोनाचे तब्बल साडे सात हजारांहून अधिक रुग्ण सापडले आहेत.  

 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारPunjabपंजाब